Friday, 15 March 2013

औरंगाबाद येथे डाक अदालतचे आयोजन



           जळगांव दिनांक 15 :- देशामधील पोस्टाची सेवा ही सामाजिक व आर्थिक जीवनाचा एक अभिन्न अंग आहे. देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये अपरोक्षपणे पोस्टाच्या सेवेचे एक वेगळया प्रकारचे स्थान निर्माण करुन प्रभावित केले आहे. पोस्टाचे खाते हे लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा प्रयत्न करते व ग्राहकांचे जास्तीत जास्त संतोषाधीक्य अथवा समाधान वाढविते. ही सेवा देतांना संभाषणामध्ये, पत्रव्यवहारामध्ये किंवा सेवेमधील काही त्रुटींमुळे असे काही प्रसंग निर्माण होतात की त्यामुळे पोस्टाच्या सेवेबददल तक्रार करण्याची वेळ येते. या तक्रारींचा योग्य प्रकारे न्याय निवडा करण्यासाठी पोस्टाच्या खात्याने वेळोवेळी डाक अदालत घेण्याचे ठरविले आहे. त्यामध्ये पोस्टाचे अधिकारी तक्रारदारांना प्रत्यक्षपणे भेटतात आणि त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन त्या लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न करतात.
           पोस्टमास्तर जनरल, औरंगाबाद रिजन औरंगाबाद 431002 व्दारा दिनांक 25 मार्च 2013 रोजी पोस्टमास्तर जनरल, औरंगाबाद रिजन, औरंगाबद  431002 यांचे कार्यालयात रिजन डाक अदालत आयोजित करण्यात आलेली आहे.च
           पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे सहा आठवडयांच्या आत निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा तक्रारींची दखल घेतली जाईल. विशेष: टपाल, स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, डाक वस्तु, पार्सल, बचत बॅक, मनीऑर्डर इत्यादीबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारीचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा, उदा. तारीख व ज्या अधिका-यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव व हुदद इत्यादी
           संबंधितांनी डाकसेवेबाबतची आपली तक्रार दोन प्रतीत सहाय्यक निर्देशक डाकसेवा, पोस्टमास्तर जनरल औरंगाबाद यांचे कार्यालय, छावणी परिसर, औरंगाबाद 431002 यांचे नांवे अतिरिक्त प्रती सह दिनांक 21 मार्च 2013 पर्यत अथवा तत्पूर्वी पोहचेल, अशा बेताने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींवर कारवाई केली जाईल. परंतू त्यांचा डाग अदालत अंतर्गत विचार केला जाणार नाही असे पोस्टमास्तर जनरल, औरंगाबाद रिजन, औरंगाबाद 431002 यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment