जळगांव, दि. 12 - आदिवासी विकास विभागामार्फत राज्यातील अनुसूचित
जमातीच्या विद्यार्थ्यांना बॅकेमार्फत भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण फी
योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने ई – स्कालरशिप योजना सन 2012 – 13
या चालु शैक्षणिक वर्षात अंमलबजावणी होणार आहे. त्यासाठी http://etribal.maharashtra.gov.in
या संगणक प्रणालीवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
सन 2012-13 या वर्षात
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल यांचे अधिनस्त असलेल्या
जळगांव जिल्हयातील मॅट्रीकेत्तर शिक्षण घेणा-या अनुसूचित जमातीच्या शिष्यवृत्तीस
पात्र विद्यार्थ्यांनी कोर बॅकींग (राष्ट्रीयकृत बॅकेत) खाते उघडण्यात यावे. जेणे
करुन ऑनलाईन ॲप्लीकेशनव्दारे भारत सरकार शिष्यवृतीचा लाभ मिळू शकेल.
तरी जळगांव
जिल्हयातील सर्व संबंधीत विद्यार्थी / विद्यालय यांनी याबाबत तातडीने अमंलबजावणी
करावी असे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक
आदिवासी विकास प्रकल्प यावल यांनी केले
आहे.
0 0 0 0 0
No comments:
Post a Comment