जळगांव- सैन्य
व पोलीस दलात
भरती होऊ इच्छिणा-या
जळगांव जिल्हयातील युवकांसाठी त्यांच्या पात्रतेप्रमाणे व कमीत
कमी खर्चात प्रशिक्षण देऊन भरती
योग्य बनविण्यासाठी महाराष्ट्र शासन अंगिकृत
असलेल्या माजी सैनिक
महामंडळाव्दारे करंज नाका, सातारा
येथे प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहे. येथे
30 (तीस) दिवसांच्या प्रशिक्षणासाठी निवास व भोजनासह एकुण शुल्क
रु. 5200 (पाच हजार दोनशे)
आकारले जाते. तरी
इच्छूक उमेदवारांनी (10 वी व 12 वी पास असल्याचे गुणपत्रक व शाळा
सोडल्याचा दाखला) शैक्षणिक प्रमाणपत्रांसह निवड चाचणीसाठी
दिनांक 26 मे 2012
रोजी सकाळी 9.00 वाजता
सैनिकी मुलांचे वसतिगृह,
जी.एस. ग्राऊंडजवळ,
जळगांव येथे हजर
रहावे. चाचणीनंतर पात्र ठरलेल्या
युवकांना सदर प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जाईल. प्रवेश
शुल्क रक्कम रुपये
200/- मात्र
त्वरीत भरुन उमेदवाराने
आपला प्रवेश निश्चित करावा. या प्रशिक्षण
केंद्रामध्ये पात्र विद्यार्थ्यांकडून सैन्यात भरती होण्यासाठी सर्व प्रकारची
तयारी करुन घेतली
जाते. यात शारिरीक
चाचणीमध्ये - रनिंग, मैदानी
खेळ,
पुलप्स,
लॉग जम्प व गोळा फेक इत्यादी
तसेच इतर विषयांमध्ये
लेखी परीक्षेकरिता जनरल नॉलेज, इंग्रजी, गणित
या विषयांची तयारी करुन
घेतली जाते. तरी
जळगांव जिल्हयातील युवकांनी या योजनेचा
जास्तीत जास्त लाभ
घ्यावा,
असे आवाहन कॅप्टन
मोहन कुलकर्णी,
जिल्हा सैनिक कल्याण
अधिकारी,
जळगांव यांनी केले
आहे.
No comments:
Post a Comment