जळगांव, दि. 26 :- युध्दात / चकमकीत वीरगती प्राप्त घालेल्या
जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता, माजी सैनिक / विधवा यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने
/ केंद्र शासनाने लागू केलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देणे व माजी
सैनिकांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी 15% आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी
करणे, व वडिलोपार्जित मिळकतीमध्ये माजी सैनिकांना, व युध्द विधवांना त्यांच्या
हक्काचा वाटा योग्य पध्दतीने मिळण्याबाबतच्या तक्रारीचे निरसन करणे व इतर योग्य
तक्रारींच्या निरसनासाठी जिल्हाधिकारी जळगांव यांचे अध्यक्षतेखाली दरबाराचे आयोजन
जिल्हाधिकारी कार्यालयाचे नियोजन हॉलमध्ये दिनांक 4 ऑक्टोंबर 2012 रोजी सकाळी
11.00 वाजता करण्यात आले आहे. तरी जिल्हयातील सर्व माजी सैनिकांनी सदर दरबारास
उपस्थित राहावे असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन मोहन बळवंत कुलकर्णी यांनी
एका प्रसिध्दी पत्राकान्वये कळविले आहे. 0
0 0 0
No comments:
Post a Comment