Monday, 24 December 2012

ग्राहकांनी तक्रार करण्यासाठी पुढे आले पाहिजे! ॲड रविंद्र पाटील



      जळगांव, दि, 24 :-  ग्राहकांनी आपल्या हक्कांप्रती जागरुक राहून आपल्यावर झालेल्या अन्यायास वाचा फोडण्यासाठी तक्रार केली पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रीय उपभोक्ता महासंघ नवी दिल्लीचे सदस्य ॲड रविंद्र पाटील यांनी आज तरसोद येथे केले. शासनाचा ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने आज तरसोद येथे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी उदघाटक म्हणून ते मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पुरवठा अधिकारी के.सी निकम हे होते.
       ॲड पाटील पुढे म्हणाले, राज्य व केंद्र सरकार ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेले  सर्व प्रयत्न करीत आहेत. तथापी ग्राहक योग्य प्रकारे तक्रार नोंदविण्यास उदासीन आहेत या कार्यक्रमात अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संघटक विकास महाजन, जिल्हा संघटक अ.भा. ग्राहक पंचायत जळगांवचे संघटक प्र.ह, दलाल, यांनी मार्गदर्शन केले. राज्यस्तरीय ग्राहक संरक्षण परिषदेचे माजी सदस्य श्री राजस कोतवाल यांनी आपल्या मनोगतातून राष्ट्रीय ग्राहक सप्ताह साजरा करावा. तसेच शासकीय कार्यालयात ग्राहक संरक्षण कक्ष निर्माण करावा अशी मागणी केली.
          जळगांवचे तहसिलदार कैलास देवरे, पुरवठा तपासणी अधिकारी अर्जुन पवार यांनी प्रमुख पाहुण्याचे स्वागत केले तरसोद गणपती मंदीर परिसरात झालेल्या कार्यक्रमास सरपंच सुदाम रतन राजपूत, तालुका कृषि अधिकारी व्ही.ई.पाटील, निवासी नायब तहसीलदार राजपूत, भालेराव, जोशी, मंगला बारी, ग्रामस्थ आदि मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रमांचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन जमनादास भाटीया यांनी केले.

No comments:

Post a Comment