Monday, 30 June 2014

सिंहस्थ कुंभमेळयासाठीची कामे दर्जेदार स्वरुपाची करावीत : उपमुख्यमंत्री - अजित पवार


सिंहस्थ कुंभमेळयासाठीची कामे दर्जेदार स्वरुपाची करावीत !
  : उपमुख्यमंत्री - अजित पवार

        नाशिक दि 30 :- सिंहस्थ कुंभमेळा निमित्ताने होणारे विकास कामे अधिक दर्जेदार स्वरुपाची व वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणानी प्रयत्नशिल रहावे असा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
            जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री छगन भुजबळ, आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जयश्री पवार, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी विलास पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सारंगल, पोलिस अधिक्षक (ग्रामीण) संजय मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते, सिंहस्थ कुंभमेळा अधिकारी महेश पाटील, उदय किसवे आदि अधिकारी उपस्थित होते.
            सिंहस्थ कुंभमेळाच्या निमित्ताने राज्य शासनाच्या निधीतून विविध विकास कामे सुरू आहेत.  केंद्र शासनाचाही निधी सिंहस्थासाठी मिळणार असून स्थानिक स्वराज्य संस्था ही निधी उपलब्ध करुन देणार आहेत. त्यामुळे ही विकास कामे शहराच्या वैभवात भर घालतील. त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे असे श्री. पवार यांनी सांगितले.
            सिंहस्थ कुंभमेळामुळे नदी घाट, रस्ते, वीज, पाणी, आरोग्य या सारखी विविध कामे कायम स्वरुपी  होत असल्याने शहराच्या विकासात भर पडणार असून त्यांचा फायदा शहारातील नागरिकांना होणार आहे  असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
            यावेळी सिंहस्थ कुंभमेळा निमित्त हाती घेतलेले कामे, त्यांची प्रगती, उपलब्ध निधी आदिची माहिती विभागीय आयुक्त एकनाथ डवले, महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सारंगल, जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी दिली.

                                       * * * * * * * *

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 30 नोव्हेंबर पूर्वी प्रस्ताव मागविले

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 30 नोव्हेंबर पूर्वी प्रस्ताव मागविले

              जळगाव, दि. 30 :- महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण् परिषदेमार्फत सन 2014 - 15 या वर्षासाठी राज्यातील पा्रथमिक, माध्यमिक व उच्च्‍ माध्यमिक शिक्षकांसाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. संशोधनात्मक कार्याची आवड असणा-या शिक्षकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे  आवाहन करण्यात येत आहे. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांनी आपले नवोपक्रम चार प्रतीत आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित जिल्हयाच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडे दिनांक 30 नोव्हेंबर 2014 पर्यंत पाठवावे. स्पर्धेच्या सविस्तर माहितीसाठी संबंधित जिल्हयाचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे या कार्यालयाकडे संपर्क साधावा. 
           स्पर्धेची उदिष्टये :- प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाच्या क्षेत्रात अध्यायन अध्यापनाशी संबंधित क्षेत्रांमधील पारंपारिक पध्दती बदलून त्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी शिक्षकांना प्रोत्साहित करणे, शिक्षकांनी प्रशिक्षण क्षेत्रामध्ये विविध विषयांवर केलेले मुलभूत आणि उपयुक्त संशोधनात्मक कार्य सर्वसामान्य शिक्षकांच्या व शैक्षणिक प्रशासकांच्या माहितीसाठी प्रस्तृत करणे, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण क्षेत्रांमधील नवनवीन संकल्पना, विचारप्रवाह, तंत्रे आणि अध्ययन- अध्यापन पध्दती यांचा निरंतर शोध घेणा-या शिक्षकांना उत्तेजन देऊन त्यांना त्यासाठी प्रोत्साहन देणे.
            स्पर्धकांची पात्रता :-  स्पर्धेत भाग घेणारे स्पर्धक हे जिल्हा परिष्द, नगरपालिका, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये अथवा मान्यता प्राप्त प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता 1 ली ते 12 वीला शिकविणारे शिक्षक म्हणून काम करणारे असावेत. माध्यमिक शाळांमधील इयत्ता 5 वी ते 8 वी ला शिकविणारे शिक्षक प्राथमिक स्पर्धेत गणले जातील.
          स्पर्धेचे नियम : - नवोपक्रम सादर केल्याच्या तारखेस स्पर्धक  प्राथमिक, माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिकवित असावेत, निवडलेला नवोप्रकम, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणा-यांना उपयुक्त ठरणा-या कोणत्याही विषयावरील असावा,  नवोपक्रम शिक्षकांच्या स्वत:च्या संशोधनावर अथवा अनुभवावर आधारलेला असावा. नवोप्रकमाच्या प्रकल्प अहवाल सोबत.
          राज्य व राष्ट्रीयस्तरावरील अन्य कोणत्याही स्पर्धेसाठी या अगोदर पाठविलेला नवोपक्रम या स्पर्धेसाठी पाठविण्यात येऊ नये. प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
            नवोपक्रमाची पृष्ठयसंख्या 40 ते 50 असावी, अहवालात वापरलेले संदर्भ नवोपक्रमाच्या शेवटी नमुद करावेत. नवोपक्रमाला जोडलेली परिशिष्टे संक्षिप्त असावीत. मुख्याध्यापक, प्राचार्य स्वाक्षरी नाव व शिक्का मराठी, इंग्रजी किंवा हिंदी यापैकी कोणत्याही एका भाषेत लिहिलेला असावा.
          स्पर्धकाचे संपूर्ण नाव, शाळेचे नाव व पत्ता, कायमाचा पत्ता, जन्मतारीख्, शैक्षणिक अर्हता, शिक्षक म्हणून केलेल्या कामाचा अनुभव, नवोपक्रमाचे शिर्षक, नवोपक्रमाची पृष्ठसंख्या. नवोप्रकम ए 4 साईज कागदच्या एकाच बाजूस सुवाच्च हस्ताक्षरात लिहिलेला असावा. कार्डशीट कव्हर वापरुन साधी बांधणी केलेला असावा.
          नवोपक्रमाचे जिल्हा व राज्यस्तरावर मूल्यांकन पुढील निकषांच्या आधारावर करण्यात येईल. नवीनता (कल्पाना कार्यवाही पध्दती) 20 गुण, नियोजन (वेळापत्रक साधने, पुरावे, सादीकरण इत्यादीचे) 25 गुण, कार्यवाही 25 गुण, यशस्विता 15 गुण, अहवाल लेखन 10 गुण, संदर्भ व उद्दिष्टे 5 गुण एकूण 100 गुण
          पारितोषिक :- जिल्हा पातळवरील पहिल्या तीन उत्कृष्ट नवोपक्रमाना अनुक्रमे  रु. 1000/, रु 800, रु. 600 रु. 400,रु 200 ची रोख पारितोषिक व प्रशस्तिपत्रके देण्यात येतील. तसेच क्रमांक 6 ते 10 च्या नवोपक्रमांना फक्त उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्रके देण्यात येतील. राज्यस्तरावरील स्पर्धेतील उर्वरित सहभागी सदस्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.
         स्पर्धेत भाग घेणा-या शिक्षकांनी आपला नवोपक्रम चार प्रतीत आवश्यक त्या सर्व प्रमाणपत्रांसह आपल्या जिल्हयाच्या प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडे दि. 30 नोव्हेंबर 2014 अखेर पर्यंत सादर करावेत.

* * * * * * * * * *

दुचाकी वाहनांसाठी नवीन पसंती क्रमांक मालिका

              जळगाव, दिनांक 30 :- उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे दुचाकी चाकी नवीन नोंदणी  क्रमांक एमएच 19/ बीवाय 0001  ते 9999 पर्यंतची मालिका वाहन धारकांना उपलब्ध होणार आहे. ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनांकरीता आकर्षक नोंदणी क्रमांक हवा असेल त्यांनी उप  प्रादेशिक कार्यालयात अर्ज दाखल करावेत, विहीत शुल्काच्या रकमेचा भरणा मालिका सुरु झाल्यावर करुन आकर्षक नोंदणी क्रमांक प्राप्त करुन घ्यावेत. आकर्षक क्रमांकासाठी शुल्क भरल्यावर वाहन 30 दिवसाचे आत नोंदणी करुन कागदपत्रे सादर करणे बंधनकारक राहील. 30 दिवसाचे आत वाहन नोंदणी न केल्यास भरलेले शुल्क हस्तांतरीत किंवा परतावा होणार नाही. त्या रकमेचा परत वापरही होऊ शकणार नाही, अधिक माहितीसाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


* * * * * * * * * *

Tuesday, 24 June 2014

राष्ट्रीय पिक विमा योजनेत सहभागासाठी 30 जून पर्यंत मुदत

राष्ट्रीय पिक  विमा योजनेत सहभागासाठी 30 जून पर्यंत मुदत

                जळगाव, दि. 24 :- केंद्र शासनाने जाहीर केलेल्या नवीन राष्ट्रीय पिक विमा कार्यक्रमातंर्गत महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक 3 जुन 2014 अन्वये जळगाव जिल्हयाकरीता खरीप हंगामासाठी हवामान आधारित पिक विमा योजना पथदर्शक स्वरुपात जळगाव जिल्हयातील कापूस, खरीप ज्वारी, उडीद व मुग या पिकासाठी  लागू करण्यात आली आहे. ही योजना जळगाव जिल्हयातील  सर्व शेतक-यांना लागू असून विविध वित्तीय संस्थांकडून पिक कर्ज घेणा-या शेतक-यांना अधिसूचित पिकांकरीता सक्तीची असून कर्ज न घेणा-या शेतक-यांसाठी ऐच्छिक स्वरुपाची आहे.
योजनेचे उद्देश :- पिक पेरल्यापासून पिक तयार होण्याच्या कालावधीत अपूरा पाऊस, पावसात पडणारा खंड, अति पाऊस या पासून नुकसान झाल्यापासून योजनेच्या तरतूदी प्रमाणे शेतक-यांना विमा संरक्षण देऊन आर्थिक स्थैर्य देणे, पिकाचे नुकसानीच्या कठीण परिस्थितीत शेतक-यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे,
योजना कार्यान्वित करणारी यंत्रणा :- जळगाव जिल्हयाकरीता कपूस, खरीप ज्वारी, उडीत व मुग या पिकांचा समावेश असून भारतीय कृषि विमा कंपनी , मुंबई यांचे मार्फत  योजना राबविण्यात येणार आहे. तसेच योजना अंतर्गत शेतक-यांना देय होणारी नुकसान भरपाईची संपूर्ण रक्कम सुध्दा भारतीय विमा कंपनी, मुंबई यांचे मार्फत अदा  करण्यात येणार आहे.
          अधिसूचित क्षेत्रात महसूल मंडळ स्तरावर हवामान घटकाच्या नोंदी घेण्यासाठी नोंदणीकृत त्रयस्थ संस्थे मार्फत स्वयंचलीत संदर्भ हवामन केंद्र उभारणी करणे बाबतची कार्यवाही विमा कंपनी मार्फत केली जाणार आहे.
         हवामान आधारित पिक विमा योजने अंतर्गत खरीप हंगाम 2014 करीता अधिसूचित पिके, विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता दर, विमा हप्ता अनुदान व विमा हप्ता अनुदान व विमा हप्ता शेतकरी हिस्सा रक्कम रु. पुढीलप्रमाणे राहील-
           अधिसूचित महसूल मंडळ संख्या 86, अधिसूचित पिके कापूस, विमा संरक्षित रक्कम 22000 , वास्तवदर्शी विमा हप्ता प्रति हेक्टर, टक्केवारी 7.80, रक्कम रुपये 1716/-, विमा हप्ता अनुदान रक्कम रु 686, विमा हप्ता शेतकरी हिस्सा 1030,  अधिसूचित    मंडळसंख्या 86, अधिसूचित पिके खरीप ज्वारी विमा संरक्षित रक्कम 13000/-  वास्तवदर्शी विमा हप्ता प्रति हेक्टार टक्केवारी 11.60, रक्कम रुपये 1508, विमा हप्ता अनुदान रक्कम रु 754, विमा हप्ता शेतकरी हिस्सा रक्कम रु. 754/-, अधिसूचित मंडळ संख्या 86 अधिसूचित पिके उडीद, विमा संरक्षित रक्कम  13000/-, वास्तवदर्शी विमा हप्ता प्रति हेक्टर टक्केवारी 11.20, रक्कम रुपये 1456/-, सिमा हप्ता अनुदान रक्कम रु. 728, विमा हप्ता शेतकरी हिस्सा  754/-,  अधिसूचित महसूल संख्या 83, अधिसूचित पिके मुग, विमा संरक्षित रक्कम 15000/-, वास्तवदर्शी विमा हप्ता प्रति हेक्टार टक्केवारी 7.40, रक्कम रुपये 1110/-, विमा हप्ता अनुदान रक्कम रुपये 444/- विमा हप्ता शेतकरी हिस्सा रक्कम रुपये 666.
            पिक विमा करणेसाठी अंतिम मुदत 30 जून 2014 आहे. तत्पूर्वी विमा हप्ता जवळील राष्ट्रीयकृत बँकेत भरणा करावा  असे आवाहन उपविभागीय  कृषि अधिकारी जळगाव यांनी केले आहे.


* * * * * * * * *

कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार : 30 जून पर्यंत प्रस्ताव मागविले

                 जळगाव, दि. 24 :- राज्य शासनाने सन 2014-15 मध्ये कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे स्मरणर्थ भूमीहीन अनुसूचित जाती व नवबौध्दच्या विकासाठी उल्लेखनीय व निस्वार्थीपणे काम करणा-या एका सेवाभावी  कार्यकर्त्यास व एक सामाजिक संस्थेस पुरस्कार देण्यात येणार आहे. जळगाव जिल्हयातील सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक संस्थांकडून कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुस्कारसाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
              हा पुरस्कार  सामाजिक क्षेत्रात काम करीत असलेल्या सामाजिक सेवकाच्या व संस्थांच्या कामाची दाद घ्यावी व इतर कार्यकर्त्यांना व संस्थांना त्यापासून प्रेरणा मिळावी जेणेकरुन  सामाजिक उत्थानासाठी सामजिक कार्यकर्ते व सामाजिक संस्था पुढे याव्यात म्हणून दिला जातो.
            इच्छूक सामाजिक कार्यकर्ते व संस्थांनी विहित नमुन्यातील अर्जासाठी सामाजिक न्याय भवन, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, महाबळरोड, मायादेवी मंदिरासमोर, जळगाव येथे संपर्क साधावा, पुरस्करासाठी पुरुषाचे वय 50 व महिलांचे वय 40 पेक्षा कमी नसावे.
             सदर व्यक्ती आमदार, खाससादर किवा जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी नसावी. सामाजिक क्षेत्रात कमीत कमी 15 वर्षाचे काम केलेले असावे. प्रस्ताव 3 प्रतीत दिनांक 30 जून 2014 पर्यंत सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, जळगाव, महाबळरोड, मायादेवी मंदिराजवळ, हतनूर कॉलनी, जळगाव यांचेकडे सादर करण्यात यावे. उशिरा आलेले प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण जळगाव यांनी केले आहे.


* * * * * * * * *

Thursday, 19 June 2014

स्थानिक केंद्राची प्रारुप यादी जाहिर हरकती दाखल करण्यास 25 जुन पर्यंत मुदत

स्थानिक केंद्राची प्रारुप यादी जाहिर
हरकती दाखल करण्यास  25 जुन पर्यंत मुदत

                 जळगाव, दि. 19 :- भारत निवडणुक आयोगाने दि. 10 जून 2014 रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या पोट निवडणुकीची घोषणा केली आहे.
               स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणुकीचे व्यवस्थापन व त्यावर बारकाईने संनियंत्रण ठेवण्यासाठी उपविभागीय स्तरावर मतदान केंद्र उभारण्यात यावे,अशा सूचना भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक 24 फेब्रुवारी 2010 च्या पत्रान्वये दिल्या आहेत.  जिल्हयातील अमळनेर, फैजपुर, भुसावळ, जळगाव, एरंडोल, पाचोरा व चाळीसगाव या 7 महसुली उपविभागांच्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेल्या मतदान केंद्रांची प्रारुप यादी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी, जळगाव यांनी लोक प्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 25 नुसार दिनांक 19 जून 2014 रोजी प्रसिध्द केली आहे.
                ज्या कोणास मतदान केंद्राच्या प्रारुप यादीवर हरकती घ्यावयाची असल्यास दिनांक 19 ते 25 जून 2014 या कालावधीत जिल्हा निवडणुक अधिकारी, जळगाव यांचे कार्यालयात दाखल करता येईल.
                प्रसिध्द करण्यात आलेली मतदान केंद्राची प्रारुप यादी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी कार्यालय, जळगाव, जिल्हा परिषद जळगाव, जळगाव शहर महानगर पालिका जळगाव, उपविभागीय अधिकारी यांची कार्यालये, तहसिल कार्यालये, पंचायत समिती कार्यालये , नगर पालिका कार्यालये ठिकाणी  पाहण्यासाठी उपलब्ध आहे, असे जिल्हा निवडणू अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांनी कळविले आहे.

* * * * * * * * *

स्थानिक केंद्राची प्रारुप यादी मंजूरीसाठी 25 जून रोजी बैठक

               जळगाव, दि. 19 :-  जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदार संघातील पोट निवडणूकीकरीता मतदान केंद्राची प्रारुप यादी तयार करण्यात आलेली असून सदर यादी मंजूरीकरीता भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांना पाठवावयाची आहे. सदर प्रारुप यादीवर चर्चा करण्यासाठी जिल्हा निवडणुक अधिकारी जळगाव याचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे दिनांक 25 जून 2014 रोजी दुपारी 2-00 वाजता सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सदर बैठकीस  मान्यता प्रापत राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधींनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा निवडणुक अधिकारी  श्रीमती रुबल अग्रवाल यांनी केले आहे.


* * * * * * * * *

Tuesday, 17 June 2014

महाविद्यालयांनी ई-स्कॉलशिप संकेतस्थळावरील माहिती अदयावत करण्याचे आवाहन

महाविद्यालयांनी ई-स्कॉलशिप संकेतस्थळावरील
माहिती अदयावत करण्याचे आवाहन

               जळगाव, दि. 17 :- जळगाव जिल्हयातील सर्व महाविदयालय / व्यवसायीक महाविदयालयांनी, सामाजिक न्याय विभागाच्या ई-शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी जळगाव जिल्हयातील सर्व महाविदयालयांना शासनाचे https://mahaeschol.maharashtra.gov.in या संकेतस्थळास त्वरीत भेट देऊन डॅशबोर्डावरील दस्तऐवज या रकान्यातील लिंक फाईल पाहून त्यामध्ये आपल्या महाविदयालयाचे नाव , मान्यताप्राप्त अभ्यासक्रम, व अभ्यासक्रमाचा कालावधी सॉप्टवेअरमध्ये व्यवस्थितरित्या समाविष्ट झालेला आहे किंवा नाही याची खात्री करावी.
          भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती आणि शिक्षण फी, परीक्षा फी, प्रदाने   योजना सन 2011 पासून ऑनलाईन करण्यात आलेल्या आहेत. सदर योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी व त्यातील असलेल्या त्रूटी दूर करण्यासाठी राज्यातील प्रत्येक विदयापीठाकडून त्यांच्या अधिनस्त आलेली मान्यताप्राप्त महाविदयालये, त्यातील मान्यताप्राप्त अभ्यासक्रम, त्यांची मान्य संख्या, सदर अभ्यासक्रमाचा कालावधी याबाबतची माहिती प्राप्त करुन घेऊन ती ई- स्कॉलरशिप सॉफ्टवेअरमध्ये सामाविष्ट करण्यात आली आहे. अभिमत विदयापीठे (Deemed Universities) व त्यातील अभ्यासक्रम यांचा या सॉफ्टवेअरमध्ये समावेश करण्यात आलेला नाही.
            आपल्या महाविदयालयाचे नाव किंवा एखादा अभ्यासक्रम या सॉफ्टवेअरमध्ये सामाविष्ट केला गेला नसेल अथवा अभ्यासक्रमाचा कालावधी चुकलेला असेल तर आपण या संदर्भात लेखी निवेदन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण जळगाव यांच्याकडे आवश्यक त्या पुराव्यासहित उदा. विदयापीठाने संबंधित महाविदयालयास त्यातील अभ्यासक्रमास / मान्य संख्येस दिलेली मान्यता यांचे आदेशासह दि. 20 जून 2014 पर्यत सादर करावे.
            महाविदयालयाचे नाव, त्यातील अभ्यासक्रम किंवा त्याचा कालावधी सॉफ्टवेअरमध्ये व्यवस्थितरित्या समाविष्ट न झाल्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून तसेच महाविदयालये शिक्षण फी व परीक्षा फी पासून वंचित राहिल्यास त्यांची संपुर्णत: जबाबदारी संबंधीत महाविद्यालयाचे प्राचार्य यांची राहील,असे आवाहन सहाय्यक आयुक्त , समाजकल्याण जळगाव यांनी केले आहे.

* * * * * * * *

अस्थिव्यंग अपंगांसाठी व्यवसाय प्रशिक्षण

            जळगाव दि. 17 :- प्रेरणा ट्रस्ट,औरंगाबाद,  संचलित निवासी अपंग केंद्र (कार्यशाळा ) येथे 16 वर्षावरील 40 टक्के पेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या व्यक्तींसाठी महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाचे मान्यता प्राप्त   व्यवसाय अभ्यासक्रम राबविते. त्यासाठी अपंगांनी प्रवेशासाठी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
संस्थेत शिकवले जाणारे अभ्यासक्रम व आवश्यक पात्रता याप्रमाणे- सी. टी. सी. शैक्षणिक पात्रता 10 वी 12 वी उत्तीर्ण, टेलरींग ॲण्ड कटींग - 7 वी पास, इलेक्ट्रिक वायरमन- 8 वी पास, इनफॉरमेशन टेक्नॉलॉजी- 10 वी प्रवेशित.
            मराठवाडा व मराठवाडया बाहेरील अपंग व्यक्तीसाठी संस्थेची विनाअनुदानित व मोफत वसतीगृह निवासी व्यवस्था, नास्ता, भोजन, वैद्यकीय उपचार व अंघोळीसाठी गरम पाण्याची सुविधा, खेळासाठी क्रीडांगण व मनोरंजनाची साधने उपलब्ध आहेत. प्रशिक्षण कालावधीत अपंगाना स्वखर्चासाठी कमवा शिका योजनेतून विविध उपक्रम राबवून विद्यावेतन दिले जाते. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त अपंगानी   लाभ घावा असे आवाहन  केले आहे.

* * * * * * * *

पंचायत समिती सभापती पद आरक्षण सोडत 30 जून रोजी

           जळगाव, दि. 17 :- जळगाव जिल्हयातील पंचायत समित्यांचे सभापती पदे दि. 12 सप्टेबर 2014 पासून पुढील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला यांचेसाठी सोडत पध्दतीने आरक्षीत करावयाची आहे. त्यासाठी सोडत सभा दिनांक 30 जून 2014 रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवार जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व संबंधितांनी व जिल्हा परिषद अथवा पंचायत समिती क्षेत्रातील ज्या नागरिकांना सदर सभेस उपस्थित राहण्याची इच्छा आहे त्यांनी उपस्थित राहावे, असे जिल्हाधिकारी  रुबल अग्रवाल  यांनी केले आहे.

                                        * * * * * * * *

Saturday, 14 June 2014

बोगस बियाणे विक्री तसेच खत साठेबाजांवर कठोर कारवाई करणार ! जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल


बोगस बियाणे विक्री तसेच
खत साठेबाजांवर कठोर कारवाई करणार !
: जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल
                     
            चाळीसगाव, दिनांक 14 जून :-  जिल्हयात बोगस बियाणे विक्री तसेच खत साठेबाजांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी चाळीसगांव तालुक्यातील तरवाडे येथील ग्रामस्थांच्या सभेमध्ये दिले. यावेळी उप विभागीय अधिकारी  मनोज घोडे पाटील, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, तालुका कृषी अधिकारी वसंत शिंदे आदि उपस्थित होते.
            लोकाभिमुख गतिमान प्रशासनासाठी जिल्हाधिकारी यांनी थेट ग्रामीण भागात जाऊन ग्रामस्थांशी हितगुंज करुन शासकीय योजनांचा आढावा घेण्यासाठी चाळीसगांव तालुक्यातील तरवाडे या गावाला भेट दिली. गावातील साईबाबा मंदीरातील आरतीला उपस्थित राहून मंदीर परिसरातच ग्रामस्थांची सभा घेण्यात आली. या सभेला सरपंच सिंधुताई गरुड, उपसरपंच तुकाराम चौधरी, तंटा मुक्त अभियानचे विलास आप्पा गवळी यांच्यासह तालुका प्रशासनातील अधिकारी कर्मचारी व तरवाडे गावचे ग्रामस्थ महिला, विद्यार्थी,  मोठया संख्येने उपस्थित होते.
            सर्व प्रथम आधारवड योजनेच्या विशेष मोहिमेंतर्गत राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य योजना व विशेष सहाय्य योजनांचा लाभ ‍मिळविण्यासाठी गावातुन सादर झालेल्या प्रस्तावांचा आढावा जिल्हाधिकारी अग्रवाल यांनी घेतला. त्यानंतर प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील, तहसिलदार बाबासाहेब गाढवे व तालुका कृषी अधिकारी वसंत शिंदे यांनी ग्रामीण भागात राबविण्यात येणा-या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना करुन दिली. तदनंतर जिल्हाधिकारी यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यात शिवाजी दशरथ चौधरी यांनी बोगस बियाणे विक्री थांबविण्यासाठी तसेच खत साठेबाजाविरुध्द कारवाई करण्याची विनंती केली. ग्रामस्थ भगवान विसपुते, चेतन अमृतकर, सचिन चौधरी, ताईबाई विक्रम सोनवणे, आबा किसन कोळी, निर्मलाबाई पवार, सुनिल प्रकाश निकम, गजाननकृपा महिला बचतगट यांच्या सह ग्रामस्थांनी शिधापत्रीका, अंत्योदय योजना, अन्न सुरक्षा योजना, कृ‍षि विभागातील सबसिडी, पिण्याचे पाणी,  शौचालय,  प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधांचा अभाव, स्मशान भुमीच्या समस्या, फरशी पुलाचे काम, विज वितरण कंपनीचे खांब आदि मुलभूत समस्या जिल्हाधिका-यांसमोर मांडल्या तर जिल्हाधिकारी अग्रवाल यांनी बोलविलेल्या तालुका प्रशासनातील अधिका-यांना गावक-यांसमक्ष सुचना व मार्गदर्शन करुन त्या तातडीने सोडविण्याच्या सुचना केल्या. ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे कामकाज प्रगती पथावर असून पुढील महिनाभरात पिण्याच्या पाण्याची समस्या मिटणार असल्याचेही जिल्हाधिकारी अग्रवाल यांनी यावेळी सांगितले.
            ग्रामीण भागातील जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी व समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल या आपल्या गावात आल्या असून आपणास मिळालेल्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील यांनी केले तर नाविन्यपुर्ण योजनेत 5 हजार नवीन लाभार्थ्यांना सहभागी करुन घेण्यासाठी आधारवड योजना या विशेष मोहिमेंतर्गत ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी आपल्या प्रस्तावनेतून मांडले.
            साईबाबा मंदीरातील सभा संपल्यानंतर जिल्हाधिकारी अग्रवाल यांनी संपुर्ण गावात फिरुन गावातील जनतेशी संवाद साधला, ग्रामपंचायत कार्यालय, चावडी, स्वस्त धान्य दुकान, आश्रमशाळेची पहाणी करुन गावातील शेतक-यांकडेच रात्रीच्या जेवणाचा खान्देशी आस्वाद देखील त्यांनी घेतला. बायकांनी आपल्या संस्कृती प्रमाणे श्रीमती अग्रवाल यांचा सत्कार केला. एकुणच तालुक्यातील तरवाडे गावाला भेट देऊन जिल्हाधिकारी अग्रवाल यांनी समाधान व्यक्त केले व  तालुका प्रशासनाचे कौतुकही केले.


* * * * * * * *

Monday, 9 June 2014

“ आधार वड ” मुळे वंचितांना मिळणार न्याय !

आधार वड मुळे वंचितांना मिळणार न्याय !
: प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील

                      
            चाळीसगाव, दिनांक 9 जून :-  राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य योजना, विशेष सहाय्य योजना यांच्या प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली आधारवड मोहिम राबविण्यात येत असून यामुळे शासनाच्या योजनेपासून लाभार्थी वंचित राहणार नाही असे  प्रांता‍धिकारी मनोज घोडे पाटील यांनी  तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त बैठकीत सांगितले.
            आधारवड मोहिमेंतर्गत कालबध्द कार्यक्रमाव्दारे राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य योजना व विशेष सहाय्य योजनांतर्गत लाभ मिळण्यांस पात्र असलेल्या जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ होण्याच्या दृष्टीने सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक तसेच तहसिल कार्यालयातील सर्व कर्मचारी यांना कामकाजाची रुपरेषा निश्चित करुन देण्यासाठी  बैठकीचे आयोजन करण्यात आले होते  त्यावेळी ते बोलत होते.
समाजातील ‍ निराधार, वृध्द, भूमीहीन, शेतमजूर,विधवा, अपंग, नैसर्गिक अथवा अपघाती  मृत्यु झालेल्या मयत व्यक्तींचे वारस इ. पैकी ज्या व्यक्ती  स्वत:चा उदरनिर्वाह करु शकत नाहीत अशा निराधार व्यक्तीपैंकी पात्र लाभार्थ्यांना उदर निर्वाहाचे साधन म्हणून वरील विविध योजनांतर्गत  शासनाकडून  अनुदान स्वरुपात  दरमहा किंवा एकरकमी अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनांचा लाभ मिळविण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना बराच कालावधी लागतो. एकंदरीत प्रचलित कार्यपध्दतीमुळे समाजातील वरील घटकांना अर्थसहाय्य मंजूर करण्यास विलंब होत असल्याने केंद्र व राज्य शासनाच्या या योजनांचा लाभ महसूल विभागामार्फत स्वत:हून पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासनातर्फे विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.
प्रशासनातर्फे आजतागायत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दपकाळ निवृत्ती योजनेचे एकूण 6870 लाभार्थी होते त्यासाठी या योजनेतंर्गत 3110 इतके अर्ज प्रशासनाकडे जमा झाले आहेत. तर संजय गांधी निराधार योजनेतंर्गत  1949 लाभार्थी असून 47 नवीन अर्ज जमा करण्यात आले आहेत. श्रावणबाळ सेवा राज्य  निवृत्ती योजनेचे 821 लाभार्थी असून 89 नवीन अर्ज जमा झाले आहेत. अर्थसहाय्य योजना व विशेष सहाय्य योजनेचे तालुक्यात आतापर्यंत एकूण 9680 लाभार्थी असून  या ‍ मोहिमेतंर्गत एकूण 2 हजार नवीन लाभार्थींचे उध्दीष्ठ ठेवण्यात आले आहे. तर प्रशासनातर्फे आधारवड  मो‍हिम  राबविण्यासाठी अहोरात्र कामकाज सुरु असून  ठरवून ‍दिलेल्या उध्दीष्ठापेक्षा ‍ अधिक लाभार्थी  करण्यात येतील असे  प्रांताधिका-यांनी कळविले आहे.
            या विशेष मोहिमेंतर्गत राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य योजना व विशेष सहाय्य योजनांचा लाभ ‍मिळविण्यासाठी ‍संबंधित व्यक्तीने तहसिल कार्यालयाकडे अर्ज न करता संबंधित गावाचे तलाठी व ग्रामसेवक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावातील लाभार्थ्यांचा शोध घेवून त्यांचेकडून विहीत नमुन्यातील अर्ज भरून घ्यावयाचे आहेत. अर्ज मंजूरीसाठी आवश्यक असणा-या कागदपत्रांची पूर्तता करुन तलाठी व ग्रामसेवकांनीच सदर अर्ज तहसिल कार्यालयात जमा करावेत. त्यामुळे अर्जदारांना तहसिल कार्यालयात येवून अर्ज करणे, कागदपत्रांची पूर्तता करणे, अर्ज मंजूरीसंदर्भात पाठपुरावा करणे या साठी त्रास सहन करावा लागणार नाही.
                        एकंदरीत शासनामार्फत राबविण्यात येणा-या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शासन आपल्या दारी हाच प्रमुख उद्देश असून आधार वड मोहिमेचा उद्देश सफल होण्यासाठी सर्व संबंधितांनी सहकार्य करावे असे आवाहन तहसिलदार बाबासाहेब गाढवे तसेच प्रांताधिकारी  मनोज घोडे पाटील यांनी केले आहे.

* * * * * * * *

Wednesday, 4 June 2014

शहरात मोफत जयपूर फूट रोपण शिबीराचे आयोजन

शहरात मोफत जयपूर फूट रोपण शिबीराचे आयोजन

            चाळीसगाव, दिनांक 4 जून :-  पोलीओमुक्त  भारताबरोबर  अपंगमुक्त भारत करण्याचे रोटरी क्लब व महावीर ‍ विकलांग  सहायता ‍ समिती मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने  चाळीसगांव शहरात मोफत जयपूर फूट रोपण (कृत्रीम पाय बसविणे) या शिबीराचे आयोजन दिनांक 09 जून 2014  ते 12 जून 2014 या कालावधीत  शहरातील साईकृष्ण हॉस्पीटल, लक्ष्मीनगर, चाळीसगांव यंथे संपन्न होणार आहे.  तरी चाळीसगांव पंचक्रोशीतील अपंग बंधु-भगिनींनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन  रोटरी क्लब ऑफ चाळीगांवचे अध्यक्ष रोटे. डॉ. सुनिल राजपूत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
            सदर ‍ शिबीरात गरजू  अपंग बंधु-भगिनींना कृत्रीय पाय  बसविण्यात येतील तसेच कॅलीपर्स  व क्रचेसचे वाटपही करण्यात येणार आहे. चार  दिवस चालणा-या या शिबीरात जयपूर फूट व्हॅन मध्ये कृत्रीम पाय बनवि ण्याचे वर्कशॉप कार्यरत राहील. रोटरी क्लबचे सदस्य रोटे.हिरानंद बजाज, सामाजिक कार्यकर्ते अशोकभाई रावलानी यांचे  विशेष सहकार्यातून तसेच डॉ.मंगेश रविंद्र वाडेकर,  रोटे. अनुप परमार व डॉ.अमित जैन यांच्या मदतीने हे  शिबीर घेण्यात येणार आहे. गरजूंनी अधिक ‍ माहितीसाठी संपर्क क्रं. 9579962262, 9604927852, 9822053939, 9822772177 या भ्रमणध्वनींवर संपर्क साधावा. असे आवाहन रोटरी क्लब ऑफ चाळीसगांवचे अध्यक्षांनी  प्रसिध्दी पत्रकान्वये  कळविले आहे.
* * * * * * * *

अंध विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश

            चाळीसगाव, दिनांक 4 जून :-  चाळीसगांव येथील  राष्ट्रीय सहकारी  शिक्षण  प्रसारक मंडळ  संचलीत अंधशाळा चाळीसगांव या संस्थेत सन 2014-2015 या शैक्षणीक वर्षाकरिता  वय 6 ते 12 वर्षे वयोगटातील अंध मुलामुलींना  प्रवेश देणे सुरु आहे. तरी पालकांनी त्वरीत संपर्क साधावा असे आवाहन  मुख्याध्यापिका अंधशाळा चाळीसगांव यांनी केले आहे.
            अंध शाळेत मोफत जेवण, निवास व शिक्षणाची  व्यवस्था असून प्रवेश घेवू  इच्छीणा-या  अंध मुलामुलींनी  पुढील पाच प्रकारच्या कागदपत्रांची पुर्तता करावी (1) अंध असल्याचे जिल्हा शल्य चिकीत्सक  यांचे कडील  त्रिस्तरीय प्रमाणपत्र (2) जन्म तारखेचा दाखला (3) पालकांचा उत्पन्नाचा दाखला (4) अंध ‍व्यतिरीक्त इतर अपंगत्व नाही तसेच इतर आजार नाहीत याचे आरोग्य तपासणी प्रमाणपत्र (5) अंध मुला-मुलींचे पासपोर्ट आकाराचे तीन फोटो वरील कागदपत्रांची पुर्तता करुन  संबंधितांनी  अंधशाळा चाळीसगांव जिल्हा जळगांव च्या मुख्याध्यापिका  श्रीमती प्रभा मेश्राम यांचेशी त्वरीत संपर्क साधावा. संपर्कासाठी दुरध्वनी क्रं. 02589-223426 तर मोबाईल क्रं. 8308279115 असा असून यावर संपर्क साधावा असे आवाहन  प्रसि ध्दी पत्रकान्वये केले आहे.


* * * * * * * *

निरंतर मतदार नोंदणी व वगळणी कार्यक्रम सुरु

निरंतर मतदार नोंदणी व वगळणी कार्यक्रम सुरु
                       
            चाळीसगाव, दिनांक 4 जून :-  017 चाळीसगांव विधानसभा  मतदार संघात  मतदार यादींमध्ये  मयत व दुबार मतदारांच्या नावांच्या याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत. ‍ करिता निरंतर  मतदार नोंदणी  व वगळणी ‍ मोहिम  29 मे, 2014 पासून सुरु करण्यात आली आहे. तरी  चाळीसगांव मतदार संघातील मतदारांनी या  मोहीमेचा लाभ घ्यावा असे आवाहन  मतदार नोंदणी  अधिकारी तथा उपविभागीय  अधिकारी  मनोज घोडे पाटील यांनी केले आहे.
            दिनांक 13.04.2014 ते 22.04.2014 या कालावधीत बी.एल.ओ. यांनी  घरोघरी जाऊन केलेल्या  सर्व्हेक्षणानुसार  017 चाळीसगांव विधानसभा मतदार संघात  यादी  भाग क्रं. 1 ते 325 मध्ये  एकूण मयत मतदारांची संख्या 6535 असून यामध्ये 3664 पुरुष तर 2871 स्त्री मतदारांचा समावेश आहे.  तसेच  दुबार मतदार संख्या 1370 असून यामध्ये 785 पुरुष तर 585 स्त्री मतदारांचा समावेश आहे.
            मयत व दुबार मतदारांची वगळणी ही पडताळणी करुनच करावयाची असल्याने मयत व दुबार  मतदारांच्या याद्या  अवलोकनार्थ  आमदारांसह सर्व राजकीय पक्ष , प्रांत कार्यालय, तहसिल कार्यालय, संबंधीत गावांचे तलाठी व शहरातील  मतदारांसाठी  मुख्याधिकारी  न.प.चाळीसगांव  यांचे  कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आल्या असुन प्रत्येक मतदारांने आपल्या नावाची मतदार यादीत नाव असल्याची खातरजमा व पडताळणी करुन घ्यावी.
मा.भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार  दिनांक 01.01.2014 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादींचा  विशेष पुर्ननिरीक्षण कार्यक्रम दिनांक 9 जून ते 30 जून 2014 या कालावधीत होत असून यामध्ये नवीन नाव नोंदणी, यादीतील नावास आक्षेप अथवा नाव वगळणी, यादी तपशिलातील दुरुस्ती, यादीतील नोंदीचे स्थानांतर  या कामी आवश्यक असलेले  नमुना फॉर्म क्रं. 6 ते 8 व 8-अ  भरुन तसेच फोटो नसलेल्या मतदारांनी फोटो संबंधीत बी.एल.ओ. यांचेकडे जमा करावेत ज्या मतदारांची नांवे यापूर्वी वगळली गेली असल्यास किंवा मतदार यादीत नाव आलेले नसल्यास संबंधीतांनी नव्याने फॉर्म नं.6 भरुन देण्याचे  आवाहनही मतदार नोंदणी अधिकारी तथा उप विभागिय अधिकारी, मनोज घोडे पाटील यांनी  प्रसिध्दी  पत्रकान्वये केले आहे.


* * * * * * * *

Monday, 2 June 2014

मागासवर्गीय मुलींना वसतीगृहातील प्रवेशासाठी आवाहन

मागासवर्गीय मुलींना वसतीगृहातील प्रवेशासाठी आवाहन

                      
            चाळीसगाव, दिनांक 2 जून :- महाराष्ट्र शासनाच्या  सामाजिक न्याय विभागाच्या मान्यतेने कार्यरत असलेले मंदोदरी कन्या छात्रालय, चाळीसगांव येथे इ.5 वी ते 10 वी च्या वर्गातील ‍ प्रवेशेच्छुक विद्यार्थिनींना  मोफत प्रवेशासाठी संपर्क साधण्याचे आवाहन मंदोदरी कन्या छात्रालयाचे  सचिव अशोक खलाणे  यांनी  प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
            सदर वसतीगृहात निवासाची  तसेच  भोजनाची विनामुल्य सोय असुन  प्रवेशासाठी तालुक्यातील  अनु.जाती, अनु.जमाती  व भटके विमुक्त जातीतील विद्यार्थीनींनी  वा  पालकांनी  मंदोदरी कन्या छात्रालय, जयहिंद हायस्कुल जवळ, विद्युत ‍ सरीता कॉलनी , धुळे रोड, चाळीसगांव  दुरध्वनी क्रं. 02589-227939 येथे संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे.

                                                                   * * * * * * * *