जळगांव, दि. 19 :- केंद्र शासनाने भारतीय कृषि पिक विमा कंपनीच्या सहकार्याने जळगांव जिल्हयात अधिसूचित पिकांसाठी राष्ट्रीय पिक विमा योजना लागू केली असून सदरच्या योजनेत जिल्हयातील शेतक-यांनी 31 जुलै 2012 पर्यंत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी के.एस. मुळे यांनी केले आहे.
पिक निहाय पिक संरक्षण हप्ता दर व विमा संरक्षित रक्कम तसेच या योजनेविषयी अधिक माहितीसाठी सर्व तालुका कृषि अधिकारी कार्यालये, जळगांव / पाचोरा / अंमळनेर उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालये, आणि जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जळगांव कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
0 0 0 0 0
No comments:
Post a Comment