Wednesday, 31 October 2012

कामात पारदर्शकता ठेवून लोकसेवा करण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन


        जळगांव, दि. 31 :-राष्ट्रीय संकल्प दिनानिमित आज (दि.31 ऑक्टोंबर रोजी) जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी / कर्मचा-यांना जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी प्रतिज्ञा दिली. सदरच्या प्रतिज्ञेप्रमाणे सर्वांनी लोकसेवक म्हणून काम करत असताना आपल्या कामात सचोटी व पारदर्शकता ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी श्रीमती इंदिरा गांधी पुण्यतिथी व सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
            मा. जिल्हाधिकारी राजूरकर यांनी अधिकारी / कर्मचा-यांना पुढील शपथ दिली ‘‘आम्ही भारताचे लोक सेवक, याव्दारे गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की, आम्ही आमच्या सर्व कार्यक्षेत्रात सचोटी व पारदर्शकता आणण्याचा सातत्याने आटोकाट प्रयत्न करु. आम्ही अशीही प्रतिज्ञा करतो की, जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये भ्रष्टाचाराचे निर्मूलन करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी कार्य करु. आम्ही दक्ष राहून आमच्या संघटनेच्या वृध्दीसाठी व लौकीकासाठी कार्य करु. आमच्या सामुदायिक प्रयत्नांनी आम्ही आमच्या संघटनांना अभिमान प्राप्त करुन देऊ आणि आमच्या  देशबांधवांना मूल्याधिष्ठीत सेवा पूरवू. आम्ही आमचे कर्तव्य निष्ठापूर्वक पार पाडू आणि भय किंवा पक्षपात या विना कार्य करु.’’         

No comments:

Post a Comment