जळगांव,
दि. 1 :- देशामधील
पोस्टाची सेवा हि सामाजिक व आर्थिक जीवनाचा एक अभिन्न
अंग आहे. देशातील
प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये अपरोक्षपणे पोस्टाच्या सेवेचे एक वेगळया
प्रकारचे स्थान निर्माण
करुन प्रभावित केले आहे.
पोस्टाचे खाते हे लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा
प्रयत्न करते व ग्राहकांचे जास्तीत जास्त संतोषाधिक्य
अथवा समाधान वाढविते. हि सेवा
देतांना संभाषणामध्ये,
पत्रव्यवहारामध्ये किंवा सेवेमधील
काही त्रुटीमुळे असे काही
प्रसंग निर्माण होतात की, त्यामुळे
पोस्टाच्या सेवेबद्दल तक्रार करण्याची वेळ येते.
हया तक्रारींचा योग्य प्रकारे
न्याय निवाडा करण्यासाठी पोस्टाच्या खात्याने वेळोवेळी डाक अदालत
घेण्याचे ठरविले आहे. त्यामध्ये
पोस्टाचे अधिकारी तक्रारदारांना प्रत्यक्षपणे भेटतात आणि त्यांच्या
तक्रारीची दखल घेऊन
त्या लवकरात लवकर सोडविण्याचा
प्रयत्न करतात.
अधिक्षक डाकघर, जळगांव विभाग जळगांव 425001 व्दारा दिनांक 25 जून 2012 रोजी सकाळी 11.00 त्यांच्या कार्यालयात डाक अदालत आयोजित करण्यात आलेली आहे. पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे सहा आठवडयांच्या आत निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल, स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बॅक, मनी आर्डर, इ. बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारीचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा. उदा. तारीख व ज्या अधिका-यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव व हुद्दा इत्यादी संबंधितांनी डाकसेवेबाबतची आपली तक्रार दोन प्रतीत एम.एस. जगदाळे, डाक निरीक्षक (तक्रार) अधिक्षक डाकघर यांचे कार्यालय, 1 ला माळा, हेड पोस्ट ऑफिस बिल्डिंग, जळगांव 425001 यांच्या नावे अतिरिक्त प्रती सह दिनांक 18 जून 2012 पर्यत अथवा तत्पूर्वी पोहचेल, अशा बेताने पाठवावी. तदनंतर आलेल्या तक्रारींवर कारवाई केली जाईल. परंतु त्यांचा डाक अदालत अंतर्गत विचार केला जाणार नाही. असे अधिक्षक डाकघर, जळगांव विभाग जळगांव 425001 यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
* * * * * *
No comments:
Post a Comment