Wednesday, 9 October 2024

मानवतेचा, दातृत्त्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला

                      मानवतेचादातृत्त्वाचाविश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला
देवेंद्र फडणवीस यांची रतन टाटांना श्रद्धांजली

         मुंबईदिनांक १० : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाने अवघ्या देशाला मानवतेच्या श्रीमंतीची अनुभूती देणारे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेले आहेत्यांच्या निधनाने मानवतेचादातृत्त्वाचाविश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला आहेअसे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.

            रतन टाटा एक यशस्वी उद्योजक तर होतेच. पण त्याहीपलिकडे ते देशाला ठावूक होते. कायम समाजाचा विचारमाणुसकी आणि विनम्रतेचे ते मूर्तिमंत होते. शिक्षणग्रामोन्नती आणि कुपोषणआरोग्याच्या क्षेत्रात त्यांनी केलेले काम उल्लेखनीय असेच आहे. देशाच्या आर्थिक विकासासोबतच मानवतेच्या विकासात त्यांनी लावलेला हातभार अत्यंत मोठा आहे. समाजातून कमावलेले समाजालाच परत केले पाहिजेया श्रद्धेनेच ते कायम जगले. फार पूर्वी टाटा ट्रस्टने कर्करोग रुग्णांसाठी सुरु केलेल्या सुविधा असोतकिंवा अलिकडे मुंबईत सुरु केलेले प्राण्यांचे रुग्णालय असो हे त्यांच्यातील करुणेचा परिचय देते. रतन टाटा यांच्यासोबत अनेकदा भेटीची संधी मला प्राप्त झाली. मी.मुख्यमंत्री असताना राज्यात व्हीलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशनची निर्मिती आम्ही केलीत्यावेळी बहुतेक बैठकांना ते येत असत. अतिशय सक्रिय राहून त्यांनी राज्य शासना सोबत काम केले होते. त्याच काळात राज्यातील गुंतवणूक वाढीसाठी मॅग्नेटिक महाराष्ट्रचे आयोजन केलेतेव्हाही ते सातत्याने सोबत होते. नागपुरात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटची स्थापना केलीतेव्हा सातत्याने त्यांचे मार्गदर्शन आणि सक्रिय पाठिंबा प्राप्त झाला. त्यांचे जाणेही महाराष्ट्राचीदेशाची मोठी हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोअसे देवेंद्र फडणवीस यांनी शोक संदेशात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment