Friday, 19 September 2014

चाळीसगाव तालुक्यात मतदार जनजागृती साठी स्वीप-2 कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी : प्रातांधिकारी मनोज घोडे


चाळीसगाव तालुक्यात मतदार जनजागृती साठी
स्वीप-2 कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी
: प्रातांधिकारी मनोज घोडे
 
            चाळीसगांव,दिनांक 19:- भारतीय लोकशाही अधिक बळकट व्हावी यासाठी मतदारांना अधिक साक्षर व जागृत करण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने स्वीप-2 (SVEEP-II) (Systematic Voter’s Education & Electoral Participation)‍ हा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. गेल्या लोकसभा निवडणूकीचेवेळी मतदारांची मोठया प्रमाणावर नोंदणी होऊन विक्रमी मतदान झाले असून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2014 करिता देखील स्वीप-2 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मतदार जनजागृतीसाठी स्वीप-2 कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी बाबत चर्चा करण्यात आली.सदर बैठकीस  निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रातांधिकारी मनोज घोडे यांनी मार्गदर्शन केले.
            स्वीप-2 या कार्यक्रमात प्रामुख्याने 18 वर्षावरील लोकसंख्येएवढी मतदारांची संख्या असावी (100 % EP Ratio) एकूण लोकसंख्येमधील ‍ महिलांचे प्रमाण आणि एकूण मतदारांमधील महिलांचे प्रमाण सारखे असावे, 18 ते 19 या वयोगटातील युवकांच्या मतदानांच्या प्रमाणात वाढ करणे, शहरी क्षेत्रामध्ये मतदानाचे प्रमाण वाढावे, वंचित समाज/समुह यांची मतदार नोंदणी वाढावी आणि मतदानामध्ये त्यांचा सहभाग वाढावा, मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी उपाययोजना कराव्यात, निवडणूकीमध्ये मतदानाच्या सरासरी प्रमाणामध्ये वाढ करणे, टपाली मतदानाचे प्रमाण गेल्या लोकसभा निवडणूकीपेक्षा मोठया प्रमाणात वाढावे अशा प्रकारची प्रमुख उदिदष्टे ही या कार्यक्रमातंर्गत असून याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी  तहसिल कार्यालयात मतदान जनजागृती सेल (SVEEP-II) ची स्थापनाही करण्यात आली आहे. या कक्षाचे प्रमुख म्हणून  रविंद्र जाधव, मुख्याधिकारी न.पा. व विशाल सोनवणे, नायब तहसिलदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
            स्वीप-2 कार्यक्रमाचे अंमलबजावणी संदर्भात झालेल्या बैठकीत शहरी क्षेत्रामध्ये मतदानाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते. त्याची नेमकी कारणे शोधून त्यासंबंधी उपाययोजना करणे, आपल्या मतदार संघामध्ये जे समाज/समुह वंचित राहिले आहेत अशा समाज/समुहांचा शोध घेणे व त्यांची वस्ती आणि त्यांची संस्कृतीचा अभ्यास करुन त्यांना मतदान प्रक्रीयेमध्ये सहभागी करुन घेण्यासाठी त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधावा, एकूण लोकसंख्येच्या तुलनेत आजही अशिक्षीत समाजातील मतदारांना निवडणूकीच्या कार्यक्रमाचे व लोकशाही प्रक्रीयेचे महत्व समजावून मतदान प्रक्रीयेत सहभागी होण्यास प्रवृत्त करणे, लोक शिक्षण/प्रौढ शिक्षणाच्या माध्यमातून जनजागृती करणे, मोबाईल व्हॅन्स, ग्रामसभा, सणासुदीच्या /जत्रांच्या काळात लोकजागृती करणे अशा विविध प्रकारच्या करावयाच्या उपाय योजनांबाबत नियोजन करण्यात आले.या बैठकीला सहा.निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गाढवे, मुख्याधिकारी न.पा.चे रविंद्र जाधव, नायब तहसिलदार ‍विजय सुर्यवंशी, विशाल सोनवणे, नानासाहेब आगळे, अनंत परमार्थी, जी.आर.वाघ, आर.बी.ब्राम्हणे यांच्यासह महसूल कार्यालयातील तसेच निवडणूक कामकाजासाठी सेवावर्ग केलेले अधिकारी ,कर्मचारी  मोठया संख्येने उपस्थित होते.
विविध महाविद्यालयातील दहा कॅम्पस ॲम्बेसेडरांची मतदार जागृती अभियान
ज्या विद्यार्थ्यांचे वय 1 जानेवारी, 2014 रोजी अठरा वर्षे पुर्ण असून अशा नवमतदारांमध्ये मतदानाचे व लोकशाहीचे महत्व पटवून देण्यासाठी तालुक्यातील विविध महाविद्यालयातील दहा विद्यार्थ्यांची कॅम्पस ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे नियुक्ती आदेशांचे वितरणही करण्यात आले. तहसिल कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांना नवमतदार जनजागृती विषयी मार्गदर्शन करण्यात आले.

                                                    * * * * * * * *

No comments:

Post a Comment