जळगावकरांना
तीन दिवस वैचारिक,साहित्यिक,सांस्कृतिक मेजवानी
‘ग्रंथोत्सव’चे 17 फेब्रुवारीला उदघाटन
जळगाव,दि.१० - महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई, जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव व राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान जिल्हा परिषद जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव येथे दिनांक १७,१८ व १९ फेब्रुवारी रोजी ‘जळगाव ग्रंथोत्सव २०१४-१५’ चे आयोजन करण्यात आले आहे. वैचारिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक मेजवानी ठरणा-या या ग्रंथोत्सवात जिल्ह्यातील जनतेने सहभागी होऊन वाचनसंस्कृती अधिक बळकट करण्यात योगदान द्यावे, असे आवाहन ग्रंथोत्सव संयोजन समितीच्या अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांनी केले.
शहरातील लेवा बोर्डींगच्या सभागृहात आयोजित तीन दिवसीय ग्रंथोत्सवाच्या आयोजनाची माहिती देण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी श्रीमती अग्रवाल बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.आस्तिककुमार पांडेय, जिल्हा माहिती अधिकारी श्री.किशोर गांगुर्डे यांचेसह ग्रंथोत्सव संयोजन समितीचे सदस्य आणि दैनिक ‘पुण्यनगरी’ चे संपादक श्री.अनिल पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री.चंद्रशेखर ठाकूर, माहिती अधिकारी श्री.मिलिंद दुसाने, उपशिक्षणाधिकारी श्री.अनिल सोनार आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाच्या माध्यमातून जळगाव जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग देखील या ग्रंथोत्सवात संयुक्तपणे सहभागी होत असून शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करुन ती जोपासणे, वाचन संस्कृती निर्माण करण्याचा उद्देश असल्याचे श्री. आस्तिककुमार पांडेय यांनी यावेळी सांगितले.
ग्रंथदिंडीने प्रारंभ
या ग्रंथोत्सवानिमित्त
मंगळवार दि.17 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता ग्रंथदिंडीचे आयोजन केले जाणार आहे. शहरातील काव्य रत्नावली चौक ते लेवा बोर्डींग असा या दिंडीचा मार्ग असेल. दिंडीचे पूजन लेवा एज्युकेशन युनियनचे अध्यक्ष डॉ.सुभाष चौधरी यांच्या हस्ते होऊन दिंडीचा प्रारंभ होईल. दिंडीचा समारोप लेवा बोर्डींग या ग्रंथोत्सवस्थळी
होईल.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आस्तिककुमार पांडेय, डॉ. जालिंदर
सुपेकर, पोलीस अधीक्षक, श्री.गुलाबराव खरात, अप्पर जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
‘ग्रंथोत्सव-2014-15’ चे शानदार उदघाटन
सकाळी साडेदहा वाजता राज्याचे महसूल, पुनर्वसन व
मदत कार्य, भूकंप पुनर्वसन, अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ, कृषी आणि फलोत्पादन, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्यव्यवसाय, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य
तथा जळगावजिल्ह्याचे
पालकमंत्री ना. श्री. एकनाथराव खडसे
यांच्या शुभहस्ते या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार असून राज्याचे जलसंपदामंत्री ना. श्री.गिरीश महाजन या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक, लेखक श्री.प्रभाकर श्रावण चौधरी हे भूषविणार आहेत.
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती प्रयागताई कोळी, महापौर श्रीमती
राखीताई सोनवणे, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मो.हुसेन खान उर्फ अमीरसाहब, राज्यसभेचे खासदार श्री. ईश्वरलाल जैन, खासदार श्री.ए.टी. नाना पाटील, रावेरच्या खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, विधानपरिषद सदस्य आ. गुरुमुख जगवाणी, आ. डॉ.श्री. सुधीर तांबे, आ. डॉ. अपूर्व
हिरे, आ. श्रीमती
स्मिताताई वाघ, विधानसभा सदस्य
सर्वश्री आ. गुलाबराव पाटील, आ.सुरेश भोळे, आ.चंद्रकांत सोनवणे,आ. हरिभाऊ जावळे, आ. संजय सावकारे, आ. शिरीष चौधरी, आ. डॉ. सतिश
पाटील, आ.उन्मेश
पाटील, आ. किशोर
पाटील, पाचोरा, जिल्हा
परिषदेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, शिक्षण व आरोग्य समिती सभापती सुरेश धनके, समाजकल्याण सभापती
सौ.दर्शना घोडेस्वार, सभापती, महिला व
बालकल्याण समिती सभापती सौ. नीता चव्हाण, कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती सौ.मीनाताई पाटील, महाराष्ट्र राज्य
साहित्य संस्कृती मंडळाच्य सचिव श्रीमती मीनाक्षी पाटील, जिल्हाधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.आस्तिककुमार पांडेय, पोलीस अधीक्षक
डॉ. जालिंदर सुपेकर, महापालिका आयुक्त संजय कापडणीस, शिक्षण उपसंचालक श्री.बी.एस. सूर्यवंशी,
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. आय.सी.शेख आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती अग्रवाल यांनी यावेळी सांगितले.
वैचारिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
उद्घाटन सत्रानंतर, दुपारी 2 वाजता ‘विद्यार्थ्यांच्या वाचन संस्कृती-संवर्धनासाठी शिक्षक-पालकांची भूमिका’ या विषयावर परिसंवाद होईल. त्याच्या अध्यक्षस्थानी डॉ.किसन
पाटील हे राहतील तर डॉ. हारुन शेख, प्रा.आशुतोष पाटील, निर्मला फालक, वैजयंती तळेले हे मान्यवर त्यात आपले विचार मांडतील. सायंकाळी चार वाजता शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. सायंकाळी सहा वाजता कथाकथनाच्या कार्यक्रमात माया धुप्पड, दीपक कासोदे, पौर्णिमा हुंडीवाले, गोकुळ बागुल हे कथाकार आपल्या कथा सादर करतील.
बुधवार दि.18 रोजी सकाळी 9 वाजता शालेय विद्यार्थ्यांसाठी कथाकथन, गीतगायन आणि एकांकिका स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी 11 वाजता ‘सोशल
मिडिया आणि वाचनसंस्कृती’ या विषयावर
परिसंवाद होईल.परिसंवादाचे अध्यक्षस्थानी
मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार श्री.युवराज मोहिते हे राहतील. या परिसंवादात दैनिक सकाळचे निवासी संपादक श्री.भालचंद्र पिंपळवाडकर, दै. जनशक्तीचे
कार्यकारी संपादक श्री. विक्रांत पाटील
यांचेसह अमोल बाविस्कर, कु.किरण
महाजन हे युवा प्रतिनिधी सहभागी होतील. दुपारी 2 वाजता साहित्यिकांच्या प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमात डॉ.किसन पाटील, अशोक कोतवाल, प्रकाश किनगावकर, उत्तम कोळगावकर, अशोक कोळी आदी साहित्यिक सहभागी होतील.
‘स्पर्धा परीक्षेसाठी वाचन’ विशेष सत्र
स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांसाठी ‘स्पर्धा परीक्षेसाठी वाचन’ या विषयावर
जिल्हाधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.आस्तिककुमार पांडेय, पोलीस अधीक्षक
डॉ. जालिंदर सुपेकर
हे मान्यवर अधिकारी दि. 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी आपले अनुभव सांगतील. या सत्रात सहभागी मान्यवर अधिका-यांकडून
स्पर्धा परीक्षांची तयारी करणा-या विद्यार्थ्यांना वक्त्यांकडून पाहिजे असलेली माहिती, स्पर्धा परीक्षा
सरावातील त्यांच्या अडचणी, शंका जिल्हा
माहिती कार्यालयाकडे पाठविल्यास या व्याख्यानात या शंकांचे, प्रश्नांचे निरसन
करणे सोयीचे होईल असेही जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी यावेळी सांगितले. जिल्हा माहिती
कार्यालय, जळगाव येथे
अथवा djdiojalgaon@gmail.com या इमेलवर आपले स्पर्धा परीक्षांविषयक प्रश्न, शंका पाठविण्याचे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी श्री.गांगुर्डे यांनी यावेळी केले.
खान्देशी लोककलांचे दर्शन
बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. तसेच विनोद ढगे आणि त्यांचे सहकारी खान्देशी लोककलांचा अविष्कार हा कार्यक्रम सादर करतील.
वाचनसंस्कृतीवर वादविवाद स्पर्धा व परिसंवाद
शेवटच्या दिवशी सकाळी 9 वाजता ‘संगणकक्रांतीमुळे वाचनसंस्कृतीवर विपरित परिणाम झाला आहे काय?’ या विषयावर शिक्षकांसाठी वादविवाद स्पर्धा होईल.त्यानंतर सकाळी 11 वाजता ‘वाचनसंस्कृतीची जोपासना-वृत्तपत्रांचे योगदान’ या विषयावर परिसंवाद होईल.या परिसंवादाचे अध्यक्षस्थानी दैनिक गावकरीचे संपादक धों.ज. गुरव राहणार
आहेत. या
परिसंवादात देशदूतचे संपादक हेमंत अलोने, लोकमतचे आवृत्तीप्रमुख मिलिंद कुलकर्णी, दिव्यमराठीचे आवृत्तीप्रमुख
त्र्यंबक कापडे, तरुण भारतचे
आवृत्तीप्रमुख दिलीप तिवारी, महाराष्ट्र टाईम्सचे ब्युरो चीफ गौतम संचेती, देशोन्नतीचे आवृत्तीप्रमुख
मनोज बारी, साईमतचे संपादक प्रमोद ब-हाटे, हे वृत्तपत्रक्षेत्रातील मान्यवर सहभागी होतील. दुपारी दोन
वाजता शालेय विद्यार्थी काव्यवाचन सादर करतील.
संतसाहित्यावर विशेष व्याख्यान व ग्रंथपालांच्या सत्काराने समारोप
सायंकाळी पाच वाजता मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार तथा ह.भ.प. श्री.श्यामसुंदर सोन्नर यांचे ‘संतसाहित्य आणि प्रबोधन’ या विषयावर
व्याख्यान होईल.त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता जलसंपदा मंत्री ना.श्री. गिरीश महाजन
यांच्या हस्ते वाचनसंस्कृती वाढविण्यास योगदान देणा-या ज्येष्ठ ग्रंथपालांचा व बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे आणि बहिणाबाई चौधरी यांच्या वारसांचा सत्कार करुन समारोप करण्यात येईल. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.आस्तिककुमार पांडेय, पोलीस अधीक्षक
डॉ. जालिंदर सुपेकर, महापालिका आयुक्त संजय कापडणीस हे मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले.
स्टॉल बुकींगसाठी संपर्क साधण्याचे आवाहन
या ग्रंथोत्सवात विविध प्रकाशकांच्या
पुस्तक विक्रीचे स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. स्थानिक पुस्तक विक्रेते व प्रकाशकांनी तसेच बाहेरगावच्या प्रकाशकांनी स्टॉल बुकींगसाठी जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, टप्पा क्रमांक 3, पहिला मजला, जळगाव. संपर्क क्रमांक
0257-2229628 व 2221078 वर संपर्क
साधण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिका-यांनी केले.
दुर्मिळ ग्रंथ खरेदीची पर्वणी
तीन दिवस चालणा-या ग्रंथप्रदर्शनात
विविध विषयांवरचे ग्रंथ विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. खाजगी प्रकाशकांसोबतच शासकीय प्रकाशनांचे दालनही उभारण्यात येणार आहे.त्यातील अनेक दुर्मिळ शासकीय प्रकाशने जिज्ञासू वाचकांना पाहता व खरेदी करता येतील.
वाचक, अभ्यासक- साहित्यप्रेमींना आवाहन
तीन दिवसीय ‘जळगाव ग्रंथोत्सव 2014-15’ चा जळगाव
जिल्ह्यातील साहित्यप्रेमी
वाचक, संशोधक, अभ्यासक, विद्यार्थी आणि जिज्ञासूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन
जिल्हाधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय, तसेच
ग्रंथोत्सव संयोजन समितीचे सदस्य श्री. अनिल पाटील, डॉ.किसन पाटील, रंगराव पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री.चंद्रशेखर ठाकूर, शिक्षणाधिकारी श्री.शशिकांत हिंगोणेकर, माहिती अधिकारी श्री.मिलिंद दुसाने, उपशिक्षणाधिकारी एस.टी.वराडे आणि समितीचे सदस्य सचिवजिल्हा माहिती अधिकारी श्री. किशोर गांगुर्डे यांनी केले
आहे.
*
* * * * * * * * * *
No comments:
Post a Comment