Monday, 26 November 2012

जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिनाची शपथ

           जळगांव, दि. 26- भारताचे संविधनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी अधिकारी आणि कार्मचा-यांना शपथ दिली यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल गायकवाड इतर अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते.   
-शपथ- 

भारताचे संविधान
उददेशिका
आम्ही, भारताचे लोक, भारताने एक सार्वर्भौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय :
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा
व उपासना यांचे स्वातंत्र्य
दर्जाची व संधीची समानता :
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करुन :
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, 1949 रोजी
याव्दारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करीत आहोत
00000


No comments:

Post a Comment