‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ साठी जळगाव व उस्मानाबाद जिल्ह्यांना राष्ट्रीय पुरस्कार
नवी दिल्ली,24:-‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ या केंद्र शासनाच्या अतीशय महत्वकांक्षी अभियानाची उत्कृष्ट अमलबजावणी
करण्यासाठी महाष्ट्रातील जळगाव व उस्मानाबाद जिल्ह्यांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन
गौरविण्यात आले. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मेनका गांधी यांनी जळगावच्या
जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल आणि उस्मानाबाद चे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे
यांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.
‘बेटी बचाओ बेटी
पढ़ाओ’ अभियानाचा दूसरा वर्धापन दिन
तसेच ‘राष्ट्रीय बालिका दिना’चे
औचित्य साधून येथील प्रवासी भारतीय केंद्रात एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात
आले.
यावेळी
केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मेनका गांधी, महिला व बाल विकास सचिव लीना नायर, रिओ पॅरा ऑलम्पिक विजेत्या दिपा मलिक, फ्लाईंग
ऑफीसर अवनी चतुर्वेदी,
पद्श्री गिर्यारोहक अरूनिमा सिन्हा, गिर्यारोहक
रेखा चोकन या मंचावर उपस्थित होत्या. यासह दिल्लीस्थित शाळेकरी विद्यार्थ्यांनी,
महिला व मुलींसाठी कार्यरत गैरसरकारी संस्था, अंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत संस्थांचे प्रतिनिधी मोठया प्रमाणात
उपस्थित होते. या कार्यक्रमात ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ अभियानातंर्गत देशभरातील 10 जिल्ह्यांना पुरस्कृत करण्यात आले.
त्यामध्ये महाराष्ट्रातील जळगाव व उस्मानाबाद या
दोन जिल्ह्यांचा समावेश आहे.
जळगाव
जिल्ह्याला ‘बेटी बचाओ
बेटी पढ़ाओ’ अंतर्गत सर्वोत्कृष्ट कार्य केल्या बद्दल
गौरविण्यात आले. जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांच्या नेतृत्वात
जिल्ह्यामध्ये ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ अंतर्गत सर्वसमावेशक जागृकता अभियान राबविण्यात आले. समाजातील सर्व
स्तरात यासाठी प्रचार-प्रसार करण्यात आला. केंद्र सरकारच्या डिजीटल इंडिया
उपक्रमातंर्गत या अभियानाला जनतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी ‘बेटी
बचाओ बेटी पढ़ाओ’ या अभियानाच्या लोगोचा उपयोग करून ‘डिजीटल गुड्डा गुड्डी’ बोर्ड तयार करण्यात
आला. यामध्ये ऑनलाईन जोडणीकरून मुला-मुलीच्या जन्मदराचे अवलोकन करता येते. हे एक
ऑडीओ व्हिज्युअल डिस्प्ले कटआऊट आहे. या डिस्पलेवर मान्यवरांचे संदेश, कन्याभ्रुण हत्या विरोधी
जनजागृतीपर संदेश, महिला सक्षमीकरणाबाबतच्या योजना,
महिलासंदर्भांत महत्वाचे असणारे टोल फ्री क्रमांक आदी माहिती
प्रसारीत केली जाते. जिल्हा व तालूका स्तरावरील शासकीय कार्यालय, ग्रामपंचायत व आरोग्य केंद्रामध्येही बोर्ड दर्शनिय भागात बसविण्यात
आले आहेत. याच्या परिणाम हा सकारात्मक झाला असून जळगाव जिल्ह्यामध्ये मुलींच्या
जन्मदरात वाढ झाली आहे. 2011 मध्ये दर हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर 842 होता.
बेटी बचाओ बेटी पढ़ाओ अंतर्गंत राबविण्यात आलेल्या उपक्रमानंतर हा जन्मदर 2015 मध्ये 863 तर 2016 मध्ये हा 922
पर्यंत पोहोचला असल्याचे श्रीमती अग्रवाल यांनी सांगितले.
उस्मानाबाद
जिल्ह्याला कन्या भ्रुण हत्या कायदा कडक अमलबजावणी करण्यासाठी तसेच ‘आई व शिशु नियंत्रण प्रणाली’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याबद्दल राष्ट्रीय पुरस्कार देऊन
गौरविण्यात आले. उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या
मार्गदर्शनात हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यातंर्गंत गावातील लोक, सरपंच, आशा सेविका, एएनएम,
अगंणवाडी सेविका, आरोग्य अधिकारी
यांच्या सहभागाने गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर महिलांचे शिविर आयोजित
करण्यात आले. तीन महिने गरोदर असणा-या महिलांचे अकेंक्षण करण्यात आले. पूढील सहा
महिण्यांपर्यंत या गरोदर महिलांना लागणा-या औषधी,
त्यांच्या चाचण्या शासनाच्यावतीने करण्यात आल्या. यासह गरोदर महिलांच्या
कुटूंबातील सदस्यांचे मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रम
आयोजित केले जातात. यामधून जागृकता निर्माण केली जाते. प्रसूतीनंतरचे पूढील तीन
महिनेही नवजात बाळांचे अकेंक्षण केले जाते. यामध्ये नवजात बालकांना या काळात
लागणारे लसीकरण केले जाते.
या
अकेंक्षणाचे तीन भाग पाडण्यात आले. अतीशय जास्त कन्या भ्रुण हत्या दर असणा-या
क्षेत्राला लाल रंग देण्यात आला आहे. त्यापेक्षा कमी कन्या भ्रुण हत्या असणा-या
क्षेत्राला पिवळा रंग देण्यात आला आहे आणि सर्वांधिक कमी कन्या भ्रुण हत्या
असणा-या क्षेत्राला हिरवा रंग देण्यात आला आहे. या उपक्रमामुळे मुलींचा जन्मदर
वाढला आहे. वर्ष 2015 मध्ये 1 हजार मुलांमागे 791 मुली होत्या हा आकडा वाढून 2016
मध्ये 904 येवढा झाला आहे.
याशिवाय
उस्मानाबाद जिल्ह्यातील 10 कन्या भ्रुण हत्या करणा-या संस्थेवर कार्यवाही करण्यात
आली असून 6 लोकांना या अंतर्गंत शिक्षाही ठोठावण्यात आली, असल्याचे श्री. नारनवरे यांनी
सांगितले.
00000
No comments:
Post a Comment