Monday, 31 December 2012

जेईई मेन आणि ॲडव्हान्स्ड परीक्षेच्या प्रवेशासाठी बारावीचे 40 टक्के गुण ग्राह्य धरणार


मुंबई, दि. 31 : ब्रु/मार्च 2013 मध्ये होणाऱ्या जेईई मेन आणि ॲडव्हान्स्ड परीक्षेच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 12 वी परीक्षेतील 40 टक्के गुण विचारात घेऊन गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार  आहे.

मार्च आणि ऑक्टोबर 2011   2012 च्या 12 वी परीक्षेत एकाच वेळी सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारण्यासाठी फेब्रुवारी /मार्च  2013 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक परीक्षेस प्रविष्ठ होण्यास  या योजनेतील अटीस अधिन राहून अंतिम संधी देण्यात येणार आहे.
या विद्यार्थ्यांनी  श्रेणी सुधार  योजनेतर्गत परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी त्यांची  आवेदनपत्रे  नियमित विद्यार्थ्यांच्या नियमित शुल्काच्या दुप्पट 8 जानेवारी 2013 पर्यत त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयाकडे अर्ज सादर करायचे आहेत. त्यानंतर नियमित विद्यार्थ्यांच्या विलं शुल्काच्या दुप्पट शुल्कासह 12 जानेवारीपर्यत अर्ज सादर करता येतील, आणि कनिष्ठ महाविद्यालयाने विभागीय मंडळाकडे 12 जानेवारी पर्यत आवेदपत्र सादर करायचे आहेत त्यानंतर उशिरा आलेल्या आवेदपत्र विलंब शुल्कासह 15 जानेवारी पर्यत सादर करावीत.
मार्च आणि ऑक्टोबर 2011 2012 च्या 12 वी परीक्षेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित या विषयाची जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा द्यावी लागेल. मात्र या विद्यार्थ्यांचे तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण व श्रेणी पूर्वीचीच ग्राह्य धरण्यात येईल. यापुढे उच्च माध्यमिक  व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस एकाच वेळी सर्व विषय घेऊन उर्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार योजनेतर्गंत सलग दोन परीक्षेस प्रविष्ठ होण्यास संधी देण्यात येत आहे. मात्र अशा विद्यार्थ्यांना तोंडी प्रात्यक्षिक परीक्षेस प्रत्येक वेळी पुन्हा नव्याने प्रविष्ठ व्हावे लागेल. अस राज्य शिक्षण मंडळान कळविले आहे.

No comments:

Post a Comment