पंतप्रधान
जन धन योजना
बॅंक
खाते उघडणे आता अधिक सोपे …
देशाचे पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक कुटूंबात किमान एक तरी बॅंक खाते असावे, ही
महत्त्वाकांक्षी योजना ‘प्रधानमंत्री जनधन’ या नावाने सुरु केली आहे. पहिल्या
टप्प्यात 7.50 कोटी कुटूंबांना बॅंक खात्यांच्या कार्यक्षेत आणावयाचे आहे. या
योजनेचा जास्तीत जास्त लोकांना लाभ घेता यावा यासाठी बॅक खाते सुरु करण्याची
प्रक्रिया रिजर्व बॅंकने मार्गदर्शन करुन अधिकाधिक सहज व सोपी केली आहे. त्यासाठी
रिजर्व बॅंकेने काही सुचना जारी केल्या आहेत. योजना जाहीर झाल्यापासून 4 ऑक्टोबर
2014 पर्यंत 5.5 कोटी खाती उघडण्यात आली आहेत. या योजनेची व्याप्ती वाढवून
अधिकाधिक कुटूंबांना यात सहभागी करुन घेण्यासाठी बॅंकांना घरोघरी जाऊन सर्वेक्षण
करण्यास सांगण्यात आले आहेत. त्यानुसार ज्या ज्या कुटूंबांचे बॅंक खाते नाहीत
त्यांना खाते उघडण्यास योग्य त्या सुविधा पुरवावयाच्या आहेत. त्यासाठी रिजर्व बॅंकेने केवायसी (KYC- Know
Your Coustomer) निकष अधिक सुलभ केले
आहेत. या योजनेअंतर्गत उघडावयाच्या बॅंक
खात्यांसाठी प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या
दुर्बल घटक, फेरीवाले, विक्रेते, घरकाम करणारे, सुरक्षा रक्षक, रोजंदारी किंवा नैमित्तिक
कामगार अशा घटकांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. अधिकाधिक लोकांना या
बॅंकींगच्या छत्रछायेत आणण्यासाठी खालील प्रमाणे उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
1) ओळख आणि
रहिवासाचा एकच पुरावाः ओळख आणि रहिवास दोघांचे वेगवेगळे दोन पुरावे देण्याची
आवश्यकता नसून आता एकच पुरावा देता येईल. त्यातही
पासपोर्ट , ड्रायव्हिंग लायसेन्स,
निवडणूक ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, राज्यशासनाने दिलेले नरेगाचे
रोजगार कार्ड यांचा त्यात समावेश आहे.
2) तात्पुरता
पत्ता म्हणून वेगळा पुरावा देण्याची आवश्यकता नाहीः ज्या घटकांना या योजनेत
समाविष्ट करावयाचे आहे त्यात स्थलांतरीत मजूर, बदली होणारे कर्मचारी आदींचा समावेश
असल्याने त्यांना तात्पुरता पत्ता म्हणून पुरावा देण्यात ब-याचदा अडचणी येतात.
त्यामुळे अशा व्यक्तींनी कायमचा पत्ता व तात्पुरता पत्ता असे दोन वेगवेगळे पुरावे
देण्याची आवश्यकता नाही. तसेच पत्ता बदल
करतांना आपल्या पत्ता बदलाबाबत स्वतःचे एक प्रकटन द्यावयाचे आहे.
3) खाते
स्थलांतरीत करतांना पुन्हा कागदपत्रे देण्याची आवश्यकता नाहीः एकाच बॅंकेच्या
अन्य शाखेत खाते स्थलांतरीत करतांना कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही. सदरचा
खातेधारक हा केवळ आपले पत्ता बदलाचे प्रकटन देऊन खाते स्थलांतरीत करु शकतो.
4) ज्यांच्याकडे
कोणतेही पुरावे नाहीत त्यांच्यासाठी लघु खाते योजनाः असेही काही लोक आहेत की
ज्यांच्याकडे वरीलपेकी कोणतेही पुरावे नाहीत, असे लोकही लघु खाते (Small Account)
उघडू शकतात. त्यासाठी त्यांना बॅंकेच्या अधिका-यांसमक्ष केवळ स्वतः स्वाक्षांकित
केलेले अथवा अंगठ्याचा ठसा असलेले स्वतःचे छायाचित्र देऊन खाते उघडता येता येईल.
मात्र अशा खात्यांवरील व्यवहारांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यात एका वर्षात
एका वेळी एक लाखापेक्षा अधिक रक्कम जमा आणि एका महिन्यात दहा हजार रुपयांपेक्षा
अधिक रक्कम काढ़ता येणार नाही. किमान वर्षभरानंतर ही खाती अधिकृत मानली जातील.
त्यानंतर जर संबंधित खातेदाराने कोणताही अधिकृत पुरावा मिळविण्यासाठी अर्ज केला असल्यास
पुन्हा वर्षभरासाठी हे खाते चालविता येईल.
5)कमी जोखमीच्या
ग्राहकांसाठी सवलतीः वरिलपैकी कोणतेही अधिकृत
पुरावे नसल्यास आणि बॅंकांनी घोषित केलेल्या कमी जोखमीचे ग्राहक या गटापैकी
असल्यास त्यांनाही खाते उघडण्यासाठी केंद्र, राज्य शासनाने अथवा एखाद्या नियामक प्राधिकरण, सार्वजनिक उपक्रम, शेड्युल्ड
कमर्शियल बॅंक, सार्वजनिक वित्तीय संस्था यांचे ओळखपत्र तसेच एखाद्या राजपत्रित
अधिका-याने साक्षांकित केलेले व स्वतःचे छायाचित्र असलेले पत्र दिल्यास त्यांना
खाते उघडता येईल.
6) खात्याचे
अद्यावतीकरण करण्याच्या कालावधीत बदलः विशिष्ट कालावधीनंतर केवायसी (KYC- Know
Your Coustomer) माहिती अद्यावतीकरण करण्याच्या कालावधीतही कमी, मध्यम आणि उच्च जोखमीच्या
ग्राहकांसाठी आता पाच ते दोन
वर्षांऎवजी दहा- आठ आणि दोन वर्षे इतका
करण्यात आला आहे.
7) इतर सवलतीः
अ) स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी केवायसी (KYC- Know Your Coustomer) माहिती
प्रमाणिकरणाची आवश्यकता नाही. त्यांच्या पदाधिका-यांच्याच ओळखीची पडताळणी होईल. ब)
विदेशी विद्यार्थ्यांना स्थानिक पत्त्याच्या
पुराव्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात येईल. क) बॅंकांनी घोषित
केलेल्या कमी जोखमीचे ग्राहक या गटापैकी असल्यास आणि त्यांना पुरावे सादर करण्यास
सहा महिन्यांची मुदत देण्यात येईल.
वरील उपाय योजनांमुळे आता पंतप्रधान
जनधन योजनेत बँक खाते उघडणे आता सहज आणि अधिक सोपे झाले आहे.
मिलिंद दुसाने
जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव
No comments:
Post a Comment