Thursday, 29 May 2025

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर

 


महाराणा प्रतापांचे जीवन म्हणजे स्वाभिमान, त्याग व स्वराज्यासाठीचा झुंजार लढा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

            अमळनेर, दि. २९ मे (जिमाका वृत्तसेवा) – महाराणा प्रताप हे केवळ राजे नव्हते, तर स्वराज्यासाठी लढणारे असामान्य योद्धा होते. त्याग, स्वाभिमान आणि मातृभूमीप्रेम ही त्यांची ओळख असून युवा पिढीने त्यांच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

            अमळनेर येथे महाराणा प्रताप जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, जि.म.स. बँकेचे चेअरमन संजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी प्रतिमापूजन करून महाराणा प्रतापांना अभिवादन केले.

            स्वाभिमानासाठी त्यांनी कधीही तडजोड केली नाही, हे त्यांच्या संघर्षमय जीवनातून स्पष्ट होते, असे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. जिद्द, निष्ठा आणि देशप्रेम या गुणांचे महत्त्व आजच्या तरुणांनी आत्मसात करावे, असे आमदार अनिल पाटील यांनी नमूद केले.

            कार्यक्रमास विविध पदाधिकारी, विद्यार्थी, युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जळगाव बुलेटीन-2025


जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव बुलेटीन-2025

दिनांक 27 मे, 2025 ते दिनांक 29 मे, 2025

पॉश ( POSH )कायदा 2013 अंतर्गत खाजगी आस्थापनांना ‘शी बॉक्स पोर्टल’वर नोंदणी करण्याचे निर्देश

जळगाव, दि. 29(जिमाका): कामाच्या ठिकाणी महिलांना लैंगिक छळापासून संरक्षण देणाऱ्या (POSH - Prevention of Sexual Harassment) कायदा, 2013 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार सर्व खाजगी आस्थापनांनी ‘शी बॉक्स पोर्टल’ (SHE BOX Portal) वर अंतर्गत तक्रार निवारण समितीची माहिती नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

१० पेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या सर्व खाजगी आस्थापनांनी ‘शी बॉक्स पोर्टल’वर नोंदणी करून त्यांच्या आस्थापनांतील अंतर्गत तक्रार समितीची माहिती अपलोड करणे आवश्यक आहे. यासाठी https://shebox.wcd.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ‘प्रायव्हेट हेड ऑफिस रजिस्ट्रेशन’ (Private Head Office Registration) या टॅबवर क्लिक करून, संबंधित माहिती भरून सादर करणे गरजेचे आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व खाजगी आस्थापनांना लवकरात लवकर ‘शी बॉक्स पोर्टल’वर नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या मार्फत करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात 2 जून रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

जळगाव, दिनांक 29 (जिमाका वृत्त ): दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दिनांक 2 जून 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता अल्पबचत सभागृह जळगाव येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी दिली आहे.


या दिवशी संबधित तक्रारदार हे प्रत्यक्ष अर्ज सादर करणार असल्याने संबधित विभागाच्या विभाग प्रमुख यांनी देखील लोकशाही दिनी उपस्थित राहणे आवश्यक असणार आहे.

नागरिकांनी आपल्या तक्रारी घेऊन लोकशाही दिनी उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

अमळनेरला भव्य तालुका क्रीडा संकुलाची भेट




तालुका क्रीडा संकुल युवाशक्तीला दिशा देणारा ऐतिहासिक टप्पा - मंत्री गुलाबराव पाटील

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि आमदार अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती
जळगाव, दि. २८ मे (जिमाका)- "क्रीडा ही केवळ शारीरिक व्यायामाची बाब नसून ती शिस्त, सहकार्य, आत्मविश्वास आणि नेतृत्व यांचा विकास करणारी शाळा आहे. अमळनेर सारख्या ग्रामीण भागात अशा भव्य क्रीडा संकुलाची नितांत आवश्यकता होती. आज ती गरज पूर्ण होत आहे, ही बाब तालुकावासीयांसाठी समाधानाची आणि प्रेरणादायी आहे," असे गौरवोद्गार पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले, "सुदृढ आणि सशक्त युवक म्हणजेच सक्षम राष्ट्राची पायाभरणी आहे. हे संकुल नवोदित खेळाडूंना दर्जेदार सुविधा आणि प्रोत्साहन देईल. याच माध्यमातून उद्याचे ऑलिम्पिकपटू घडावेत, हीच अपेक्षा आहे. केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर खेळांच्या माध्यमातून मनोबल, सहिष्णुता आणि संघभावना यांचा विकास होतो. शासनाच्या प्रयत्नातून ग्रामीण भागातील युवकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होत आहे," असेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले.
अमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात करण्यात आले. यावेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आ.अनिल पाटील, माजी आ. साहेबराव पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, अमळनेर प्रांताधिकारी नितीन मुंडावरे, तहसीलदार तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, "गावा - गावातील युवकांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे. ती जर योग्य दिशेने वापरली तर गाव, राज्य आणि देशाचा विकास शक्य होतो. या संकुलामुळे ग्रामीण खेळाडूंना दर्जेदार सुविधा मिळतील आणि ते प्रेरित होतील, असा मला विश्वास आहे. सहकार चळवळ आणि क्रीडा संस्कृती ही दोन्ही ग्रामीण विकासासाठी पूरक आहेत," असे मत त्यांनी मांडले.
आ. अनिल पाटील यांनी तालुक्यातील क्रीडा संस्कृतीसाठी हे नूतन संकुल फार उपयुक्त ठरेल, अशी आशा व्यक्त करत आनंद दर्शविला.या प्रसंगी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक, क्रीडाप्रेमी नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचे स्केटिंग खेळाचे प्रात्यक्षिक
यावेळी सर्व मान्यवरांच्या समोर स्केटिंग मध्ये विशेष प्रविण्य असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या स्केटिंग ट्रॅकवर चित्तथरारक स्केटिंगचा7 खेळ करून दाखविला
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी सांगितले की, अमळनेर येथे उभारण्यात आलेल्या या क्रीडा संकुलात कुस्ती, कराटे, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धिबळ, कॅरम, योग, मार्शल आर्ट्ससाठी स्वतंत्र हॉल, ४०० मीटर धावपट्टी, बास्केटबॉल कोर्ट, स्केटिंग रिंग, ओपन जिम आदी सुविधा खेळाडूंकरिता उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी यांनी मानले.

TAIT-2025 परीक्षा वेळापत्रकात बदल : उर्दू माध्यमातील D.El.Ed विद्यार्थ्यांसाठी विशेष व्यवस्था

जळगाव दि. 29(जिमाका) :- महाराष्ट्रातील शिक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT)-2025 या परीक्षेचे आयोजन 27 मे ते 30 मे 2025 आणि 2 जून ते 5 जून 2025 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले आहे. ही परीक्षा राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शाळांमध्ये "पवित्र" प्रणालीद्वारे घेतली जाणार आहे.

दरम्यान, उर्दू माध्यमातील एकूण 1107 उमेदवारांची डी.एल.एड द्वितीय वर्षाच्या अंतिम सत्र परीक्षा आणि TAIT-2025 परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने, अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने, संबंधित उमेदवारांची TAIT परीक्षा 3 जून 2025 ऐवजी 30 मे 2025 रोजी घेण्यात येणार आहे.
तरी विद्यार्थी उमेदवारांनी या बदलाची नोंद घेऊन परीक्षेस दिलेल्या दिनांकास व वेळेत उपस्थित रहावे. त्यानुसार झालेल्या बदलाप्रमाणे स्वतःची माहिती तपासून प्रवेशपत्र ऑनलाईन पध्दतीने प्राप्त करुन घेऊन परीक्षेस उपस्थित व्हावे याबाबत सर्वस्वी जबाबदारी उमेदवाराबर राहिल याची नोंद घेण्याचे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

गरिब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी संधी : "WINGYAAN" अंतर्गत मोफत डिप्लोमा इन अ‍ॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स प्रशिक्षण


जळगाव दि. 29(जिमाका) :- फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रा. लि. (FIAPL) आणि सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (SSPU), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने "WINGYAAN" हा अत्यंत महत्त्वाचा CSR उपक्रम राबविण्यात येत आहे. हा कार्यक्रम जळगाव जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या मागास (BPL) मुलींसाठी उच्च शिक्षण आणि रोजगारक्षमता वाढवण्यासाठी एक सुवर्णसंधी ठरणार आहे.
WINGYAAN बॅच-V: "डिप्लोमा इन अॅडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स" हा तीन वर्षांचा पूर्णवेळ डिप्लोमा कोर्स आहे. ज्यात 22 महिन्यांचे शैक्षणिक प्रशिक्षण आणि 14 महिन्यांचे ऑन-द-जॉब प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यात यशस्वी विद्यार्थिनींना नामांकित कंपन्यांमध्ये सुमारे 20,000/- प्रति महिना पगारासह नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहे.
कोर्स फी, निवास, जेवण, गणवेश आणि वैद्यकीय विमा FIAPL द्वारे प्रायोजित करण्यात येणार आहे. याकरिता उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण व तिचे वय 16 ते 19 वर्षे (10 जून 2025 पर्यंत) पुर्ण असावे. विद्यार्थिनी दारिद्रयरेषेखालील BPL पिवळे रेशन कार्ड धारक असावी.
या डिप्लोमा कोर्स करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2025 आहे. अर्ज करण्याकरिता अर्जाची हार्ड कॉपी CSR विभाग, फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रा. लि., B-19, M.I.D.C. रांजणगांव, ता. शिरूर, जि. पुणे - 412220 व सॉफ्ट कॉपी ईमेल amol.fatale@fiapl.com यावर पाठवावी. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर https://jalgaon.gov.in/ जाऊनही अर्ज नोंदवू शकतात
अधिक माहितीसाठी अमोल फटाले: +91 9673330468, amol.fatale@fiapl.com, व शुभम बडगुजरः +91 9975103001, Shubham.Badgujar@fiapl.com यांना संपर्क करावा. जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुलींनी या योजनेचा फायदा घ्यावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहाय्यक आयुक्त संदीप गायकवाड यांनी केले आहे.

नवयुगाचा नवा निर्धार – कायदा, संधी आणि समृद्धीकडे वाटचाल"






 नवयुगाचा नवा निर्धार – कायदा, संधी आणि समृद्धीकडे वाटचाल"

शस्त्र परवाना प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी
जळगाव : श्री. आयुष प्रसाद यांनी आज महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील उमर्टी गावास भेट देऊन स्थानिक युवक व ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. या संवादादरम्यान, त्यांनी नम्रपणे स्पष्ट केले की काहीवेळा गुन्हेगारी प्रकरणांत या परिसराचा उल्लेख होतो, मात्र ते आपल्यालाही योग्य वाटत नाही आणि आम्हालाही ते समाधानकारक वाटत नाही. हा उल्लेख परिसराच्या प्रतिमेपेक्षा अधिक गृहितकांवर आधारित असू शकतो.
आजच्या तंत्रज्ञान, नवोन्मेष व उद्योजकतेच्या युगात ग्रामीण भागातील युवकांसमोर अनेक सकारात्मक संधी उपलब्ध आहेत — शेती, उद्योग, व्यवसाय, डिजिटल सेवा, नोकरी, स्वयंरोजगार अशा अनेक क्षेत्रांत भविष्य घडवता येते. जिल्हा प्रशासन त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन व सहकार्य देण्यास सदैव तत्पर आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक ज्येष्ठ नागरिकांना आवाहन केले की, युवकांना प्रेरणादायी मार्गदर्शन द्यावे, त्यांच्या स्वप्नांना दिशा द्यावी आणि त्यांना कायदेशीर व सकारात्मक वाटेवर प्रोत्साहित करावे. कोणताही गैरप्रकार अथवा अनधिकृत कृती परिसरात घडल्यास, ते पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास तत्काळ आणून द्यावेत.
या संवादातून सीमावर्ती भागातील नागरिकांचा सहभाग, सशक्तीकरण आणि सकारात्मक ऊर्जा अधिक बळकट होईल. दोन्ही राज्यांती

चाळीसगाव MIDC उत्तर महाराष्ट्रातील उद्योग व्यवसायाच्या केंद्रस्थानी येणार...


 चाळीसगाव MIDC उत्तर महाराष्ट्रातील उद्योग व्यवसायाच्या केंद्रस्थानी येणार...

मुंबई येथे उद्योगमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत D+ झोनच्या मंजुरीचा ऐतिहासिक निर्णय..!

राज्याचे उद्योग मंत्री ना.श्री.उदयजी सामंत यांच्या अध्यक्षतेखाली व पालकमंत्री ना.श्री.गुलाबरावजी पाटील, वस्रोद्योग मंत्री ना.श्री.संजयजी सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्व आमदार, सबंधित विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत जळगाव जिल्ह्यातील प्रमुख MIDC पैकी एक असणाऱ्या चाळीसगाव तालुक्याच्या औद्योगिक विकासासाठी आवश्यक असणाऱ्या महत्वाच्या मुद्द्यांकडे मंत्री महोदयांचे लक्ष वेधले.
चाळीसगाव तालुका सध्या D+ झोनमध्ये समाविष्ट नसल्याने जागा उपलब्ध असूनही गेल्या ५ वर्षात एकही मोठा उद्योग तेथे येऊ शकला नाही, त्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या विविध औद्योगिक सवलती, अनुदाने व प्रोत्साहन योजना लागू होत नाहीत. त्यामुळे स्थानिक उद्योजक व युवकांना उद्योग उभारणीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सद्यस्थितीत चाळीसगाव MIDC मध्ये भारत वायररोप, गुजरात अंबुजा व बिरला प्रीझिशन आदी प्रमुख कंपन्या यशस्वीपणे सुरु आहेत, चाळीसगावची भौगोलिक परिस्थिती पाहता रेल्वे व महामार्गाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे कनेक्टीव्हिटी हि नवीन उद्योगांसाठी अनुकूल आहे. उद्योग विभागाचे झोन निर्धारण निकष - सामाजिक मागासलेपण, बेरोजगारीचा दर, प्रति व्यक्ती उत्पन्न, स्थलांतर दर, औद्योगिक वाणिज्य स्थिती- हे सर्व निकष बघता जळगाव औद्योगिक क्षेत्रात विशेषतः चाळीसगाव औद्योगिक क्षेत्राचे D+ Zone मध्ये समाविष्ट करणे क्रमप्राप्त ठरते अशीमागणी मी यावेळी केली.
माझ्या मागणीला मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत चाळीसगाव तालुक्याचा D+ झोन मध्ये समावेश करण्याचा तत्काळ निर्णय घेतला त्याबद्दल उद्योगमंत्री ना.उदयजी सामंत यांचे मनापासून आभार. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अजितदादा पवार तसेच नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या काळात चाळीसगाव MIDC उत्तर महाराष्ट्रातील उद्योगक्षेत्राच्या केंद्रस्थानी येऊन तालुक्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळेल असा मला विश्वास आहे.

महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन


मुंबई, दि.२९ : राजे महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी मंत्रालयातील उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही महाराणा प्रताप सिंह यांना अभिवादन केले

Tuesday, 27 May 2025

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर

 


छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर

 


छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर

 


छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर

 


छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर

 


छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर

 


छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर

 


जलजागर जलसंधारण स्पर्धा 2024-25 : नागरिकांना सहभागाचे आवाहन

 


छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर

 


छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर

 


छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर

 


छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर

 


छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर

 


छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर

 


छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर

 


छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर

 


जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव बुलेटीन-2025



 जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव बुलेटीन-2025

दिनांक 17 मे, 2025 ते दिनांक 26 मे, 2025

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर

 


छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर

 


छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर

 


छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर

 


छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर

 


छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर

 


छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर

आपल्या मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये महसूलविषयक तक्रारींचे निराकरण, शेतजमिनींचे उतारे, प्रमाणपत्रे, वारस नोंद, नकाशे, तक्रार निवारण इत्यादी सेवांसाठी एकाच ठिकाणी सुविधा उपलब्ध!

Monday, 26 May 2025

राज्यात विक्रमी मान्सून धडक — ६८ वर्षांचा विक्रम मोडला; गिरीश महाजन मंत्रालयात परिस्थितीवर नजर






मुंबई | २६ मे २०२५ | विशेष प्रतिनिधी

राज्याच्या हवामान इतिहासात आज एक नवा अध्याय लिहिला गेला आहे. भारतीय हवामान विभागाने २६ मे २०२५ रोजी मुंबईत मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली असून, ही नोंद गेल्या ६८ वर्षांत सर्वात लवकर झालेली आहे. सरासरी मान्सून आगमनाची तारीख ११ जून असून, यंदा तब्बल १६ दिवस आधी मान्सूनची दमदार एंट्री झाली आहे.

इतिहासातले सर्वात लवकर मान्सून आगमन — संदर्भीय नोंदी

गेल्या काही दशकांतील सर्वात लवकर मान्सून आगमन खालीलप्रमाणे:

१९५६: २९ मे

१९६१: २९ मे

१९७1: २९ मे

२०९१ ते २०२४ पर्यंत: बहुतांश वेळा ७ जून ते १३ जून दरम्यान

२०२५: २६ मे (सर्वात लवकर!)

ही नोंद केवळ मुंबईसाठीच नव्हे तर पश्चिम किनारपट्टीसाठीही एक ऐतिहासिक बदल मानली जात आहे. हवामानतज्ज्ञांच्या मते, अरबी समुद्रावरील कमी दाबाचा पट्टा आणि बदललेली वाऱ्यांची दिशा यामुळे यंदाचा मान्सून गतीने पुढे सरकला.

पावसाचा पहिला जोर: मुंबई जलमय

२६ मे रोजी सकाळी ८:३० ते ११:३० यावेळेतील पावसाची नोंद:

कुलाबा: १०५.२ मिमी

सांताक्रूज: ५५ मिमी

मुंबईत अनेक सखल भाग जलमय झाले असून वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे. नागरिकांनी सोशल मीडियावर पावसाचे व्हिडीओ आणि परिस्थिती शेअर करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

आपत्ती व्यवस्थापन सज्ज — गिरीश महाजन मैदानात उतरले

राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा. गिरीश भाऊ महाजन यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आज सकाळीच मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षात थेट उपस्थित राहून सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षालाही भेट दिली.

विशेष म्हणजे, महापालिकेच्या नियंत्रण कक्षात उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे हे स्वतः उपस्थित होते. त्यांनी स्थानिक यंत्रणांशी समन्वय साधून उपाययोजनांचा आढावा घेतला.

गिरीश महाजन यांनी सांगितले —

सध्या मी स्वतः मंत्रालयात उपस्थित असून राज्य नियंत्रण कक्षातून सतत जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला जात आहे. मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मी सातत्याने समन्वय साधत आहे. सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज आहेत. नागरिकांनी सहकार्य करावे, हीच विनंती."

नागरिकांना प्रशासनाचे आवाहन

अनावश्यक प्रवास टाळावा

पाण्याच्या प्रवाहात किंवा साचलेल्या भागात जाणे टाळावे

समुद्रकिनाऱ्यांवर फिरायला जाणे पूर्णतः टाळावे

हवामान खात्याच्या सूचना आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अपडेट्सवर सतत लक्ष ठेवावे

पूर्वीचा अनुभव, यंदाची तयारी

२०१९ साली मुंबईत मुसळधार पावसामुळे संपूर्ण यंत्रणा विस्कळीत झाली होती. ट्रेन सेवा बंद पडली होती, शाळांना सुट्ट्या जाहीर झाल्या होत्या, आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. मात्र यंदा गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असून, पहिल्याच दिवशी योग्य उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.

सरकार सज्ज, जबाबदारी सर्वांची

राज्य सरकारने यंत्रणा तातडीने कामाला लावली आहे. मात्र पावसामुळे निर्माण होणाऱ्या आपत्तीतून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनीही सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक आहे.