जळगांव, दि. 13 :- राज्य शासनाच्या दि. 17
नोव्हेंबर 2012 च्या निर्णयान्वये जळगांव जिल्हयातील ग्रामीण बालुतेदार
कारागिरांकडील 31 मार्च 2008 पर्यंतच्या थकीत असलेल्या मुद्दल व व्याजाला माफी
मिळणार असल्याचे जिल्हा ग्रामोदयोग अधिकारी यांनी कळविले आहे.
सदर
कर्ज माफी निर्णयानुसार 31 मार्च 2008 पर्यंत जळगांव जिल्हयातील बालुतेदार कारागिर
सभासदांकडे मुद्दल व व्याज मिळून 4 कोटी 93 लाख 59 हजार रुपये थकबाकी आहे. या सर्व
थकबाकीस वरील शासन निर्णयान्वये माफी मिळू शकते
परंतु 1 एप्रिल 2008 ते आज पावेतो सभासदांकडे थकीत असलेली सुमारे 40 लाख
रु. भरणे आवश्यक आहे. ही रक्कम माफीच्या रक्कमे व्यतिरिक्तची थकीत आहे.
सदरच्या रक्कमेचा भरणा झाल्याशिवाय संस्थांचे पुर्नजिवन व नवीन कर्जपुरवठा
ठप्प होणार असल्याने थकबाकीदार कारागीरांनी कर्ज माफी व्यतिरिक्तची रक्कम भरण्याचे
आवाहन जिल्हा ग्रामोदयोग अधिकारी जळगांव यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment