Wednesday, 29 October 2014

स्वच्छता अभियानात लोकसहभाग महत्वाचा : प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील


स्वच्छता अभियानात लोकसहभाग महत्वाचा !

: प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील

            चाळीसगांव,दिनांक 29:- स्वच्छता अभियानात लोकसहभाग महत्वाचा असल्याचे प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील यांनी आज स्वच्छ भारत अभियानातंर्गत तालूका प्रशासनाच्या आयोजित बैठकीत सांगितले. तहसिल कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या बैठकीस उप विभागीय पोलीस अधिकारी केशव पातोंड, गटविकास अधिकारी मालती जाधव, मुख्याधिकारी  रविद्र जाधव यांच्यासह तालुकयातील सर्व कार्यालय प्रमुख उपस्थित होते.

            केंद्र शासनाच्या परिपत्रकानुसार स्वच्छ भारत अभियान हे २ ऑक्टोंबर, 2014 पासून राबविण्यात येत असून, निवडणूक आचार संहितेमुळे राज्यात याची अंमलबजावणी 1 नोव्हेंबर, 2014 पासून सुरु करण्यात येत आहे. स्वच्छता अभियान हे दिर्घ कालीन असून सन 2019 पर्यंत संपुर्ण स्वच्छ भारताचे लक्ष ठेवून अधिकाधिक लोकांनी या अभियानात सक्रीय सहभाग नोंदवावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. उपस्थित सर्व अधिका-यांनी आपल्या कार्यालयापासून स्वच्छता अभियानास सुरुवात करावयाची असून जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या सुचनेनुसार प्रत्येक कार्यालयातील संपुर्ण अधिकारी कर्मचा-यांना अभियानाची सक्ती करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

            दिनांक 01 नोव्हेंबर, 214 रोजी सकाळी 08:00 वाजता  शहरातील हंस चित्रपट गृहासमोरील अनिल नगर येथून या अभियानास सुरुवात होणार असून सर्व शासकीय अधि कारी, कर्मचा-यांनी या ठिकाणी उप स्थित राहून सहभाग नोंदवावा तसेच शहरातील तमाम नागरिकांनी देखील या मोहिमेत सहभाग घेऊन स्वच्छ भारताचे स्वप्न पुर्ण होण्यासाठी श्रमदान करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

            प्रत्येक कार्यालय प्रमुखांनी  आपल्या स्तरावरून परिपत्रक काढून सर्व कर्मचा-यांना सुचित करावे व दिनांक 31 ऑक्टोंबर व 1 नोव्हेंबर रोजी आपल्या कर्मचा-यांसह या मोहिमेस उपस्थित रहावे तसेच ग्रामीण भागातील ग्रामपंचायत स्तरावरील अभियानाचे आयोजन करण्याची जबाबदारी  गटविकास अधिकारी मालती जाधव यांच्यावर तर शहरी भागातील मुख्याधिकारी रविंद्र जाधव यांच्यावर सोपविण्यात आली आहे. प्रत्येक ग्रामपंचात स्तरावरील ग्रामपंचायत सदस्य,जिल्हा परिषद व पंचायत  समिती सदस्यांसह विविध पदाधि का-यांनाही यामध्ये सहभागी करुन घ्यावे तसेच तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक, वायरमन, अंगणवाडी सेवीका, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी यांनी ग्रामीण भागात सदर अ भि यान यशस्वी करुन प्रत्येक गावापर्यंत स्वच्छतेचा संदेश पोहचविण्याचे पवित्र काम करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पोलीस दलही होणार सहभागी : उपविभागीय पोलीस अधिकारी केशव पातोंड

            स्वच्छ भारत अभियानात तालुक्यातील संपुर्ण पोलीस दल, होमगार्डसह एन.सी.सी.चे पथकही या मोहिमेत सहभागी होऊन श्रमदान करणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी केशव पातोंड यांनी यावेळी सांगितले.

स्वयंसेवी संघटनाना सहभागाचे आवाहन

            स्वच्छ भारत अभियानात तालुका प्रशासनातर्फे राबविण्यात येणा-या उपक्रमात तालुक्यातील रोटरी क्लब, व्यापारी असोसिएशन, स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनीधी यांनीही सहभागी होऊन योगदान द्यावे असे आवाहन प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील यांनी यावेळी केले आहे.

                                           * * * * * * * *

सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमीत्त

राष्ट्रीय एकता दौड चे आयोजन

            चाळीसगांव,दिनांक 29:- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमीत्त दिनांक 31 ऑक्टोंबर, 2014 रोजी तालुका प्रशासनातर्फे राष्ट्रीय एकता दौड चे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील पोलीस परेड मैदानापासून याची सुरवात सकाळी 08:00 वाजता होणार असून त्यापुर्वी  प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील हे उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिनानिमीत्त राष्ट्रीय एकतेची शपथ देतील त्यानंतर राष्ट्रीय एकात्मता, अखंडता, सुरक्षा आणि संरक्षण याबाबत संदेश देत हया रॅलीची सुरुवात होऊन शहरातून घाट रोड कडे मार्गक्रमण होईल संपुर्ण २ किलोमिटर पर्यंत या एकता दौडचे आयोजन करण्यात आले असून या कालावधीत हा मार्ग रहदारीसाठी काही काळ बंद करण्याच्या सुचना पोलीस प्रशासनास देण्यात आल्या आहेत. या दौडमध्ये शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, खेळाडू, विद्यार्थी, युवक, शासकीय निमशासकीय कर्मचा-यांनी मोठया प्रमाणात सहभागी होऊन राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवावे असे आवाहन प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील यांनी केले आहे.

                                                              * * * * * * * *

No comments:

Post a Comment