जळगाव, दिनांक 13 - महाराष्ट्र राज्य
साहित्य आणि संस्कृती मंडळ, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातंर्गत जिल्हा माहिती
कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 13 ते 15 मार्च,2013 या कालावधीत
वल्लभदास वालजी वाचनालयाच्या सभागृहात ग्रंथोत्सवाचे उदघाटन महाराष्ट्र विधानसभेचे
माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांचे हस्ते संपन्न झाले.
ग्रंथोत्सवातील
इतर कार्यक्रम असे
गुरुवार,
दिनांक 14 मार्च,2013 रोजी सकाळी 10 ते 11.30 वाजता कथाकथन कार्यक्रम आयोजित केला
असून अशोक कोळी, विनोद कोसुदे, रा.सी.साळुंके, पोर्णिमा हुंडीवाले हे साहित्यिक
आपल्या कथांचे वाचन करतील तर दुपारी 12 ते 2 या कालावधित महाविद्यालयीन विद्यार्थी
व दिशा बहुउददेशीय संस्थेच्या कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवाणी
रसिकांना मिळणार आहे.
तर
शुक्रवार, दिनांक 15 मार्च,2013 रोजी समारोपाचा कार्यक्रम अप्पर जिल्हाधिकारी
सोमनाथ गुंजाळ यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे यावेळी स्थानिक कलाकार वाचनाची आवड
वृध्दीगंत करणेबाबतची नाटिका सादर करतील तर सायंकाळी 5 ते 7 या वेळेत कवी संमेलन
आयोजित केले असून प्रभाकर महाजन, शशिकांत हिंगोणेकर, मंगला नागरे, अशोक जोशी, अशोक
कोतवाल, अस्मिता गुरव, प्रशांत धांडे, प्रभाकर सोनवणे आदि कवी सहभागी होतील कवी
संमेलनाचे अध्यक्ष अशोक सोनवणे असतील.
ग्रंथप्रदर्शन
व विक्री
दिनांक
13 ते 15 मार्च,2013 या कालावधीत वल्लभदास वालजी वाचनालयाच्या जुन्या सभागृहात
ग्रंथ विक्री व प्रदर्शनासाठी 25 स्टॉल उपलब्ध करुन दिले आहेत. यामध्ये ग्रंथाली
प्रकाशन मुंबई, वैशाली प्रकाशन पुणे, ग्रंथमोहन बुकशेलर नाशिक, मराठी शब्द कोश
धुळे, जनउन्नती ग्रंथभांडार नाशिक, ज्ञानगंगा प्रकाशन पुणे, शासकीय मुद्रणालय
औरंगाबाद आदि प्रकाशन संस्था व ग्रंथ विक्रेत्यांचे स्टॉलची नोंदणी झालेली आहे.
त्यामुळे जळगाव जिल्हयातील रसिक, ग्रंथप्रेमी आदिंना पुस्तक प्रदर्शन व खरेदी
बरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवाणी मिळणार आहे.
तरी
जळगाव जिल्हयातील जास्तीत जास्त नागरिकांनी ग्रंथोत्सवास भेट देण्याचे आवाहन
जिल्हा माहिती कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment