Wednesday, 29 October 2014

जनतेच्या आरोग्याशी खेळणा-यांची गय करणार नाही : आमदार उन्मेश पाटील


जनतेच्या आरोग्याशी खेळणा-यांची गय करणार नाही !

: आमदार उन्मेश पाटील


            चाळीसगांव,दिनांक 29:- जनतेच्या आरोग्याशी खेळणा-यांची गय करणार नाही असे प्रतिपादन आमदार उन्मेश पाटील यांनी डेंग्यु आजाराच्या उच्चाटनासाठी आयोजीत तालुकास्तरीय कार्यशाळेत केले. शहरातील परदेशी बोर्डींग हॉल मध्ये या कार्यशाळेस उपविभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील, गट विकास अधिकारी मालती जाधव, मुख्याधिकारी रविंद्र जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डी.के.लांडे, संजय पाटील, राजेंद्र चौधरी यांच्यासह पंचायत समिती सदस्य,जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक आदी उपस्थित होते.

            तालुक्यात डेंग्यु आजाराची मोठया प्रमाणात लागण झाली असून त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आणि सदर कार्यशाळेस अनुपस्थीत राहणा-या अधिकारी कर्मचा-यांवर कठोर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले. डेंग्यु आजाराचे उच्चाटन करण्यासाठी जनजागृती होणेही तितकेच गरजेचे असून अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य सेवक, कृषी सेवक यांनी तळागाळातील जनतेपर्यंत जाऊन प्रबोधन करावे. डेंग्युवर नियंत्रण मिळवण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा असून प्राथमीक आरोग्य केंद्रातील प्रत्येक अधिकारी कर्मचा-यांनी जबाबदारी झटकून चालणार नाही तर मनापासून काम करावे लागेल. तसेच चांगले काम करणा-या अधिकारी कर्मचा-यांचा सन्मान देखील करण्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.

प्रशासनातर्फे सुक्ष्म नियोजनाची गरज

            डेंग्यु आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनातर्फे सुक्ष्म नियोजनाची गरज असून प्रशासनामधील अधिकारी कर्मचा-यांनी आपला अनुभव व कौशल्याची योग्य सांगड घालावी असेही आमदार पाटील यांनी सांगीतले. शहराला व ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणा-या पाणवठयांच्या स्वच्छतेबाबतही संबंधीतांना सुचना केल्या. जनतेचा व शासनाचा दुवा म्हणून लोकांच्या सुचना आपल्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करण्यात येतो परंतु त्याची दखल न घेतल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल अशा सुचनाही त्यांनी आपल्या आवाहनात्मक भाषणातून दिल्या.

कामचुकार कर्मचा-यांवर कडक कारवाई करणार

            यावेळी कार्यशाळेस अनुपस्थीत कर्मचा-यांची स्वत: आमदारांनी हजेरी घेतली तर अनुपस्थीत कर्मचा-यांवर प्रशासनातर्फे कडक कारवाई करण्याच्या सुचनाही सर्व विभाग प्रमुखांना केल्या. कार्यशाळेचे आयोजन केवळ कागदावर नको असून प्रत्यक्ष कृती झाली पाहिजे अशी आपेक्षाही त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली. तर पाणी टंचाई ही डेंग्यु आजाराची मुख्य समस्या असून यावर उपाययोजना करण्यासाठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना सुचना केल्या.

            डेंग्यु तापाचा प्रसार कसा होतो, डेंग्यु ताप म्हणजे काय, डेंग्यु तापाची लक्षणे, लक्षणे आढळल्यास काय कराल, डेंग्यु रक्तस्त्रावात्मक तापाची लक्षणे या बाबत वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद सोनवणे, डॉ.सुरेश पाटील, डॉ.कपील पाटील यांनी मार्गदर्शन केले तर डेंग्यु आजाराच्या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रामुख्यांने आठवडयातील एक ‍दिवस कोरडा दिवस पाळावा हे प्रामुख्याने सांगीतले.

            यावेळी प्राथमि क आरोग्य केंद्रातील अधि कारी, कर्मचारी,ग्रामसेवक, तलाठी, ग्राम विस्तार अधि कारी, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेवीका, आशा वर्कर आदी मोठया संख्येने उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे आभार उप विभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील यांनी मानले.

* * * * * * * *

No comments:

Post a Comment