जळगांव, दि. 26 :- जिल्हयात पाणी टंचाईची भीषणता
दिवसेंदिवस वाढत आहे. टंचाईच्या झळा नागरिकांबरोबरच वन्यप्राण्यांना ही बसत
असल्याने वनविभागाने वनक्षेत्रात कृत्रिम पाणवठे बनविण्याचे काम हाती घेतलेले आहे. परंतु वन्यप्राणी व पक्षी यांचा
अधिवास महसूल क्षेत्रात ही असल्यामुळे पाणी उपलब्ध असलेल्या शेतक-यांनी शेतावर
वन्य प्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठे तयार करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर
राजूरकर यांनी केले आहे.
जिल्हयात वनक्षेत्रात वनविभागामार्फत वन्य प्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठे सुरु
केले जात आहेत. परंतु ज्या शेतक-यांकडे विहिर, बोअरवेल आदिचे पाणी उपलब्ध आहे
अशांनी शेतावर जलकुंड तयार करुन प्राण्यांना पाणी पिण्यासाठी उपलब्ध करावे. तसेच
ग्रामीण स्तरावर ग्रामपंचायत, वन संरक्षण समित्या , सामाजिक कार्यकर्ते,
पक्षीमित्र, लोकप्रतिनिधी आदिनी या कार्यात पुढाकार घेऊन स्थानिक स्तरावर पाण्याचे
कुंड व पानवठे तयार करण्यासाठी सक्रीय सहभाग देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राजूरकर
यांनी कले आहे. नागरि क्षेत्रातील नागरिकांनी ही पक्ष्यांसाठी
भांडयात पाणी ठेवून पक्षाप्रती सदभाव दाखवावा.
No comments:
Post a Comment