जळगांव, दिनांक 22:- म्हसावद व परिसरातील
ग्रामस्थांची बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेली रेल्वे उडडाणपुलाची मागणी आज
पूर्ण होत असून या रेल्वे उडडाणपुलाचे काम चांगले व दर्जेदार झाले पाहीजे. तसेच संबंधीत मक्तेदारांने हे काम आठरा
महिन्याच्या कालावधीत पूर्ण करण्याची सूचना पालकमंत्री ना.गुलाबराव देवकर यांनी
केली.
म्हसावद येथे ना. देवकर यांचे हस्ते रेल्वे
उडडाणपुलाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. या पुलासाठी शासनाने 10 कोटी रुपयांचा निधी
दिला असून सदरचे काम अठरा महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे. सदरचा पूल एरंडोल-नेरी- रस्त्यावर असून यामुळे
या परिसरातील लोकांना फायदा होणार आहे.
यावेळी जिल्हा सहकारी बॅकेचे संचालक वाल्मिक
पाटील, गोपाळ पाटील, दिलीप धनगर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता
संजय सोनवणे आदिसह म्हसावदचे सरपंच, सदस्य व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित
होते.
No comments:
Post a Comment