जळगांवा,
दि 1 :- महाराष्ट्र शासनाने दिनांक 2 जुलै 2013 अन्वये केलेल्या दुस-या
सुधारणेनुसार स्वयंअर्थसहायित शाळा ( स्थापना व विनिमयन) अधिनियम 2012 अंतर्गत सन
2014-15 पासून प्राथमिक / उच्च प्राथमिक / माध्यमिक / उच्च माध्यमिक या स्तरावरील
नवीन शाळा किंवा दर्जावाढीने वर्ग सुरु करणेसाठी प्रस्ताव सादर करण्याची मुदत
दिनांक 8 ऑगस्ट 2013 पर्यत वाढविण्यात आलेली आहे
स्वयं अर्थसहायित शाळा (स्थापना व
विनियमयन) अधिनियम 2012 या अधिनियांतर्गत अजूनही ज्या शैक्षणिक संसथाना सन 2014-15
मध्ये प्राथमिक / प्राथमिक / माध्यमिक /
उच्च माध्यमिक या स्तरावरील नवीन शाळा किंवा दर्जावाढीने वर्ग सुरु करावयाचे असतील,
त्यांनी संबंधित जिल्हयांच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात संपर्क साधून रुपये 5000/-
रक्कमेचे चलन भरुन दिनांक 19 जानेवारी 2013 च्या अधिनियमासोबत देण्यात आलेल्या
अनुसूची –क मधील नमुनयात ऑफलाईन पध्दतीने दिनांक 8 ऑगस्ट 2013 अखेर परिपूर्ण भरुन
ते अर्ज जिल्हयाच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात सादर करावे असे शिक्षण उपसंचालक
नाशिक विभाग, नाशिक यांनी कळविले आहे
0000
वृत्त क्र :- 521
आचारसंहितेमुळे लोकशाही दिन
नाही
जळगांव, दि 1 - लोकशाही दिन प्रत्येक
महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो परंतू महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम
राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केल्याने त्याबाबतची आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे आचार संहिता कालावधीत दिनांक
5 ऑगस्ट 2013 रोजीच्या लोकशाही दिनाचे
आयोजन करण्यात येणार नाही अशा शासनाच्या
सुचना असल्यामुळे आचारसंहिता संपेपावेतो लोकशाही दिनाचे आयोजन करता येणार नाही
याची सर्व जिल्हास्तरीय अधिकारी व नागरिक यांनी नोंद घ्यावी असे जिल्हाधिकारी
जळगांव यांनी कळविले आहे
No comments:
Post a Comment