Thursday, 28 August 2014

सार्वजानिक वहिवाटीच्या नोंदी निस्तार व वाजीब-उल-अर्ज पत्रकात आवश्यक ! प्रांताधिकारी गणेश मिसाळ

सार्वजानिक वहिवाटीच्या नोंदी
निस्तार व वाजीब-उल-अर्ज पत्रकात आवश्यक !‍
: प्रांताधिकारी गणेश मिसाळ

            चाळीसगाव,दिनांक 28 :- गावातील सार्वजानिक स्वरुपाचे हक्क ‍निश्चित करुन ते दर्शविणारी पत्रके गावाच्या दप्तरात असावी याबाबत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मध्ये तरतूद करण्यात आली आहे. तरी अशा प्रकारच्या नोंदी हया प्रत्येक गावाच्या दप्तरी असणे जरूरीचे असल्याने या करिता विभागीय आयुक्त एकनाथ डवले व ‍जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली निस्तार पत्रके व वाजिब-उल-अर्ज तयार करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. अशी पत्रके व नोंदी हया अद्यावत नसल्याने सार्वजानिक जागांबाबत व वहिवाटींबाबत होणा-या वादांची प्रकरणे न्यायालयात दाखल होतात व काही ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात त्याअनुषंगाने गावातील सार्वजानिक वहिवाटीच्या नोंदी ठेवणे आवश्यक असल्याचे प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
            निस्तार पत्रक म्हणजे सरकारी सार्वजानिक मालकीच्या जमिनीवर त्या गावातील भोगवटयात नसलेल्या जमिनीवर त्या गावातील रहिवाशांना वहिवाटीचा तसेच जमिनीवरील विविध उत्पन्नाचा उपभोग घेण्याचा कोणता हक्क पोहोचतो याचे स्पष्टीकरण करणारे पत्रक म्हणजे निस्तार पत्रक असा होत असून यामध्ये शेत उपयोगी गुरांना मोफत चराईसाठीचे क्षेत्र, गावातील रहिवाशांना सर्व प्रकारचे लाकूड, सरपण किंवा जंगलातील उत्पन्नाचा वापर करता येईल असे होय, मुरुम, कंकर, वाळु, माती, चिकणमाती, दगड वा इतर दुय्यम खनिज घेण्यासाठीचे क्षेत्र, दहनभुमी, दफनभूमी, गावठांण, गोठाण, छावणीची जमीन, मळणीची जमीन, बाजार, सार्वजानिक प्रयोजनासाठी गावठाणाबाहेर राखून ठेवलेली जमीन इ. बाबी यात समाविष्ठ होत असून याची नोंद निस्तारपत्रकात होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी कळविले आहे यासाठी सर्व गावक-यांनी एकमत करुन गावाचे संबंधित तलाठयांशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रांताधिकारी गणेश ‍मिसाळ यांनी केले आहे.
            वाजीब-उल-अर्ज विदर्भातील महसुल संबंधीत नोंदवही असून ती संपुर्ण राज्यभरात लागू करण्यात आली आहे. वाजीब-उल-अर्ज अभिलेख ठेवण्याबाबतच्या कार्यपध्दतीमध्ये गावातील कोणतेही जमीन किंवा पाणी हे राज्य शासन अथवा स्थानिक प्राधिकरणाच्या मालकीचे नसेल किंवा त्यांच्याकडून ज्याचे नियंत्रण अथवा व्यवस्था केली जात नाही म्हणजेच खाजगी मालकीची आहे अशा जमीनीवरील अथवा यथास्थिती पाण्यावरील पाटबंधारे, मच्छीमारी, येण्याजाण्याचा हक्क किंवा अन्य वहिवाटी यासाठी त्या गावातील रिवाज ठरवून त्याची नोंद असणारा  अभिलेख म्हणजे वाजीब-उल-अर्ज असा असून संहितेच्या कलम 165(1) नुसार जिल्हाधिका-यांनी असा  अभिलेख तयार करावयाचा असून गावातील रिवाज ठरविण्यासाठी समितीचा अभिप्राय घेऊन कार्यवाही करावयाची असते. गावातील रिवाज ठरविण्यासाठी गठीत केलेल्या समितीचा अध्यक्ष हा सरपंच असून सदस्य पोलीस पाटील, गावातील सहकारी संस्थेचा एक प्रतिनीधी व गावातील मागील किमान 60 वर्षापासून रहिवाशी व सध्या 75 वर्षे किंवा त्यापुढील वय असणारे 2 प्रतिनिधी असतील तर सचिव म्हणून  संबंधित गावचा तलाठी राहील.  वाजीब-उल-अर्ज तयार करतांना स्थानिक रुढी, परंपरा व श्रध्दा यांचा विचार करुन स्थानिक, धार्मिक व सामाजिक सलोख्याचे वातावरण कायम राहिल याची दक्षता घेण्याचे आवाहन करुन निस्तार पत्रक तसेच वाजीब-उल-अर्ज ठेवण्याबाबत अधिक मार्गदर्शनासाठी श्री.गणेश मरकड, तहसिलदार पाचोरा व श्री.बी.ए.कापसे, तहसिलदार भडगांव यांच्याशी संपर्क साधावा असेही श्री.‍मिसाळ यांनी कळविले आहे.
                                           * * * * * * * *

सुवर्ण जयंती राजस्व अभियानातंर्गत
समाधान योजनेतुन विविध दाखल्यांचे वाटप

चाळीसगाव,दिनांक 28 :- राज्य शासनाच्या राजस्व अभियानातंर्गत समाधान योजनेतून चाळीसगांव महसूल प्रशासनाने मौजे हातले व खडकी या मंडळातंर्गत येणा-या गावातील नागरिकांना राज्य शासनाच्या जनहितार्थ निर्णयाच्या अनुषंगाने विविध लोकोपयोगी दाखल्यांचे वाटप नायब तहसिलदार महसूल नानासाहेब आगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निवासी नायब तहसिलदार विशाल सोनवणे, पुरवठा निरीक्षक संदेश निकुंभ, पुरवठा अव्वल कारकून दिलीप राजपूत, मंडळ अधिकारी ए.बी.जाधव, मंडळ अधिकारी  बि.आर.सोनवणे तसेच हातले  आणि खडकी बु. मंडळातील सर्व तलाठी व गावकरी, विद्यार्थी मोठया सख्येने उपस्थित होते.
विविध लोकपयोगी दाखले वितरणात कुळकायदा कलम 43 नुसार नियंत्रीत सत्ता प्रकार शेरा कमी केलेल्या सात बारा उता-यांचे वाटप, उत्पन्नाचे दाखले, वय व अधिवास प्रमाणपत्र, दुबार शिधा पत्रीका प्रती, व नावे कमी केलेल्या  शिधा पत्रीकांचे वाटप यांचा समावेश होता. सदर दाखले चाळीसगांव महसूल प्रशासनाने लाभार्थ्यांच्या प्रत्यक्ष गावात शिबीर भरवून वितरीत केल्याने संबंधीत गावच्या नागरिकांनी महसूल प्रशासनाने राबविलेल्या समाधान योजनेबाबत समाधान व्यक्त केले.

                                           * * * * * * * *
बीपीएल व अंत्योदय  शिधापत्रिका धारकांसाठी साखरेचे नियतन

            चाळीसगांव, दि. 28महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून सार्वजानिक वितरण व्यवस्थेतंर्गत चाळीसगांव तालुक्याकरिता माहे जुलै-2014 या महिन्याकरिता प्रती व्यक्ती 500 ग्रॅम प्रमाणे बीपीएल व अंत्योदय शिधा पत्रीका धारकांसाठी 793 ‍क्विंटल व ऑगस्ट 2014 या ‍ महिन्या करिता प्रती व्यक्ती 650 ग्रॅम प्रमाणे 1091 ‍क्विंटल साखर उपलब्ध झाली असून बीपीएल व अंत्योदय शिधा पत्रीका धारकांनी संबंधीत स्वस्त धान्य दुकानदारांकडे संपर्क साधून रुपये 13.50 या दराने साखर प्राप्त करुन घ्यावी.
         तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत निवड झालेल्या उर्वरित एपीएल (केशरी)  शिधा पत्रीका धारकांसाठी 1200 ‍क्विंटल गहू आणी 999 ‍क्विंटल तांदुळ उपलब्ध झाला आहे केशरी शिधा पत्रीका धारकांनी प्रती कार्ड 10 किलो गहू 7.20 रुपये या दराने तर 5 किलो तांदुळ 9.60 रुपये दराने संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराकडून प्राप्त करुन घ्यावा असे आवाहन तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी  प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

* * * * * * * *

Friday, 22 August 2014

बळीराजा सुखी तर जनता सुखी ! उपमुख्यमंत्री


बळीराजा सुखी तर जनता सुखी !
बळीराज्याचे पाठीमागे शासन खंबीरपणे उभे राहणार : उपमुख्यमंत्री

            चाळीसगाव,दिनांक 22 :- भारत देश हा कृषी प्रधान देश असून बळीराज्याच्या जिवावर जनता पोट भरत असते बळीराजा सुखी राहीला तर जनता सुखी राहू शकते. दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या बळीराजाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून येत्या 31 ऑगस्ट नंतर नव्याने दुष्काळी ‍ परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी आज चाळीसगाव तालुक्यातील गिरणा नदीवरील वरखेडे लोंढे  बॅरेजच्या पायाभरणी कार्यक्रमात केले.
            आज तालुक्यातील गिरणा नदीवरील वरखेडे लोंढे (बॅरेज) मध्यम प्रकल्पाचा पायाभरणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी ना.पवार पुढे म्हणाले की, अनेक वर्षापासून या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली पर्यावरण व वनमंत्रालयाची तांत्रीक मान्यते अभावी प्रलंबीत प्रकल्प आपल्या तालुक्याचे आमदार राजीव देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे आज मार्गी लागला आहे. या धरण पाया व बुडीत क्षेत्रासाठी एकुण 787 हेक्टर जमीन संपादीत होणार असून यामध्ये सर्वाधीक जमीन ही सरकारी जमीन 402.49 हेक्टर, वनजमीन  94.95 हेक्टर तर खाजगी जमीन 289.56 हेक्टर इतकी संपादीत होणार असून या प्रकल्पाची साठवण क्षमता ही 39.63 द.ल.घ.मी. तर 1.40 टी.एम.सी. इतकी असणार आहे. या प्रकल्पामुळे चाळीसगांव व भडगांव तालुक्यातील 31 गावांतील 7542 हेक्टर क्षेत्रास प्रवाही सिंचनाचा लाभ होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या प्रकल्पातील बॅक वॉटर क्षेत्र 21 कि.मी. असून यामुळे परिसरातील भुजल पातळी वाढण्यासाठी मदत होणार आहे. सन 2011-2012 च्या दरसुचीनुसार या प्रकल्पाचा खर्च हा रु. 461.67 कोटी इतका असून हा प्रकल्प पुर्ण होण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.
            या कार्यक्रमाचे प्रास्ताविकात आमदार राजीव देशमुख यांनी प्रकल्पाची माहिती उपस्थित पंचक्रोशीतील शेतक-यांना ‍ देऊन केवळ शहरातील विकास कामांवर लक्ष केंद्रीत न करता शहरासोबत ग्रामीण भागातील जनतेला आर्थिक सुबत्ता मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, दुष्काळाला तोंड देण्यासाठीच असे प्रकल्प मार्गी लावणार असून या सोबत मन्याड धरणाची उंची वाढविण्यासाठी व त्यासाठी लागणार निधी उपलब्ध करुन देण्यासाठी  उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांना विनंती केली.
            या कार्यक्रमास कृषी राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.संजय सावकारे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष गफ्फार मलीक, केदारसिंग पाटील, उदेसिंग पवार, जि.प.चे माजी अध्यक्ष ॲड.रविंद्र भैया पाटील, नगराध्यक्ष भोजराज पुन्शी, पं.स.सभापती विजय जाधव, महानंदाचे संचालक प्रमोद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आर.एल.पाटील, प्रदीप देशमुख, शशीकांत साळुंखे, रामचंद्र जाधव, छाया महाले, अस्मिता पाटील, मधुकर चौधरी, अशोक खलाणे, पोलीस अधिक्षक डॉ.जे.डी.सुपेकर, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, मुख्याधीकारी रविंद्र जाधव, गट विकास अधिकारी मालती जाधव यांच्यासह पंचक्रोशीतील सर्व मान्यवर, सदस्य, सरपंच व शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
                                                 * * * * * * * *

उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या हस्ते
शहरात विविध विकास कामांचे उदघाटन व लोकार्पण सोहळा संपन्न

चाळीसगाव,दिनांक 22 :- राज्याचे उपमुख्यमंत्री ना.‍ अजित पवार यांच्या हस्ते आज शहरातील नागद रोड येथील स.नं. 33 मध्ये  आठवडे बाजारातील विविध विकास कामांचे भुमीपूजन करण्यात आले.
त्यानंतर पाटणादेवी रोड येथील हरीगीर बाबा नगर मधील 744 घरकुल व कै.सुवर्णाताई देशमुख नगर येथे 648 घरकुल योजना मंजूर झाली असून या साठी केंद्रशासनाकडून रु.1180.20 लक्ष तर राज्य शासनाकडून 220.39 लक्ष निधी नगरपरिषदेस प्राप्त झाला आहे. या घरकुलांचे भुमिपूजनही ना.पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले.
त्यांनतर शहरातील हिरापूर रोडवरील 81.30 लक्ष खर्चाच्या महाराष्ट्र अग्नि सुरक्षा अभियान अंतर्गत अग्निशमन केंद्र उभारण्यात आलेल्या वास्तुचे उदघाटन ना. पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
तदनंतर शहरातील वैशिष्टयपुर्ण योजनेतंर्गत रु. 1.18 कोटी खर्चाच्या भडगांव रोड वरील सुवर्णा स्मृती उद्यानाचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या हस्ते आज पार पडला.
तदनंतर महाराष्ट्र सुजल निर्मल अभियान योजनेतंर्गत 75 कोटी रुपये खर्चाची चाळीसगांव पाणी  पुरवठा योजनेच्या जलपुजनाचा कार्यक्रमही आज उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या हस्ते पार पडला.
            शहरातील विविध विकास कामांच्या उदघाटन प्रसंगी राज्याचे कृषी राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.संजय सावकारे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष गफ्फार मलीक, केदारसिंग पाटील, उदेसिंग पवार, जि.प.चे माजी अध्यक्ष ॲड.रविंद्र भैया पाटील, नगराध्यक्ष भोजराज पुन्शी, पं.स.सभापती विजय जाधव, महानंदाचे संचालक प्रमोद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आर.एल.पाटील, प्रदीप देशमुख, शशीकांत साळुंखे, रामचंद्र जाधव, छाया महाले, अस्मिता पाटील, मधुकर चौधरी, अशोक खलाणे, पोलीस अधिक्षक डॉ.जे.डी.सुपेकर, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, मुख्याधीकारी रविंद्र जाधव, गट विकास अधिकारी मालती जाधव यांच्यासह पंचक्रोशीतील सर्व मान्यवर, सदस्य, सरपंच व शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.


                                                   * * * * * * * *

Thursday, 21 August 2014

मा.ना.श्री.अजित पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम

मा.ना.श्री.अजित पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम

            चाळीसगाव,दिनांक 21 :- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार हे दिनांक 22.08.2014 रोजी जळगांव जिल्हा दौ-यावर येत असून त्यांचा तपशिलवार दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे
सकाळी 07:30 वाजता मुंबई विमानतळ येथुन विमानाने प्रयाण, सकाळी 08:30 वाजता गोंदुर विमानतळ, धुळे येथे आगमन व मोटारीने चाळीसगावकडे प्रयाण, सकाळी 09:30 वाजता चाळीसगाव येथे आगमन व आमदार राजीव देशमुख यांच्या निवासस्थानी राखीव, सकाळी 10:00 वाजता आठवडे बाजार भुमिपूजन सोहळा, अग्नीशामक दल नुतनीकरण वास्तुचे उदघाटन, सुवर्णाताई स्मृती उद्दयान लोकार्पण व नगर ‍ परिषद हद्दीतील कामांचे भुमिपूजन व लोकार्पण, सकाळी 11:00 वाजता चाळीसगाव शहर पाणीपुरवठा पुर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण, सकाळी 11:15 वाजता वरखेड लोंढवे बॅरेजच्या पायाभरणी कार्यक्रम, दुपारी 12:30 वाजता मोटारीने जानवे ता.अमळनेर कडे प्रयाण, दुपारी 02:00 वाजता जानवे ता.अमळनेर येथे आगमन व विविध विकास कामांचे भुमिपूजन, नंतर मोटारीने अमळनेर कडे प्रयाण, दुपारी 02:20 वाजता अमळनेर येथे आगमन व शहरातील 33 के.व्ही. उपकेंद्राचे लोकार्पण सोहळा कार्यक्रम, दुपारी 02:30 वाजता राखीव (श्री.बिपीन पाटील रविनगर, अमळनेर) दुपारी 03:00 वाजता पाडळसे, ता.अमळनेर कडे प्रयाण, दुपारी 03:35 वाजता पाडळसे येथे आगमन व तेथील निन्मतापी प्रकल्प येथील जलपुजन कार्यक्रम, दुपारी 04:05 वाजता मोटारीने अमळनेर कडे प्रयाण, दुपारी 04:40 वाजता अमळनेर शहरात आगमन व बोरी नदीवरील रु. 10 कोटी खर्चाच्या पुलाचे भुमिपूजन नंतर मोटारीने राजभवन अमळनेर कडे प्रयाण, दुपारी 05:00 वाजता राजभवन येथे आगमन व राखीव (आमदार कृषीभुषण साहेबराव पाटील) दुपारी 05:10 वाजता मोटारीने गोंदुर विमानतळ, धुळे कडे प्रयाण, दुपारी 05:50 वाजता गोंदुर विमानतळावर आगमन, सायंकाळी 06:00 वाजता विमानाने पुणे कडे प्रयाण


                                           * * * * * * * *

Wednesday, 20 August 2014

सद्भावना दिनानिमित्त कर्मचारी अधिका-यांनी घेतली शपथ


सद्भावना दिनानिमित्त कर्मचारी अधिका-यांनी घेतली शपथ

                जळगाव, दि. 20 :- माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज सद्भावना दिन साजरा करण्यात आला. जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचा-यांना यानिमित्त सद्भावनेची शपथ देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता आयोजित कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात यांच्या हस्ते राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर      श्री. खरात यांनी सर्व अधिकारी-कर्मचा-यांना सद्भावना शपथ दिली. या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, उपजिल्हाधिकारी साजिद पठाण, जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे तसेच जिल्हा प्रशासनातील व जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

* * * * * * *

डाक अदालत  23 सप्टेंबर  रोजी

            जळगाव, दिनांक 20 :- पोस्टाच्या टपाल, स्पीड- पोस्ट, काउंटर सेवा, डाक वस्तु, पार्सल, बचत बॅक, मनीऑर्डर आदि कामासंबंधीच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी अधिक्षक डाकघर जळगाव येथे दिनांक 23 सप्टेंबर 2014 रोजी सकाळी 11.00 वाजता  डाक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे.  पोस्टाच्या कामासंबंधीच्या तक्रारींचे सहा आठवडयाच्या आत निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा तक्रारींची दखल डाक अदालतमध्ये घेण्यात येणार आहे. तरी संबंधितांनी  आपली तक्रार दोन प्रतीत  एम.एस. जगदाळे , सहाय्यक अधिक्षक (मुख्यालय) अधिक्षक डाकघर यांचे कार्यालय, 1 ला माळा, हेड पोस्ट ऑफिस बिल्डिंग, जळगाव  425001 यांच्या नावे अतिरिक्त प्रतीसह दिनांक 13 सप्टेंबर 2014 पर्यत अथवा तत्पूर्वी पोहोचेल, अशा बेताने पाठवावी . तदनंतर आलेल्या तक्रारीवर कारवाई केले जाईल, परंतु त्यांचा अदालत अंतर्गत विचार केला जाणार नाही,   असे आवाहन  अधिक्षक डाकघर जळगाव विभाग जळगाव  यांनी केले आहे.               


* * * * * * *

Tuesday, 19 August 2014

“ नेतृत्वाचे सर्वसमावेशक निर्णय ” पुस्तिका उपलब्ध

नेतृत्वाचे सर्वसमावेशक निर्णय पुस्तिका  उपलब्ध

जळगाव दि. 19, राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने नेतृत्वाचे सर्व समावेशक निर्णय या महत्वपूर्ण माहिती असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन केले असून सदरील पुस्तिकेत प्रत्येक घटकाशी असलेली बांधिलकी प्रत्यक्षात साकारणा-या शासनाने कृषी, उद्योग  आरोग्य , शिक्षण, ऊर्जा, जलसिंचन, सहकार, प्रशासन इत्यादी क्षेत्रात प्रभावी वाटचाल केली आहे. त्यासोबतच विविध वंचित, अपेक्षित समुहांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणले  आहे. सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण हितासाठी कटिबध्द असलेल्या राज्य शासनाने अलीकडच्या काळात केलेल्या कामगिरीचे सिंहावलोकन या पुस्तिकेत असून सदरील पुस्तिका जळगाव जिल्हयातील  सर्व तहसिलदार  व गटविकास अधिकारी  कार्यालय  तसेच जिल्हा माहिती कार्याल, जळगाव येथे जनतेसाठी मोफत उपलब्ध आहेत. तरी  जनतेने  नेतृत्वाचे सर्व समावेश निर्णय भेट पुस्तिका प्राप्त करुन घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
            राज्य शासनाने आतापर्यत जनतेच्या कल्याणासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती या पुस्तिकेत असून त्यात मराठा समाजातील शैक्षणिक व सामाजिक दुर्बलांसाठी 16 टक्के आरक्षण, मुस्लिम समाजातील शैक्षणिक व सामाजिक दुर्बलांसाठी 5 टक्के आरक्षण, 108 क्रमांकावर फोन केल्यास अत्याधुनिक रुग्णवाहिका  विनामुल्य सेवेसह तात्काळ हजर, 104 क्रमांकावर फोन केल्यास रक्त पुरविण्यासाठी ब्लड ऑन कॉल योजना, गरीबांसाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, राज्यातील रुग्णांना शासकीय रुग्णालयातून मोफत औषधे, मुंबईसाठी 103 क्रमांकावर फोन केल्यास आणि राज्यातून कोठूनही 1091 क्रमांकावर फोन केल्यास अडचणीतील महिलांना मदत उपलब्ध, अन्नसुरक्षा योजनेची यशस्वी अंमलजावणी 8 कोटी लोकांना फायदा, जादूटोणा आणि अंधश्रध्दा विरोधी कायदा करणारे पहिले राज्य, कोरडवाहू शेतीसाठी अभियान, उद्योगांच्या समतोल विकासासाठी आकर्षक नवीन धोरण, 26 महानगरपालीकांमध्ये स्थानिक संस्था कर लागू, इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी, मुंबईत पायाभूत सुविधांची वेगाने उभारणी, मेट्रो मोनोरेल सुरु , मुंबईतील 1 जानेवारी 2000 पर्यतच्या झोपडयांना संरक्षण, सिमेंट साखळी नाला बंधा-यांचा महत्वाकाक्षी कार्यक्रम, ग्रामीण भागात सुविधा केंद्रांमधून विनासायास दाखल, सुकन्या आणि मनौधैर्य योजनेतून महिलांना संरक्षण, -स्कॉलरशिपमुळे लाखो विद्यार्थ्याना फायदा, मदरसा आधुनिकीकरणासाठी विशेष  निधी, महिलांवरील अत्याचाराच्या, खटल्यांसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट्स, गिरणी कामगारांना अतिशय स्व:स्तात घरे उपलब्ध, शेतक-यांना कृषिपंपाच्या वीजबिलात सवलत देणारी  कृषिसंजीवनी योजना अशा अनेक महत्वपूर्ण माहिती असलेली पुस्तीका आहे.


* * * * * * * * *

Saturday, 16 August 2014

शिक्षणासाठी नवमाध्यमांचा वापर आवश्यक : पालकमंत्री सावकारे


शिक्षणासाठी नवमाध्यमांचा वापर आवश्यक : पालकमंत्री सावकारे

            भुसावळ, जि जळगाव, दि. 16 ऑगस्ट :- विद्यार्थ्यांना चटकन आकलन व्हावे, यासाठी प्रत्येक शिक्षक आपल्या कौशल्याचा वापर करीत असतो. शिक्षण हे अधिक मनोरंजक पध्दतीने व्हावे, यासाठी नवनविन माध्यमांचा वापर व्हावा, यासाठी शासनही आता अनेक ठिकाणी ई-लर्निग सुरु करत आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, रोजगार, स्वयंरोजगार, सामाजिक न्याय व्यसनमुक्ती कार्य राज्यमंत्री तथा जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री ना. संजय सावकारे यांनी केले.
            भुसावळ येथील लोणारी समाज मंगल कार्यालयात आयोजित आदर्श शिक्षक गुणगौरव 2014 सोहळयात ते मार्गदर्शन करत होते. या सोहळयास पंचायत समितीच्या सभापती मंगलाताई झोपे, जि. प. सदस्य समाधान पवार, नगराध्यक्ष हाजी अख्तर पिंजारी, गटशिक्षणाधिकारी पी. एन. ठाकरे, शिक्षण अधिकारी माध्यमिक शशिकांत हिंगोणेकर आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना ना. सावकारे म्हणाले की, शिक्षक हा समाजात आदराचा घटक आहे. तो आदर्शच असला पाहिजे. ज्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले ते तर आदर्श् असतातच पण ज्यांना पुरस्कार मिळत नाहीत तेही आदर्शच असले पाहिजे. शिक्षणाव्यतिरिक्त्‍ अन्य विषयात रस घेवून काम करणारे शिक्षक हे सा-यांसाठी मार्गदर्शक असतात, असे सांगून त्यांनी शिक्षकांच्या समाजोपयोगी कार्याचा गौरव केला. असे आदर्श शिक्षकच आदर्श समाज घडवितात असे त्यांनी सांगितले.
                 या प्रसंगी खालीलप्रमाणे शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
पुरस्कारर्थी माध्यमिक शाळा शिक्षक शिक्षकवृंद

                  श्री. जयंत श्रीकृष्ण जोशी, मधुकर रामदास चौधरी, श्री. सुरेश सिताराम अहिरे, श्रीमती अपर्णा रामसिंग राजपूत, श्री. लिलाधर दामू ब-हाटे, श्री. दिलीप एम. मराठे, श्री. बाळू नामदेव पाटील, श्री. नारायण दत्तू माळी, डॉ. प्रकाश संपत कोळी, श्री. बक्षोमल गुरुदासराम जग्यासी, श्री. अनिल कोष्टी, श्री. शशिकांत वसंत झामरे, श्री. जी. एम. महाजन, श्री. अरुण रामचंद्र धनपाल, सौ. स्वाती उल्हास राणे, श्रीमती सिमा जगन्नाथ भारंबे, श्री. एस. टी. शर्मा, सिस्टर फिल्डा मिस, श्री. मजिद खान हुसेन खान, हबीब खान हमीद खान, श्रीमती एस. आर. लांडे श्री. अनिल राजाराम गुरचळ, श्री. केशव प्रभाकर चौधरी, डॉ. जगदिश एन पाटील
                                                                                                                                
पुरस्कारार्थी शिक्षकवृंद

             श्री. राजू रुपचंद्र कापडणे, श्रीमती पल्लवी महेंद्र पाटील,श्री. मनोज रामस्वरुप माहेश्वरी, मो. अब्दुल तब्बाब, श्री. दिपक प्रभाकर सुरवाडे, श्री. रविंद्र पंडीत मलाणे, श्री. जगदिश रामभजन शर्मा, श्रीमती राजश्री मोहन पाठक, श्री. शेख, रसिद शे, जब्बार, श्री. संतोष ज. तायडे, श्रीमती सोनाली प्र. बेंडाळे, श्रीमती निशाताई. भा. पाटील, श्री रमेशसिंग नयनसिंग पाटील, श्री. समोद्यीन नकिममुद्यीन काझी, श्री. हमीद भुसावळी,
              श्रीमती शारदा म. सुरवाडे, श्री. रमाकांत डी. पाटील, श्री. अमर धोंडूराम पाटील, श्री. दिपक प्रल्हाद पाटील, श्रीमती शुभांगी गिरासे, श्री. जनार्धन गो.  जाधव, श्रीमती माधुरी मो. पाटील, श्री. प्रवीण बा. मोरे, श्रीमती निवेदिता पाटील, श्रीमती प्रिती दिलीप भिरुड, श्री. जीवन पाडूरंग महाजन, श्री. गणेश जनार्धन इंगळे, श्रीमती मनिषा अनिल तायडे, श्रीमती राजश्री सुनिल सोनार, श्री. उमेश पंढरीनाथ कोल्हे
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिपक पाटील यांनी केले.

* * * * * * *

Friday, 15 August 2014

शिवार रस्ते मोकळे करण्यासाठी शेतक-यांनी पुढाकार घ्यावा ! आमदार राजीव देशमुख


             शिवार रस्ते मोकळे करण्यासाठी शेतक-यांनी पुढाकार घ्यावा !          
                                                                        :आमदार राजीव देशमुख

चाळीसगाव,दिनांक 15 :- सुवर्ण जयंती राजस्व अभियान सन 2014 अंतर्गत लोकसहभागातून शिवार रस्ते मोकळे करण्याची मोहिम राबविण्यात येत असून शिवार रस्ते मोकळे करण्यासाठी शेतक-यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन आमदार राजीव देशमुख यांनी आज कोदगांव येथील शिवार रस्त्याच्या उदघाटन प्रसंगी केले.

सुवर्ण जयंती राजस्व अभियान राबवितांना लोक सहभागातून शिवार रस्ते मोकळे करण्यासाठी ‍मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश शेतक-यांना जाण्यायेण्यासाठी सुयोग्य रस्ता उपलब्ध करुन देणे हा असून ब-याच शेतक-यांना इच्छा असूनही उस, केळी, फळबाग, भाजीपाला यासारखी नगदी पिके शेतरस्ता उपलब्ध नसल्यामुळे घेता येत नाही. बैलगाडी किंवा इतर वाहने  अतिक्रमीत रस्त्यावरुन जावू शकत नसल्यामुळे पावसाळयात पेरणी वेळेवर होऊ शकत नाही. आंतर मशागतीसाठी आवश्यक अवजारांची ने-आण करणे कठीण होते. शेतमाल तात्काळ बाजारपेठेपर्यंत पोहोचवणे शेतरस्त्याअभावी जिकरीचे होते. शेतरस्त्याअभावी काढणी, कापणी यंत्रे शेतापर्यंत घेऊन जाणे शक्य होत नाही. या सर्व समस्या लक्षात घेऊन शेतरस्ते, शिवार रस्ते मोकळे करण्यासाठी शेतक-यांनी या मोहिमेत अधिकाधिक सहभाग नोंदवावा असे आवाहन आमदार राजीव देशमुख यांनी याप्रसंगी केले.

विभागीय आयुक्त एकनाथ डवले व जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोहिम राबविण्यात येत असून तालुक्यातूनही या मोहिमेला चांगला प्रतीसाद मिळत असल्याची प्रतीक्रिया  प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील यांनी दिली. तालुक्यातील कोदगांव  शिवरस्ता लांबी 0.700 कि.मी. , अलवाडी शिवार रस्ता लांबी 1.500 कि.मी. तर तामसवाडी  शिवार रस्ता लांबी 0.750 कि.मी. या तीनही  शिवार रस्त्यांचे आज स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन लोकार्पण करण्यात आले त्या प्रसंगी ते बोलत होते.  सिंचन सुविधा वाढवण्यासाठी अनेक ठिकाणी तलाव, कालवे निर्माण झाले. यामुळे पारंपारिक रस्ते बुडीत क्षेत्रात गेल्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांचे प्रश्न उदभवले, यासाठी पर्यायी सोय म्हणून अतिक्रमीत शेतरस्ते मुक्त करण्याची आवश्यकता भासू लागली. काही गावांच्या पुनर्वसनामुळे गावठाण बदलले. त्यामुळे पूर्वीच्या गावठाणातून शेताकडे जाणारे रस्त्यांची समस्या निर्माण झाली.  अतिक्रमीत रस्त्यांमुळे प्रशासनात आणि न्यायालयात अनेक वाद आणि दावे दाखल होत गेले. हे सर्व प्रश्न आणि समस्या या मोहिमेमुळे संपुष्टात येतील असा विश्वासही प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील यांनी यावेळी बोलून दाखविला. व या ‍मोहिमेचा अधिकाधीक शेतक-यांनी लाभ घ्यावा असे आवाहनही केले.

या कार्यक्रमासाठी तहसिलदार बाबासाहेब गाढवे, मुख्याधिकारी रविंद्र जाधव, नायब तहसिलदार विजय सुर्यवंशी, विशाल सोनवणे, नानासाहेब आगळे, संबंधित गावांचे तलाठी, मंडळ अधिकारी, सरपंच, ग्रामस्थ आदी मोठया संख्येने उपस्थित होते.

* * * * * * * *

स्वांतत्र्य दिनाचा मुख्य शासकीय समारंभ उत्साहात साजरा


स्वांतत्र्य दिनाचा मुख्य शासकीय समारंभ उत्साहात साजरा

            चाळीसगाव,दिनांक 15 :- स्वातंत्र्यदिनाचा 67 वा वर्धापनदिनाचा समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला . येथील पोलीस परेड मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण आज प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला प्रसंगी आमदार राजीव देशमुख, नगराध्यक्ष भोजराज पुन्शी, उपनगराध्यक्ष सिताराम अजबे, उदेसिंगआण्णा पवार, प्रदिप दादा देशमुख, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, अप्पर पोलीस अधिक्षक संदीप जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी केशव पातोंड, पोलीस निरिक्षक संजय देशमुख, मुख्याधिकारी नगर परिषद रविंद्र जाधव, टाकळी प्र.चा. चे सरपंच किसनराव जोर्वेकर, नगर सेवक, स्वातंत्र्य सैनिक, जेष्ठ नागरिक, पत्रकार, विद्यार्थी व विविध कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
            आज सकाळी 09:05 वाजता प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील यांनी ध्वजारोहण केल्यानंतर पोलीस प्रशासन व होमगार्ड यांच्या वतीने ध्वजास मानवंदना देण्यात आली. तद्नंतर भारतीय जनगणना 2011 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल नगर परिषदेचे आसाराम आवारे, प्रा.शिक्षक शरद मोरे यांना रजत पदक तर प्रा.शिक्षीका श्रीमती कल्पना चिंचोले यांना कास्य पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या समारोपानंतर प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील यांनी सर्व उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नायब तहसिलदार विजय सुर्यवंशी, विशाल सोनवणे  यांनी योगदान दिले तर आभार प्रदर्शन नायब तहसिलदार नानासाहेब आगळे यांनी केले.

                                                 * * * * * * * *

Thursday, 7 August 2014

आधुनिक शेती औजारांचे आमदार राजीव देशमुख यांचे हस्ते वितरण


आधुनिक शेती औजारांचे आमदार राजीव देशमुख यांचे हस्ते वितरण

            चाळीसगाव,दिनांक 7 :- महाराष्ट्र शासनाच्या कृषी व पणन विभागामार्फत राष्ट्रीय अन्न सुरक्षा  अभियानांतर्गत कोरडवाहू शेती अभियान सन 2014-15 अंतर्गत आधुनिक ट्रॅक्टर चलीत पेरणी यंत्राचे वाटप आज आमदार राजीव देशमुख यांच्या हस्ते तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात झाले. तालुक्यातील 46 अल्प, अत्यल्प, महिला मागास शेतक-यांना या ट्रॅक्टर चलीत शेती औजारांचा नक्की फायदा होईल असा विश्वास आमदार देशमुख यांनी यावेळी बोलून दाखविला. यावेळी उपसभापती लताताई दौंड, पंचायत ‍समिती सदस्य अभय पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिनेश पाटील, प्रविण पाटील, माजी पं.स.सदस्य संजय संतोष पाटील, तालुका कृषी अधिकारी व्हि.एस.शिंदे आदि उपस्थित होते.
            आपल्या अध्यक्षीय भाषणात आमदार देशमुख म्हणाले की, तालुक्यात  कमी व असमाधानकार पर्जन्यमानामुळे तसेच गारपीट मुळे त्रस्त शेतक-यांना समृध्द करण्यासाठी शासन कटीबध्द् असून आधुनिक शेती औजारांमुळे शेतक-यांचा वेळ, पैसा व श्रम वाचून शेतकरी ख-या अर्थान समृध्द होण्यास नक्कीच मदत होईल असे ते म्हणाले. त्याच बरोबर  नैसर्गिक आपत्ती काळात शेतक-यांचे पंचनामे करण्याचे महत्वाचे कामकाज हे कृषी विभागामार्फत होत असते तरी कृषी विभागातील सर्व संबंधीतांनी प्रत्यक्ष पहाणी करुनच पंचनामे सादर करावे व शेतक-यांना न्याय द्यावा अशा सुचना त्यांनी यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचा-यांना दिल्या.
            यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिनेश पाटील यांनी यांत्रीकीकरणाची योजना ही प्रभावशाली असून तालुक्यातील जमीनीचा स्तर व पुरवठा करण्यात येणारे यंत्र सामुग्री बाबत बोलतांना 35 एच.पी.वरील ट्रॅक्टरसाठी आवश्यक असणारी यंत्र सामुग्रीचा पुरवठा करण्यासाठी आमदारांना विनंती केली.
            तालुका कृषी अधिकारी व्ही.एस.शिंदे यांनी सदर योजनेबाबत माहिती देतांना सांगितले की, आमदार राजीव देशमुख यांच्या प्रयत्नानेच जिल्हयाभरात सर्वाधिक 46 पेरणी यंत्र आपल्या तालुक्याला  प्राप्त झाले आहेत पैकी अत्यल्प भुधारक शेतक-यांना 91 टक्के तर मोठया शेतक-यांना 72 टक्के दराने सबसिडी मंजूर झाल्याचे सांगितले. यामध्ये चार दाती पेरणी यंत्राची मुळ किम्मत रु. 48,348/- असून नऊ दाती यंत्राची किम्मत 54,000/- असल्याचेही त्यांनी  सांगितले व पेरणी यंत्राबाबत उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन केले.
            कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अविनाश चंदिले यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी  अ.जे येवले मंडळ कृषी अधिकारी तळेगांव व सर्व मंडळ कृषी अधिकारी तसेच अनिल तायडे, व सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. तर आभार येवले यांनी मानले.


* * * * * * * *

Sunday, 3 August 2014

भिल्ल समाज वस्तीमध्ये जाऊन जातीचे दाखल्यांचे वितरण


भिल्ल समाज वस्तीमध्ये जाऊन जातीचे दाखल्यांचे वितरण
लोकाभिमुख प्रशासनाचे दर्शन घडविणारे प्रांताधिकारी गणेश मिसाळ

               चाळीसगाव, दिनांक 4  :- जातीच्या दाखल्यांपासून अनेक वर्ष वंचित असलेल्या मौजे वाघुलखेडा येथील आदिवासी ‍भिल्ल समाजाच्या 173 जणांना प्रत्यक्ष त्यांच्या वस्तीत जाऊन प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी जातीचे दाखले वितरीत केले. जातीच्या दाखल्यापासून वर्षानुवर्षे वंचित असल्याने या वस्तीतील नागरिकांना अनेक योजनांपासून वंचित रहावे लागले, त्यामुळे या  शिबीरातून जातीचा दाखला मिळाल्याने त्यांना न्यायीक हक्क मिळाला आहे. या शिबीरातून ख-या अर्थाने लोकाभिमुख प्रशासनाचे दर्शन प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी घडवील्याच्या प्रतिक्रिया भिल्ल वस्तीतील समाजबांधवांनी यावेळी ‍दिल्या आहेत.
            दाखले वितरण कार्यक्रमात बोलतांना श्री.मिसाळ म्हणाले की, एकलव्य संघटनेने हा समाज  जातीच्या दाखल्यांपासून वंचित असल्याचे निदर्शनास आणून दिल्या नंतर जातीचा दाखला देण्यासाठीचा कायदा व कायद्यातील नियमांचा आभ्यास केला असता त्यामध्ये स्थानिक चौकशी करुन व इतर आवश्यक ते पुरावे गोळा करुन सक्षम प्राधिका-याला असे दाखले देण्याची तरतूद त्यामध्ये मिळून आली व त्याचा वापर करुन भिल्ल समाजातील नागरिकांना त्यांच्या न्यायीक हक्कानुसार जातीचे दाखले देण्याचा निर्णय घेतला व महसूल दिनाचे औचित्य साधत प्रत्यक्ष भिल्ल समाजाच्या वस्तीमध्ये जाऊन दाखले वितरण करतांना मनस्वी आनंद होत असल्याची  प्रतिक्रीयाही  श्री.मिसाळ यांनी यावेळी व्यक्त करून लोकाभिमुख प्रशासन राबविण्यासाठी विभागीय आयुक्त एकनाथ डवले व जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेने हे काम शक्य झाल्याचेही त्यानी यावेळी सांगितले.
            एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर वाघ  आपल्या मनोगतात म्हणाले की, भिल्ल समाजातील लोकांना मिळालेल्या जातीच्या दाखल्यामुळे आदिवासी प्रकल्प कार्यालय, यावल  यांचे मार्फत आदिवासी साठी असलेल्या विविध योजनांचा लाभ, अनुसूचित जमातींसाठी असलेली घरकुल योजना, पंचायत समिती मार्फत वाटप होणारी शेती औजारे, ताडपत्री, विद्यार्थ्यांना शाळेतुन मिळणारी शिष्यवृत्ती व इतर अनेक योजनांचा लाभ होणार असल्याने या जमातीला ख-या अर्थाने न्याय मि ळाला आहे.
            भिल्ल समाज हा अशिक्षित असल्याने कागदपत्रांपासूनही ते दुरच आहेत. परिणामी ज्या समाजात जन्माला आले त्या जातीचा जुना पुरावाच अनेकांजवळ नाही. ही अडचण लक्षात घेत पाचोरा प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी स्वत: लक्ष घालून हे दाखले त्यांना वितरीत केले. मिसाळ यांनी शासकीय कामाची   विशिष्ट पध्दत बाजूला ठेवत स्वत: पुढाकार घेऊन तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, पोलीस पाटील आणि सरपंच यांच्या मदतीने समाजाच्या अडचणी सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
            मौजे वाघुलखेडा येथे आयोजित दाखले वितरणाच्या कार्यक्रमास सरपंच अशोक रामदास ‍अहिरे, एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर वाघ, तालुका अध्यक्ष समाधान सोनवणे, प्र.तहसिलदार राजेंद्र नजन, नायब तहसिलदार आबा महाजन, मंडळ  अधिकारी कुमावत, तलाठी रुपाली रायगडे, सेतु कर्मचारी सागर पाटील, ज्ञानेश्वर पाटील, हेमंत भोसले, यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन रमेश मोरे यांनी केले. यावेळी समाज वस्तीतील नागरिक,विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.


* * * * * * * *

Friday, 1 August 2014

लोकाभिमुख प्रशासन राबविण्यासाठी नागरिकांचा सहभाग अपेक्षीत ! अप्पर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात


लोकाभिमुख प्रशासन राबविण्यासाठी  
नागरिकांचा सहभाग अपेक्षीत !‍
: अप्पर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात
                चाळीसगाव, दिनांक 1  :- लोकाभिमुख प्रशासन राबविण्यासाठी नागरिकांचा सहभाग अपेक्षीत असल्याचे प्रतिपादन जिल्हयाचे अप्पर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात यांनी महसूल दिनाच्या कार्यक्रमात केले. चाळीसगांव तहसिल कार्यालयात महसुल दिनानिमीत्त ‍ विविध कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी  कार्यक्रमाचे  अध्यक्ष शहराचे नगराध्यक्ष भोजराज पुन्शी,‍ जि.प.सदस्य प्रभाकर जाधव, उप विभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, नगर पालीका मुख्याधिकारी  रविंद्र जाधव आदी  उपस्थित होते.
                यावेळी खरात म्हणाले की, शेतक-यांसाठी महसूल दिन व कृषि दिन दोन दिवस  महत्वाचे असून या दिवसाचे  महत्व ओळखून शासन आपल्यासाठी विविध ‍ना‍विण्यपुर्ण योजना राबवित असते त्याची ‍माहिती व लाभ मिळविण्यासाठी मोठया प्रमाणात सहभाग नोंदवून लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. महसूल प्रशासनाने गेल्या वर्षभरात राबविलेल्या विविध योजना जसे शिवार रस्ते, वन हक्क, सातबारा संगणकीकरण, शिधा पत्रीकांचे नुतणीकरण, कुटूंब अर्थसहाय्य योजना, आम आदमी विमा योजना, कुळ कायदा जमिनी, अतिसार नियंत्रण पंधरवाडा व आधारवड योजना या सारख्या  लोकाभिमुख योजना प्रभाविपणे राबविल्या  आहेत.  आधारवड योजनेत जिल्हाभरात  चाळीसगांव प्रशासनाने सर्वाधीक लाभार्थ्यांना लाभ देऊन प्रथम क्रमांक मिळविला आहे. तरी या प्रकारे शासनामार्फत राबविण्यात येणा-या योजना तळागाळापर्यंत पोहचल्या पाहिजेत म्हणून पुढील वर्षात गावागावात जाऊन योजना राबविण्याचा कालबध्द कार्यक्रम आखण्यात आला असून नागरिकांकडूनही यामध्ये सक्रीय सहभाग नोंदविण्याचे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात यांनी यावेळी केले.
                यावेळी शहराचे नगराध्यक्ष भोजराज पुन्शी यांनी महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या तर प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील यांनी मार्गदर्शन करतांना महसूली आर्थिक वर्ष म्हणजे जमाबंदी साल व या वर्षभरात  प्रशासनामार्फत 1 ते 31 नमुने अद्यावत करणे, निस्तार पत्रक भरणे, महसूल गोळा करणे, शिधा पत्रीकांसाठी शिबीरांचे आयोजन करणे अशा राबविण्यात येणा-या विविध कार्यक्रमाची माहिती विषद करुन सांगितली. प्रारंभी  तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी  महसूल दिनाची  पार्श्वभुमी विषद करुन मार्गदर्शन केले व महसूली वर्षामध्ये शेतक-यांनी भरावयाचा महसूल विहीत मुदतीत भरण्यासाठी आवाहन केले.
विविध प्रकारचे दाखल्यांचे गुलाबराव खरात यांच्या हस्ते वाटप
            महसूलदिनाचे औचित्य साधत आज तहसिल कार्यालयात इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ योजनांतर्गत (आधारवड)जिल्हाभरात  चाळीसगांव तालुक्यात सर्वा धि क 3593 इतके लाभार्थ्यांना लाभ मंजूर करण्यात आला असून प्राति नि धीक स्वरुपात 24 लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात जमा केलेल्या लाभाच्या पावत्यांचे ‍वितरण, तसेच कुळकायदा कलम 43 च्या शर्तीच्या 1047 गट असून इतर  अधि कारातील शेरा जमी करुन  प्राति नि धीक स्वरुपात 12 शेतक-यांना शेरा कमी केलेला 7/12 उता-याचे ‍वितरण, नव्याने लागु झालेल्या मराठा आरक्षणाचे दाखल्याचे वितरण, तर  पात्र असलेले पिवळे  शि धापत्रीका व केशरी  शि धापत्रीकांचे वितरण हे अप्पर जि ल्हा धि कारी  गुलाबराव खरात यांच्या हस्ते करण्यात आले.
संजय गांधी शाखेचे नायब तहसिलदारांचा सत्कार
          आधारवड योजनेत सर्वाधीक लाभार्थीं करण्याचा मान चाळीसगांव प्रशासनाने मिळवीला असून या कामात सक्रीय सहभाग घेणारे नायब तहसिलदार ए.एन.परमार्थी यांचा गुलाबराव खरात यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला.

         या कार्यक्रमासाठी तालुक्यातील शेतकरी, नागरिक, लाभार्थी मोठया संख्येने उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नायब तहसिलदार विशाल सोनवणे यांनी केले तर नैसर्गीक आपत्तीमुळे पुणे ‍जिल्हयातील माळीण या गावातील मयत नागरिकांना श्रध्दांजली वाहून नानासाहेब आगळे यांनी आभार व्यक्त केले.


* * * * * * * *