मुख्यंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत जिल्ह्यातील यात्रेकरू सोमवारी सकाळी 9.50 वाजता निघणार जळगाव स्टेशनवरून
जळगाव, दिनांक 30 सप्टेंबर ( जिमाका ) : मुख्यंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत जिल्ह्यातील यात्रेकरू सोमवारी सकाळी 9.50 वाजता जळगाव स्टेशनवरून अयोध्याला निघणार आहेत.
शासन निर्णय १४ जुलै २०२४ अन्वये राज्यातील जेष्ठ नागरिक जे ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, त्यांना भारतातील तीर्थश्रेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये भारतातील एकुण ७३ तर महाराष्ट्र राज्यातील एकुण ६६ तिर्थस्थळांचा समावेश आहे.
या योजनेसाठी जळगांव जिल्हयाला एकुण १००० उदिष्ट होते. सदर योजनेअंतर्गत पहिल्या टप्यासाठी श्रीराम मंदिर, अयोध्या हे स्थळ निश्चीत करण्यात आले आहे सदर योजनेसाठी जिल्हयातुन एकुण ११७७ अर्ज प्राप्त झाले होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली असून या समितीने एकुण ८०० लाभार्थीची या योजनेसाठी लॉटरी पध्दतीने निवड केली आहे. श्रीराम मंदिर, अयोध्या येथे जाण्यासाठी IRCTC यांच्या समंतीने रेल्वे प्रवासाचे नियोजन करण्यात आलेले आहे. दि.३०/९/२०२४ रोजी सकाळी ९-५० वाजता जळगांव येथुन या तिर्थयात्रेचा शुभारंभ होणार आहे. दि.१/१० / २०२४ रोजी यात्रा अयोध्या येथे पोहोचणार आहे. दोन दिवस अयोध्या येथे थांबून दि.४/१०/२०२४ रोजी जळगांव येथे यात्रेचे परतीचे आगमन होणार आहे.
No comments:
Post a Comment