जिल्हयात 37 (1) ( 3) कलम लागू
जळगांव दि. 12 :- जळगांव जिल्हयांत सध्या
विविध राजकीय पक्ष संघटनातर्फे विदयुत पुरवठा खंडीत होणे, वीजभारनियमन, पाणी
टंचाई, चारा टंचाई व पतपेढी ठेवीदार संघटनेतर्फे जिल्हयांत धरणे, आंदोलने, रस्ता
रोको, मोर्चे असे विविध कार्यक्रम सुरु असून वीज वितरणाच्या कार्यालयाचे ठिकठिकाणी
मोर्चेक-यांनी तोडफोड करुन नुकसान केल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. तसेच
विविध पक्ष संघटनांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद होवून सार्वजनिक शांतता व
सुव्यवस्थेस बांधा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाऊस न पडल्यामुळे
पाणी टंचाई निर्माण झालेली असून सदरवेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण
होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच दिवाळी हा सण साजरा होणार आहे. तसेच
दिनांक 16 नोव्हेंबर 2012 ते 25 नोव्हेंबर 2012 पावेतो मुस्लीम बांधवांचा मोहरम सण साजरा होणार आहे.
त्यानिमित्ताने वाघ, ताबुत , ताजे, पंजे, परी, चौक, मजलीस, मातम, आलम यांच्या
मिरवणुका निघणार आहेत. सदरवेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता
असल्याने सार्वजनिक शांततेसाठी संपूर्ण
जळगांव जिल्हा हददीत काही कृत्यांवर बंदी घालणे आवश्यक झाल्यामुळे
जिल्हादंडाधिकारी जळगांव यांनी कलम 37 चे पोटकलम ( 1) व (3) संपूर्ण जिल्हयात लागू करण्यात आले आहे.
त्यामुळे जिल्हयात शस्त्र, सोटे,
भाले, तलवारी, बंदुका, सुरे, लाठया व काठया किंवा शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरात
येतील अशी कोणतीही हत्यारे अथवा वस्तू घेऊन फिरणे, अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक
पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ किंवा द्रव्ये बरोबर घेऊन फिरणे, दगड अगर इतर अस्त्रे
किंवा शस्त्रे सोडावयाची अगर फेकावयाची हत्यारे, साधने इत्यादी तयार करणे जमा करणे,
आणि बरोबर नेणे, कोणत्याही इसमाचे चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढा-यांचे
चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, सार्वजनिकरित्या ओरडणे, रडणे किंवा
विक्षिप्तपणे हावभाव करणे, सभ्यता अगर नितिमत्ता विरुध्द असतील अशी किंवा शांतता
धोक्यात आणतील अशी भाषणे, हावभाव करणे, सोंग आणणे आणि तशी चिन्हे, फलक लावणे किंवा
कोणत्याही जिन्नस अगर वस्तु तयार करणे अगर त्यांचा प्रसार करणे या कृत्यांना बंदी
घालीत आहे.
वरील 37 (1) हा आदेश ज्यांच्या हातात लाठी
किंवा तत्सम वस्तु घेतल्याशिवाय चालता येत नाही. अशा वृध्द अथवा अपंग इसमांना लागू
नाही. मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (3) अन्वये पांच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा
जमाव करण्यांस पोलीस अधिक्षक, जळगांव यांचे पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यांस किंवा
मिरवणुका काढण्यास बंदी घालीत आहे. हा आदेश लग्न मिरवणुका, धार्मिक मिरवणुका,
प्रेतयात्रा यांना लागू नाही. वरील आदेश संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील
व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यारे
बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही.
हा आदेश दिनांक 25 नोव्हेंबर 2012 चे 24-00 वाजेपावेतो अंमलात राहील.
*
* * * * *
No comments:
Post a Comment