जळगांव दि. 26 :- महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 52 वा
वर्धापनदिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम दि.1 मे 2012 रोजी पोलिस कवायत मैदान, पोलिस
मुख्यालय जळगांव येथे सकाळी ठिक 8 वाजता होणार आहे. तसेच संचलन समारंभ होणार आहे
या कार्यक्रमास स्वातंत्र्य सैनिक, राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, अधिकारी व
कर्मचारी आणि जळगांव शहरातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन
जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment