Friday, 24 January 2014

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना आरोग्य पत्र वितरणांचा उदयापासून प्रारंभ

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना
आरोग्य पत्र वितरणांचा उदयापासून प्रारंभ

              जळगाव, दि. 24 :- राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना महाराष्ट्र शासनाने कमी उत्पन्न गटांच्या लाभार्थ्यांसाठी चालू केलेली आहे. दारिद्रयरेषेखालील (पिवळे शिधापत्रिका) व दारिद्रयरेषेवरील केशरी शिधापत्रिका धारक ( रुपये 1 लाख किंवा त्यापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणारी कुटूंबे) अंत्योदय व अन्नपूर्णा शिधापत्रधारक कुटूंबे या योजनेसाठी पात्र लाभाथी्र आहेत. या योजनेमध्ये विमा कंपनीच्या सहभागने निवडलेल्या 971 गंभीर आजांवर व 121 पाठपुरावा सेवांवर प्रती कुटूंब रुपये 1.50 लाख मर्यादे पर्यत विमा संरक्षण देण्यात येते. यामध्ये प्रती कुटूंब प्रती वर्षी रुपये 1.50 लाख मर्यादे पर्यत कुटूंबातील सर्व सदस्य रुग्‍णालयातून लाभ घेवू शकतात.
                पहिल्या टप्यामध्ये ही योजना 8 जिल्हयामध्ये 2 जुलै 2012 पासून कार्यान्वित झाली अहे. पहिल्या टप्प्यातील मिळालेलया अभूतपूर्व यशानंतर आता महाराष्ट्रातील उर्वरीत सर्व जिल्हयात रत्नागिरी, सिंधुदूर्ग, ठाणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, नंदुरबार, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूरऔरंगाबाद, बीड, हिंगोली,  जालना, लातून, परभणी, उस्मानाबाद, अकोला, बुलढाणा,वाशिम, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्हयात ही  योजना 21 नोव्हेंबर 2013 पासून कार्यान्वीत झाली आहे.
                पात्र लाभार्थ्यांना पिवळे, केशरी शिधापत्रिकाधारक अन्नपूर्णा व अंत्योदय शिधापत्रिकाधारक यांना ओळखपत्र म्हणून राजीव गांधी जीवनदायी आरोग्य पत्र वितरण करण्याची कार्यवाही चालू आहे. सदरचे आरोग्य पत्र रुग्णालयात उपचाराच्या वेळी ओळख पत्र म्हणून उपयोगात येते. जिल्हयात एकूण 8 लाख 38 हजार 266 पात्र लाभार्थी असून आजतागायत  1 लाख 75 हजार 532 लाभार्थ्यांना आरोगय पत्र वितरीत करण्यात आले आहेत.
               आरोग्य पत्राचे वितरण जिल्हयातील 160 महाईसेवा केंद्रामध्ये व 1151 संग्राम केंद्राच्या ठिकाणी चालू आहे.ख्‍ या आरोग्य ठिकाणी आरोग्य पत्राचे छपाई व तिवरण चालू असले तरी विशेषत: शहरी भागात यंत्रणा कमी पडतात. त्यामुळे जनसामान्यात परिचित असणारी व सर्व सामान्यांना जवळची वाटणा-या टपाल कार्यालयामध्ये आरोगय पत्र वितरणाचा शासनाने निर्णय घेतला आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना व महाराष्ट्रातील टपाल विभाग दि. 17 डिसेंबर 2013 रोजी सामंजस्य करार करण्यात आला. जिल्हयामध्ये 2 टपाल कार्यालयामध्ये इंटरनेट व लेझर प्रिंटर सुविधा उपलब्ध असून त्या ठिकाणी लाभार्थ्यांना आरोगय पत्र छपाई करुन वितरण केले जाईल तसेच जिल्हयातील 46 टपाल कार्यालयात या सुविधा उपलबध नसल्याने लाभार्थी त्या टपाल कार्यालयात आपला अर्ज व शिधापत्रिका व  फोटो ओळखपत्राची सत्यप्रत सादर करतील व संबंधीत टपाल कार्यालये आठवडयाच्या आत लाभार्थ्याला आरोग्य पत्र उपलबध करुन देतील.
             जिल्हयातील ज्या ठिकाणी आरोग्य पत्र मिळणाच्या सुविधा उपलब्ध आहेत त्या महाई-सेवा केंद्र, संग्राम केंद्र व टपाल कार्यालये या ठिकाणी लाभार्थ्या शिधापत्रिका व फोटो ओळखपत्र दाखवून आरोगय पत्र छपाई करुन घेतील तयानंतर लाभार्थ्यांनी त्यांच्या कुटूंबातील सदस्यांच्या नावा समोर दश्रविलया ठिकाणी स्टॅम्प आकाराचे फोटो चिकटवावयाचे आहेत. नामनिर्देशित केलेल्या अधिका-याकडून सदरचे आरोग्य पत्र स्वाक्षांकित करुन घ्यावयाचे आहेत. त्यानंतरच या आरोग्य पत्राचा रुग्णालयातील उपचारासाठी उपयोग होऊ शकेल.
           जिल्हयातील आरोग्य सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी, ग्राम विस्तार अधिकारी, मंडळ निरीक्षक, मंडल अधिकारी, सहाय्यक पोस्ट मास्टर, पोस्ट मास्टर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयातील अधिकारी , अन्य कोणत्याही राजपत्रित अधिकारी या अधिका-यांना आरोग्य पत्र स्वाक्षांकित करण्याचे अधिकार दिले आहेत.

* * * * * * * * *

No comments:

Post a Comment