पिक विमा योजना शेतक-यांच्या हिताची
खरीप हंगाम 2014-15 साठी केंद्र शासनाने भारतीय कृषी पिक विमा कंपनीच्या
सहकार्याने पिक विमा योजना सुरु केली आहे. शेतकरी बांधवांसाठी ही योजना हितकारक व
लाभकारक आहे. ही योजना समजावून घेऊन जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी योजनेत सहभागी
व्हावे, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.
राज्य व केंन्द्र सरकार मार्फत खरीप हंगाम 2014 साठी लागू
केलेल्या राष्ट्रीय कृषि पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचा अंतिम मुदत जळगाव
जिल्हयासाठी पिक निहाय पुढील प्रमाणे आहे.
पीक ज्वारी, बाजरी, मका उडीद, मुग , तूर,
भुईमुग, तीळ, सोयाबीन, कापूस, कांदा पीक पेरणी पासून 1 महिना किंवा 31 जुलै 2014
या पैकी जे आधी असेल ते, ऊस (आडसाली) , लागवडी पासून 1 महिना किंवा 3. सप्टेंबर
2014 या पैकी जे आधी असेल ते, ऊस (पूर्व हंगामी) , लागवडी पासून 1 महिना किंवा 31
डिसेंबर 2014 या पैकी जे आधी असेल ते, ऊस
(सुरु) लागवडी पासून 1 महिना किंवा 31 मार्च
2015 या पैकी जे आधी असेल ते, ऊस (खोडवा) लागवडी पासून 1 महिना किंवा 31 मे
2015 या पैकी जे आधी असेल ते,
उत्पन्नावर
आधारीत भरपाई
या योजनेतून पूर, चक्रीवादळ, भुस्खलन व गारपीट ऊस (खोडवा या स्थानीक
नैसर्गिक आपत्तीमुळे होणा-या नुकसानी पासून विमा सरंक्षण पुरविण्यात येणार आहे. या
साठी कृषि आयुक्तालया मार्फत सादर करण्यात आलेल्या राज्य शासनाच्या पीक
उत्पादनाच्या अंदाजासाठी घेण्यात येणा-या पीक सर्व्हेक्षण अंदाजाच्या पीक कापणी
प्रयोगावर आधारीत सरासरी उत्पन्नाची आकडेवारी ग्राहय धरण्यात येणार आहे.
यासाठी अधिसुचित मंडळ किंवा मंडळ गटात किमान 10
पीक कापणी प्रयोग आणि अधिसुचित तालुका किंवा गटामध्ये किमान 16 पीक कापणी प्रयोग
घेणे बंधनकारक आहे. या प्रयोगावर आधारीत खरीप पिकांची सरासरी उत्पन्नाची आकडेवारी
विमा कंपनीला पाठविण्याची जबाबदारी कृषि विभागामार्फत पार पाडण्यात येत आहे.
वैयक्तिक
पातळीवर भरपाई
पूर, चक्रीवादळ, भुस्खलन व गारपीट या स्थानिक
आपत्तीमुळे होणारे नुकसान भारतीय कृषि विमा कंपनीकडून वैयक्तिक स्तरावर पंचनामे
करुन निश्चित करण्यात येणार आहे. यासाठी स्थानिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास संबधित
शेतक-यांनी ज्या बॅकेमार्फत योजनेत भाग घेतला आहे त्यांना किंवा भारतीय कृषि विमा
कंपनीला नुकसान झाल्यापासून 48 तासाच्या आत नुकसानग्रस्त अधिसुचित पिकांची माहिती
व नुकसानीचे कारण व प्रमाण कळविणे आवश्यक आहे. यानंतर विमा कंपनी मार्फत जिल्हा
महसूल विभाग किंवा कृषि विभागाच्या मदतीने भरपाईचे प्रमाण निश्चित करण्यात येणार
आहे. हवामान आधारीत पीक विमा योजना खरीप हंगाम 2014 मध्ये जे शेतकरी सहभागी होउ
शकले नाहीत अशा सर्व शेतक-यांना सदर योजना लागू राहील. सदर योजना कर्जदार
शेतक-यांसाठी बंधनकारक तर बिगर कर्जदार शेतक-यांना ऐच्छिक स्वरुपाची आहे. तसेच
अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना विमा हप्त्यामध्ये 10 टक्के सुट राहील.
विमा हप्ता दर पिक निहाय विमा संरक्षित रक्कम व शेतक-यांना
भरावयाची विमा हप्ता रक्कम पुढील प्रमाणे आहे. -
खरीप हंगाम 2014-15 पीक निहाय प्रति हेक्टरी विमा
हप्ता दर व रक्कम
अक्र
|
पीक
|
जोखीम
स्तर (टक्के)
|
सर्वसाधारण
विमा संरक्षण प्रति हेक्टर
(उंबरठा
उत्पन्न् पातळी पर्यंत)
|
अतिरिक्त
विमा संरक्षण प्रति हेक्टर
(उंबरठा
उत्पनाच्या 150टक्के पर्यंत)
|
||||
विमा
संरक्षित रक्कम
|
शेतक-यांनी
अदा करावयाची विमा हप्ता
|
विमा
संरक्षित रक्कम
|
शेतक-यांनी
अदा करावयाची विमा हप्ता
|
|||||
1
|
ख.
ज्वारी
|
60
|
11800
|
266
|
295
|
17700
|
1505
|
1505
|
2
|
बाजरी
|
60
|
6400
|
202
|
224
|
9600
|
1872
|
1872
|
3
|
मका
|
60
|
21400
|
482
|
535
|
32000
|
1360
|
1360
|
4
|
उडीद
|
60
|
13100
|
295
|
328
|
19600
|
4704
|
4704
|
5
|
मुग
|
60
|
12100
|
272
|
303
|
18100
|
5068
|
5068
|
6
|
तुर
|
60
|
18700
|
421
|
468
|
28000
|
2520
|
2520
|
7
|
भुईमुग
|
60
|
23800
|
750
|
833
|
35600
|
4628
|
4628
|
8
|
तीळ
|
60
|
8100
|
255
|
284
|
12000
|
1920
|
1920
|
9
|
सोयाबीन
|
60
|
17200
|
542
|
602
|
25800
|
4902
|
4902
|
10
|
कापूस
|
60
|
21200
|
2480
|
2756
|
31900
|
4147
|
4147
|
11
|
कांदा
|
60
|
97000
|
14841
|
16490
|
145400
|
24718
|
24718
|
12
|
ऊस(आडसाली)
|
80
|
181100
|
13039
|
14488
|
158500
|
12680
|
12680
|
13
|
ऊस(पूर्व
हंगामी )
|
80
|
157100
|
10604
|
11783
|
137400
|
10305
|
10305
|
14
|
ऊस (सुरु)
|
80
|
144300
|
10390
|
11544
|
126200
|
10096
|
10096
|
15
|
ऊस (खोडवा)
|
80
|
124300
|
9509
|
10566
|
108700
|
9240
|
9240
|
तरी सर्व शेतक-यांनी सदर विमा योजनेत सहभागी
होण्यासाठी आपले बॅक खाते ज्या राष्ट्रीयकृत व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या
शाखेत आहे त्या बॅकेशी संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी उपविभागीय कृषि अधिकारी, जळगाव
(0257- 222931 उपविभागीय कृषि अधिकारी,) अंमळनेर (02587 - 222516) उपविभागीय कृषि
अधिकारी, पाचोरा (02596 - 244343) येथे संपर्क साधावा. या योजनेचा लाभ घ्यावा, असे
आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जळगाव यांनी केले आहे.
जिल्हा माहिती
कार्यालय,
जळगाव.
No comments:
Post a Comment