मुंबई,
दि.2 : राष्ट्रीय विकंलाग वित्त आणि विकास
निगमच्या योजनेत कर्ज घेतलेल्या लाभार्थ्यांनी थकीत रक्कम एकरकमी भरल्यास त्यांना
व्याज दरात दोन टक्के सवलत मिळणार आहे. ही सवलत 31 मार्च 2013 पर्यंत लागू राहील.
सामाजिक
न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व
विकास महामंडळाकडून लाभार्थ्यांनी घेतलेले 31 मार्च 2008 पर्यंतचे थकित कर्ज
व्याजासह माफ करण्यात आलेले आहे. परंतु 1
एप्रिल 2008 नंतर देय असलेल्या कर्जाचे सर्व हप्ते भरणे बंधनकारक आहे.
सर्व
संबंधित लाभार्थ्यांनी आपल्याकडे असलेली थकित रक्कम महामंडळाच्या जिल्हा
कार्यालयात त्वरित भरावी, थकित कर्ज रकमेचा भरणा न केल्यास संबंधितांवर कडक
कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य अपंग
वित्त व विकास महामंडळ यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment