जळगांव, दि. 16 :- शासकीय बहुउद्देशीय अपंग
संमिश्र केंद्र या संस्थेत सन 2013 – 14 या वर्षाकरिता वय वर्षे 6 ते 15 या
वयोगटातील अंध, मुकबधिर अस्थिव्यंग मुलांना प्रवेशासाठीचे विहीत नमुन्यातील अर्ज
दि. 31 मे 2013 पर्यत या कार्यालयाकडून पुरवठा करण्यात येतील सदरील अर्ज संपूर्ण
प्रक्रिया पूर्ण करुन दि. 15 जून 2013 पर्यत स्विकारले जातील उशीरा प्राप्त
झालेल्या अर्जाचा प्रवेशासाठी विचार केला जाणार नाही . विहीत मुदतीच्या आत प्राप्त
झालेल्या योग्य त्या उमेदवारास जून महिन्यात मुलाखतीस बोलविण्यात येईल मुलाखत
संपल्यानंतर दुस-या दिवशी निकाल घोषीत करण्यात येईल असे अधिक्षक शासकीय
बहुउद्देशीय अपंग संमिश्र केंद्र या संस्थाकडून कळविण्यात येत आहे.
या संस्थेत शासनामार्फ मोफत भोजन,
निवास, गणवेश, अंथरुण – पांघरुण, क्रमिक पुस्तके, शालेय साहित्य, औषधोपचार, शालेय
व कला शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे. अर्ज पाठवितांना अर्जासोबत खालील
प्रमाणपत्राच्या झेरॉक्स पाठवाव्यात आणि मुलाखतीचे वेळी मूळ प्रमाणपत्र घेवून
उपस्थित रहावे.
अपंगत्वाचे
वैदयकिय प्रमाणपत्र, जन्मतारखेचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, मुलांचे 4 फोटो,
(शक्यतो अपंगत्व दिसेल असे)
वरील तिन्ही अपंगत्वाचे प्रवर्गानुसार
त्या विभागातील तज्ञांचा वैदयकिय दाखला व मुकबधिरासाठी श्रवणालेख आवश्यक आहे.
अस्थिव्यंग मुलांना शारिरीक पुन:र्वसन हा
मुख्य उद्देश साध्य करण्यासाठी प्रवेश दिला जाईल. त्या कालावधीत त्यांना शालेय
शिक्षण दिले जाईल, शारिरीक पुन:र्वसन झाल्यानंतर त्याचे पुढील वर्षी संस्थेतून नाव
कमी करण्यात येईल.
संस्थेत प्रवेश दिल्यानंतर संस्थेचे
सर्व नियमांचे उमेदवार व पालकांनी कटाक्षाने पालन करणे आवश्यक आहे. वरील सर्व बाबींची
पूर्तता केलेले अर्जच फक्त विचारात घेतले जाईल. अपूर्ण भरलेल्या अर्जाचा विचार
केला जाणार नाही. परिपूर्ण प्रवेश अर्ज अधिक्षक , शासकीय अपंग संमिश्र केंद्र,
जळगांव कडे पाठवावेत तसेच अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांकावर 9421712828,
9673970531 वर संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment