Friday, 29 November 2024

जागतिक एड्स दिन निमित्ताने जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक समिती व सामान्य रुग्णालयतर्फे विविध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन


जळगाव, दिनांक 29 नोव्हेंबर ( जिमाका ) : १ डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून सर्वत्र पाळण्यात येतो, या दिवसाच्या निमित्ताने समाजात वेगवेगळ्या गटांमध्ये एच आय व्ही/ एड्स बद्दल जनजागृती व्हावी जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक समिती व सामान्य रुग्णालय जळगाव यांच्यातर्फे १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन व सप्ताह निमित्ताने प्रभातफेरी व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

१ डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत विविध जनजागृतीपर कार्यक्रम जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक पथक, शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे. ज्यात कौटुंबिक तपासणी आणि गाव पातळीवरील शिबिरे या योजना नव्याने राबविण्यात येणार आहे.

१ डिसेंबर पासून जिल्ह्या व तालुकास्तरावर रांगोळी, चित्रकला स्पर्धा, जनजागृती प्रभात फेरी, पथनाट्य, पोस्टर प्रदर्शन , ट्रक चालक व वाहक तसेच निगडीत कर्मचारी यांचा मेळावा, स्थालांतरित लोकांसाठी कार्यक्रम, भगिनी मोळावा, एआयव्हीसह जगणाऱ्यांनकरिता वधू वर मेळावा, शासकिय योजनेच्या माहितीचा मेळावा आशा अनेक उपक्रमांचे आयोजन डिसेंबर महिन्यात करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील यांनी दिली आहे.

रब्बी हंगामासाठी पाणी अर्ज भरण्यासाठीची मुदत 1 डिसेंबरपर्यंतच कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष किंवा पोष्टाने अर्ज सादर करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन


जळगाव, दिनांक 29 नोव्हेंबर ( जिमाका ) : वाघुर धरण विभाग जळगाव कार्यक्षेत्रातील वाघुर डावा कालवा व उजवा कालवा तसेच कालवा उपसा व जलाशय उपसा या प्रकल्पावर शक्य असेल तेथे कालव्याद्वारे (प्रवाही) तसेच अधिसुचीत / अनाधिसुचित लाभक्षेत्रातील नदी, नाला व इतर जलाशयातून उपसा सिंचनाने पाण्याचा उपयोग घेणा-या सर्व बागायतदारांनी चालू वर्षी प्रकल्पात उपलब्ध झालेल्या पाणी साठ्यानुसार रब्बी हंगाममध्ये 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2024 या मुदतीत कपाशी, ज्वारी, गहु, हरभरा, बारमाही भाजीपाला इतर तेलबिया कडधान्य व भूसार पिके इत्यादी पिकांसाठी पिण्याचे पाण्याचे आरक्षण व्यतिरीक्त उपलब्ध साठ्यातुन पाणी पुरवठा करणार असल्याचे वाघुर धरण विभागाचे उप कार्यकारी अभियंता प्र.अ. महाजन यांनी एका प्रसिद्धी पत्राद्वारे कळविळे आहे.
उन्हखरीप हंगाम सन 2024-25 अखेर शेतकऱ्यांना संपूर्ण थकबाकी भरणे आवश्यक राहणार आहे, पाटमोट संबंध नसावा, प्रत्येक चारीवर सलग क्षेत्रासच मंजुरी दिली जाईल, शेतचारी स्वच्छ व गवत काढलेली असावी. प्रत्यक्ष पास मिळाल्याशिवाय मंजूरी मिळाली असे समजू नये, पाणी अर्जाचा निर्णय संबंधित उपविभाग, पाटशाखेत/ ग्रांमपंचायत कार्यालय नोटीस बोर्डावर जाहीर करण्यात येईल, मुदतीनंतर आलेल्या पाणी अर्जावर नियमानुसार जास्त पाणीपट्टी आकारणी केली जाईल. मंजुर क्षेत्रसच व मंजुर पिकानांच पाणी घ्यावे लागणार आहे. पाणी अर्ज देतांना 7/12 उतारा किंवा खाते पुस्तीका संबंधित उपविभागास दाखवावी लागणार आहे. तसेच पाटबंधारे अधिनियम (कायदा) 1976 च्या प्रचलीत धोरणानुसार तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमीत केलेल्या शासन आदेशानुसारच मंजुरी देण्यात येणार आहे.

या सर्व अटींच्या पूर्ततेसह नमुना नं. 7 पाणी अर्जावर मागणी करून पाणी अर्ज 1 डिसेंबर 2024 च्याआंत संबंधित वाघुर धरण उपविभाग क्र. 1 व 2 वराडसिम, वाघुर धरण उपविभाग क्र. 3 व 4 नशिराबाद या कार्यालयात कार्यालयीन वेळेत पोष्टाने अगर प्रत्यक्ष जमा कराण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.

तसेच उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त काटकसरीने वापर करून अन्नधान्याचे अधिक उत्पादन वाढवावे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांचे ठोक जलप्रशुल्क निर्धारण आदेश दि. 29 मार्च 2022 नुसार सुधारीत दराप्रमाणे केलेली आकारणी भरणे बंधनकारक राहील. असे प्रत्रकात म्हटले आहे.

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळितधान्य पिकस्पर्धा रब्‍बी हंगाम -2024 साठी ३१ डिसेंबर पर्यंत करता येणार अर्ज


जळगाव, दिनांक 29 नोव्हेंबर ( जिमाका ) : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतक-यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, या उद्देशाने दरवर्षी राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येते.

यावर्षी देखील कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन २०२४ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या ५ पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पीक स्पर्धेसाठी रब्बी पीके ज्वारी, गहू, हरभरा,करडई व जवस अशा एकूण 05 पिकांचा सामावेश असणार आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वत:च्या नावे जमीन असून ती जमीन स्वत: कसत असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याला एकापेक्षा जास्त पिकासाठी पिकासाठी अर्ज करता येणार आहे. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीचे स्वतःच्या शेतावर त्यापीकाखाली किमान 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक असणार आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२,८-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास), पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा देखील आवश्यक आहे. ३१ डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांना अर्ज भरता येणार आहे. सर्वसाधारण गटासाठी पीकनिहाय (प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र) रक्कम रु.300 तर व आदिवासी गटासाठी पीकनिहाय रक्कम रु. 150 राहील.

तालुकास्तर,जिल्हास्तर, व राज्यस्तरावरील पिकस्पर्धा निकाल - प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेते निवडण्यात येणार आहे. या स्पर्धेतील बक्षिसाचे स्वरुप हे पातळीनुसार असणार आहे. ज्यात तालुका पातळीवरील पहिले बक्षिस पाच हजार रुपये , दुसरे बक्षिस तीन हजार रुपये, तिसरे बक्षिस –दोन हजार रुपये असणार आहे. तर जिल्हा पातळी वरील पहिले बक्षिस हे दहा हजार रुपये, दुसरे बक्षिस - सात हजार रुपये, तिसरे बक्षिस - पाच हजार रुपये आहे. राज्य पातळीवरील पहिले बक्षिस - पन्नास हजार रुपये, दुसरे बक्षिस - चाळीस हजार रुपये, तिसरे बक्षिस – तीस हजार रुपये असणार आहे.

पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्हावी याकरिता जास्तीत जास्त शेतक-यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे. असे आवाहन कृषि आयुक्तालयामार्फत करण्यात आल्याचे कृषी संचालक रफिक नाईकवाडी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Thursday, 28 November 2024

निवडणुकीतून मुक्त होताच जिल्हा प्रशासन लागले कामाला ; विविध योजनांचा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतला आढावा

 





              जळगाव, दिनांक 28 नोव्हेंबर (जिमाका वृत्त) : जळगाव जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा व विकासकामांचा आढावा आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात घेतला. त्यात दिशा (जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती ) समितीच्या विषयाशी निगडित बाबी अंतर्भूत होत्या.  

                   याप्रसंगी सर्व विकास कामांचा संबधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेवून सर्व प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सुचना संबधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. यावेळी ज्या यंत्रणाकडे कामे प्रलंबित आहेत, त्यांना फोनवर घेवून समोरासमोर अडचणी सोडवून दिल्या.

                   रेल्वेचे विविध ठिकाणचे प्रलंबित पूल, त्याला निगडित सार्वजनिक बांधकाम, भूसंपादन, क्रिडा, परिवहन, नगर विकास, वन, मुद्रांक शुल्क, नगर रचना, GSDA,  ग्रामीण विकास, जलसंपादन, शिक्षण विभाग, क्रिडा, जिल्हा उद्योक केंद्र, सहकार, कौशल्य विकास, नगरविकास, तहसिलदार संबधित प्रकरणे, पुर्नवसन, MIDC इत्यादी सर्व विभागातील प्रलंबित विकास कामांची व योजनांचा पाठपुरावा करण्यात आला.

                   राष्ट्रीय महामार्गाचा विषय अत्यंत महत्वाचा असल्याचे सांगून हे काम युद्ध पातळीवर करण्यासाठी आपण स्वतः जिथे अडथळा असेल तिथे हजर असल्याचे सांगून कामं सुरु आहेत पण त्याचा वेग अजून वाढविण्याची सूचना राष्ट्रीय महामार्ग यंत्रणेला यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिला.

                   या सोबतच जलसंपदा आणि इतर विभागातील सर्व प्रलंबित कामे योग्य समन्वय साधत त्वरित पुर्ण कराव्यात] अशा सुचना या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. याप्रसंगी ग्रामीण विकास प्रकल्प समन्वयक राजू लोखंडे, पुनर्वसन विभागाच्या उपजिल्हाधिकारी जयश्री माळी, पुनर्वसन विभागाचे दुसरे उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित  होते.

Wednesday, 27 November 2024

"विकासाचा विचार करताना पर्यावरण रक्षणाबद्दल दुराग्रही भूमिका नको" - राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन -




मुंबई, दिनांक २७ नोव्हेंबर : देशाच्या प्रगतीसाठी तसेच सर्वसामान्यांच्या हितासाठी विकासासोबतच पर्यावरण रक्षणही महत्त्वाचे आहे. मात्र पर्यावरण रक्षणाबाबत अनेकदा दुराग्रही भूमिका घेतली जाते. पर्यावरण आणि विकास यामध्ये समन्वय असला पाहिजे, पर्यावरणाबाबत दुराग्रही भूमिका नसावी, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

'पर्यावरणासाठी जीवनशैली : शाश्वत विकासासाठी भारतीय दृष्टिकोन' या विषयावरील चर्चासत्राचे उदघाटन राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत नॅशनल स्टॉक एक्स्चेंज, मुंबई येथील सभागृहात झाले, त्यावेळी ते बोलत होते.
चर्चासत्राचे आयोजन गोवर्धन इको व्हिलेज संस्थेने 'कोटक स्कूल ऑफ सस्टेनेबिलिटी', नॅशनल स्टॉक एक्स्चेंज, एनआयटी वारंगल, आदी संस्थेच्या सहकार्याने केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पर्यावरण रक्षणाला प्राधान्य दिले आहे. स्वच्छ ऊर्जा निर्मिती वाढविण्यासाठी तसेच कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र कधी - कधी पर्यावरण विषयांवर ताठर भूमिका घेतली जाते. दक्षिण भारतातील एका मार्गावरील चार झाडांच्या रक्षणासाठी न्यायालयात याचिका दाखल केली गेली. या महामार्गावर पंधरा वर्षात जवळजवळ तीन हजार लोकांचे बळी गेले, असे सांगून चार झाडे कापणे आवश्यक असेल तर त्याऐवजी २५ नवी झाडे लावण्यासारखी सकारात्मक अट घातली गेली पाहिजे, असेही राज्यपालांनी यावेळी सांगितले.
देशात जलसंवर्धन व नदीजोड प्रकल्पांचे काम झाल्यास देशातील अन्नधान्याचे उत्पादन अनेक पटींनी वाढेल व भारत संपूर्ण जगासाठी अन्नधान्य उत्पादन करू शकेल, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

भारतीय संस्कृतीमध्ये नदी, पर्वतराजी व वृक्षवल्लीची पूजा केली जाते. आपण निसर्गाचे व नैसर्गिक संपदेचे मालक नसून विश्वस्त आहोत ही भूमिका भारतीय विचारातून अधोरेखित केली जाते. वसुंधरा आपल्या विविधतेसह पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी गोवर्धन इको व्हिलेजचे संचालक गौरांग दास यांनी भारतीय विचारधारेतील पाण्याचा, अन्नधान्याचा व ऊर्जेचा जबाबदारीने विनियोग याबाबतचे चिंतन यावर भाष्य केले तसेच प्लास्टिक व इलेक्ट्रॉनिक कचऱ्याच्या आव्हानाबद्दल चिंता व्यक्त केली.

उद्घाटन सत्राला भारतीय नदी परिषदेचे सदस्य, 'रिव्हर मॅन ऑफ इंडिया' रमण कांत तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

पशुधन ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्वाचा घटक त्यासाठी पशुगणनेचे सूक्ष्म नियोजन करा : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद







 

              जळगाव, दिनांक 27 नोव्हेंबर ( जिमाका वृत्त ) : पाच वर्षातून एकदा होणारी पशु गणना ही ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी योजना आहे. या पशु गणनेच्या माध्यमातून विविध भागात असलेले पशुधन त्यांची परिस्थिती करावयाच्या उपायोजना या सर्व बाबींचे आकलन होत असल्याने पशु गणना अत्यंत सूक्ष्म पद्धतीने नियोजन करून करावी अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.

          जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात आयोजित पशु गणना प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित, पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक सहआयुक्त डॉ. बी. आर नरवाडे, उपायुक्त डॉ. प्रदीप झोळ, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, मास्टर ट्रेनर डॉ. अमित कुमार दुबे, जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.वाहेद तडवी आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, पशु गणनेच्या माध्यमातून पासून विषयी अत्यंत महत्त्वाची उपयुक्त माहिती मिळते.

          पशु प्राणी यांची काळजी कशी घ्यावी याची देखील माहिती या निमित्ताने पुढे येते. पशुगणना हा अत्यंत महत्त्वाचा विषय असल्याने पशु गणना ही सूक्ष्म नियोजन पद्धतीने करावी. पशु गणना करताना गाव खेड्यावरील एकही पशु सुटणार नाही याची काळजी घेणेदेखील गरजेचे आहे. गाव खेड्यावरील प्रत्येक गोठ्या पर्यंत जाऊन पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पशु गणना करणे आवश्यक असल्याचेही सूचना त्यांनी यावेळी दिल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी सांगितले की 25 नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या या पशुगणनेच्या माध्यमातून जिल्हाभरातील पशुंविषयी अत्यंत उपयुक्त अशी माहिती मिळणार आहे. पशुगणनेच्या माध्यमातून विविध जाती प्रजातींच्या पशूंची गणना होणार असून त्यानिमित्ताने जिल्ह्यात असलेल्या पशुधनाची आकडेवारी पुढे येणार आहे. पशुपक्ष्यांच्या माध्यमातून निर्माण होणारा दुग्ध व्यवसाय तसेच उत्पादन वाढीच्या दृष्टीने देखील पशुधनांना अत्यंत महत्त्वाची आहे. 21 वी पशुगणना ही मोबाईल ॲपच्या माध्यमातून होणार असल्यामुळे  गणना करताना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या. या प्रशिक्षण कार्यक्रमात बुलढाणा येथून खास उपस्थित असलेले मास्टर ट्रेनर डॉ.अमितकुमार दुबे यांनी पशु गणना करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.

२ डिसेंबर रोजी जळगाव जिल्हा युवा महोत्सवाचे छत्रपती श्री शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजन


                    जळगाव, दिनांक 27 ( जिमाका ) : जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नेहरू युवा केंद्र यांच्यामार्फत जळगाव जिल्ह्यातील युवक व युवतींच्या कलागुणांना संधी मिळावी यासाठी जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन २ डिसेंबर २०२४ रोजी छत्रपती श्री शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी दिली. युवकांचा सर्वांगिण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्तगुणांना वाव देणे यासाठी प्रतिवर्षी जिल्हास्तर, विभागस्तर, राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन क्रीडा विभागातर्फे करण्यात येते. १२ ते १६ जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


२०२४-२५ या वर्षात जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन हे विज्ञान व तत्रज्ञान या नवसंकल्पनावर आयोजित करावयाचे आहे. जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यलयामार्फत करण्यात येणार आहे. युवा महोत्सवामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान या संकल्पनेवर आधारीत प्रदर्शने, सांस्कृतिक स्पर्धा, लोकगीत, लोकनृत्य, कौशल्य विकास स्पर्धा, कथालेखन, चित्रकला, वत्क्तृत्व स्पर्धा, कविता, हस्तकला, वस्त्रोद्योग व अॅग्रो प्रॉडक्ट व मोबाईल फोटोग्राफी अशा विविध स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे. याच युवा महोत्सवाचा एक भाग म्हणजे जळगाव युथ आयकॉन-  ज्या  युवक/ युवतींनी सामाजीक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, तसेच नैसर्गिक आपत्ती, इतर आपत्कालीन परिस्थीतीत उल्लेखनिय कार्य केले असल्यास जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.


या युवा महोत्सवात १५ ते २९ वयोगटातील युवक व युवती सहभागी होऊ शकणार आहे . स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त खेळाडूंना शासनाद्वारे विविध पारितोषिके तसेच सहभाग प्रमाणपत्र देण्यातयेणार आहे. जिल्हास्तर युवा महोत्सवामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या युवक व युवती यांची विभागस्तरावर निवड करण्यात येणार व विभागस्तरावर प्राविण्य प्राप्त युवक युवती यांची निवड राज्यस्तरीय युवा महोत्सवाकरीता करण्यात येणार आहे.   पुढे राष्ट्रीय युवा महोत्सवाकरीता प्राविण्य प्राप्त युवक व युवती यांची निवड केली जाईल असे जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी सांगितले.


युवा महोत्सवात जळगाव जिल्ह्यातील संगीत महाविद्यालय वरीष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय, समाजकार्य महाविद्यालय, महिला मंडळे, सांस्कृतिक मंडळ, जिल्ह्यातील इंजिनिअरिंग महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, कृषि महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शाळा महाविद्यालये, शैक्षणिक संस्था येथील १५ ते २९ वयोगटातील युवक व युवती यांनी जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी केले आहे.


जळगाव जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या संस्था, मंडळ, वैयक्तिक युवक-युवती यांनी आपले प्रवेश अर्ज २८ नोव्हेंबरपर्यंत छत्रपती श्री शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे कार्यालयीन वेळेत जमा करायचे आहेत. विहीत मुदतीनंतर आलेल्या प्रवेश अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी ९८२३७७३७९७ आणि ८६२५९४६७०९ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा छ त्रपती श्री शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे कार्यलयीन वेळेत प्रत्यक्ष भेटावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी केले आहे.

संविधान दिनानिमित्त नेहरू युवा केंद्र जळगावच्या वतीने पद यात्रेचे आयोजन


जळगाव, दिनांक 27 नोव्हेंबर ( जिमाका ) : नेहरू युवा केंद्र जळगावच्या वतीने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भुसावळ व राष्ट्रीय सेवा योजना भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने MYBharat मार्फत २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रथम औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील संविधान मंदिरात सर्व विद्यार्थ्यांच्या हस्ते संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना मूलभूत कर्तव्यांची जाणीव करून देण्यात आली. संविधान दिनानिमित्त MYBharat स्वयंसेवक व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या 250 विद्यार्थ्यांनी नाहाटा चौकापर्यंत पदयात्रा काढली.

कार्यक्रमाचे आयोजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भुसावळचे विद्यार्थी आणि MYBharat स्वयंसेवकांनी नरेंद्र, जिल्हा युवा अधिकारी, N.Y.U.K. जळगाव आणि श्री दीपक कोळी, कार्यक्रम अधिकारी, रा.से.यो. भुसावळ यांच्या नेतृत्वाखाली केले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भुसावळचे प्राचार्य एम.एस. राजपूत, समूह संचालक श्री एल. आर. पाटील, श्री सुनील गाजरे, श्री आर. आर. गाजर, श्री आर. आर. देवकर, श्री अजिंक्य गवळी, श्री थोरात राजुव व मानकर अभय आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात २ डिसेंबर रोजी दिव्यांग नागरिकांसाठी लोकशाही दिनाचे आयोजन


जळगाव, दिनांक 27 नोव्हेंबर ( जिमाका ) : दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दिनांक २ डिसेंबर, 202४ रोजी सकाळी 11.00 वाजता अल्पबचत सभागृह, जळगाव येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी, भिमराज दराडे यांनी दिली आहे.

तरी दिव्यांग नागरिकांनी वैयक्तिक हितसंबंधाच्या तक्रारी घेऊन लोकशाही दिनी उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व आधार बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बाल विवाह मुक्त भारत’ या विषयावर कार्यशाळा संपन्न!




जळगाव, दिनांक २७ नोव्हेंबर ( जिमाका ) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव व आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने २७ नोव्हेंबर२०२४ रोजी दुपारी १२.३० वाजता ‘बाल विवाह मुक्त भारत’ या विषयावर जळगाव येथील श्रीराम माध्यमिक विद्यालय, मेहरूण आणि राज प्राथमिक विद्या मंदीर मेहरूणयेथे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.


या कार्यक्रमास मा श्री एस. पी. सय्यद, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश व. स्तर, हे उपस्थित होते. तसेच आधार बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती भारती पाटील, कार्याध्यक्षा श्रीमती रेणु प्रसाद व सहकारी उपस्थित होते.

मा.सचिव यांनी विद्यार्थ्यांना बाल विवाह या विषयावर मार्गदर्शन केले तसेच बाल विवाह करणार नाही आणि बाल विवाह होण्यास प्रतिबंध करण्याबाबत शपथ दिली. तसेच आधार बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा यांनी बालकांना बाल विवाह बावत मार्गदर्शन केले. हे शिबीर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे श्री बी. के. मोरे, प्र. अधिक्षक, श्री प्रमोद ठाकरे, कनिष्ठ लिपीक, श्री जावेद पटेल, शिपाई तसेच आधार बहुउद्देशीय संस्थेचे सहकारी यांच्या सहकार्याने पार पडले.

Tuesday, 26 November 2024

महाराष्ट्रासह 15 राज्यांना आपत्ती व्यवस्थापनासाठी केंद्राकडून 1000 कोटींचा निधी मंजूर



नवी दिल्ली, दिनांक 26 नोव्हेंबर : आपत्ती प्रतिरोधक भारत घडवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला गती देत, महाराष्ट्रासह 15 राज्यांसाठी भूस्खलन जोखीम शमन आणि नागरी संरक्षण क्षमताबांधणीसाठी एकूण 1115.67 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी महाराष्ट्राला या प्रकल्पांतर्गत 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली होती. या समितीने 15 राज्यांमध्ये भूस्खलन जोखीम शमन प्रकल्पासाठी 1000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला .या निधीतून महाराष्ट्रासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय उत्तराखंडसाठी 139 कोटी रुपये, हिमाचल प्रदेशसाठी 139 कोटी रुपये, ईशान्येकडील आठ राज्यांसाठी 378 कोटी रुपये, कर्नाटकासाठी 72 कोटी रुपये, केरळसाठी 72 कोटी रुपये, तामिळनाडूसाठी 50 कोटी रुपये आणि पश्चिम बंगालसाठी 50 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

यासोबतच, सर्व राज्यांतील नागरी संरक्षण स्वयंसेवकांच्या प्रशिक्षण आणि क्षमताबांधणीसाठी 115.67 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यापूर्वी समितीने हिमनदी उद्रेक पूर जोखीम व्यवस्थापनासाठी 150 कोटी रुपये आणि सात शहरांमध्ये नागरी पूर व्यवस्थापनासाठी 3075.65 कोटी रुपये मंजूर केले होते.

आपत्ती व्यवस्थापनासाठी तसेच अनुषंगिक कामांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने या वर्षातंर्गत 21,476 कोटी रुपयांहून अधिक निधी विविध राज्यांना वितरित केला आहे. यामध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधी, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी, राज्य आपत्ती निवारण निधी आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी यांतील तरतुदींचा समावेश आहे.

दहशतवादी हल्ल्यातील पोलीस हुतात्मांना राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे अभिवादन



            मुंबई, दिनांक २६ : मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी  दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात पोलीस जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज हुतात्म्य पोलीस अधिकारी व जवानांना पुष्पचक्र वाहून आदरांजली अर्पण केली.

१६ व्या हुतात्मा स्मृतीदिनी मुंबई पोलीस मुख्यालयातील पोलीस स्मारक येथे शहीद पोलीस अधिकारी आणि जवानांना पोलीस दलामार्फत आदरांजली अर्पण करण्यात आली.  पोलीस बँड पथकाने सलामी शस्त्र’ तसेच 'बिगुलर्स लास्ट पोस्टवाजविले. यावेळी पोलीस अधिकारी व जवानांनी हुतात्म्यांना सलामी देत अभिवादन केले.राज्यपालांनी हुतात्मा पोलीस कुटुंबातील सदस्यांची तसेच उपस्थित आजी व माजी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली.

मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकरउपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढामुख्य सचिव सुजाता सौनिकअतिरिक्त मुख्य सचिव डॉ. इकबाल सिंह चहल,पोलीस महासंचालक रश्मी शुक्लामुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी देखील हुतात्म्यांना अभिवादन केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन



जळगाव, दिनांक 26 ( जिमाका ) : संविधान दिवसानिमित्त शासकिय कार्यलयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात येते. संविधान दिनानिमित्त जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांकडून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करुन घेण्यात आले. याप्रसंगी जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी, श्री.भीमराज दराडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, श्री.अरविंद अंतुरलीकर, श्री.सुरेश कोळी, तहसीलदार, सामान्य प्रशासन, जि का, श्रीमती ज्योती वसावे, तहसीलदार, करमणूककर व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000000000

जिल्हाधिकारी कार्यालयात २ डिसेंबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

  जळगाव, दिनांक 26 ( जिमाका ) : दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाहीदिन सोमवार, दिनांक २ डिसेंबर, 202४ रोजी सकाळी 11.00 वाजता अल्पबचत सभागृह जळगाव येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे यांनी दिली आहे. या दिवशी संबधित तक्रारदार हे प्रत्यक्ष अर्ज सादर करणार असल्याने संबधित विभागाच्या विभाग प्रमुख यांनी देखील लोकशाही दिनी उपस्थित राहणे आवश्यक असणार आहे.

नागरिकांनी आपल्या तक्रारी घेऊन लोकशाही दिनी उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी २५ ऑक्टोबर ते १०डिसेंबर या कालावधीत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

जळगाव, दिनांक 26 ( जिमाका ) : राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पिक (सूक्ष्म सिंचन) सन २०२४-२५ मध्ये अनु. जाती व अनु. जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ देण्यात येतो. अनुसूचित जाती व अनुसुचित जमाती प्रवर्गातील शेतक-यांना सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेणेसाठी दिनांक २५ ऑक्टोबर ते १० डिसेंबर २०२४ या कालावधीत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज मागविण्या करीता मोहीम राबविण्यात येत आहे.

राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पिक (सूक्ष्म सिंचन) योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक यांना ५५ टक्के व बहुभूधारक यांना ४५ टक्के अनुदान देण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजने अंतर्गत अतिरिक्त २५ टक्के व ३० टक्के पुरक अनुदान देणेबाबत तरतुद करण्यात आलेली आहे. अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती या प्रवर्गातील लाभार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजने अंतर्गत पुरक अनुदान देय असल्याने पात्र शेतकऱ्यांना मंजुर मापदंडाच्या ९० टक्के च्या मर्यादेत अनुदान देण्यात येते.
सन २०२४-२५ मध्ये नाशिक विभागासाठी अनुसुचित जाती प्रवर्गाकरिता रक्कम रु. ४८५ लाख व अनुसुचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना लाभ देणेकरीता रक्कम रु. १८५६ लाख निधी जिल्हास्तरावर उपलब्ध आहे. अर्ज नोंदणी करण्यासाठी दिनांक २५ ऑक्टोबर ते १०डिसेंबर या कालवधीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. अनु. जाती व अनु. जमातीच्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या कालवधीत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावे. अर्ज करतांना अचूक माहिती भरावी जेणेकरून अर्ज रद्द होणार नाही. जास्तीत जास्त शेतकरी यांनी अर्ज नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. सुभाष काटकर यांनी केलेले आहे.
अर्ज करतांना मालकीचा ७/१२, ८अ, आधार कार्ड व बँक पासबुक सोबत असणे आवश्यक आहे. याकरिता आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण करणे बंधनकारक असणार आहे. लाभार्थी शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा असावी व त्याची नोंद ७/१२ उताऱ्यावर असावी, नोंद नसल्यास विहीर, शेततळे इ.बाबत स्वंय घोषणापत्र देण्यात यावे. योजनेचा लाभ ५ हेक्टर पर्यंत देण्यात येणार आहे. अर्जाची महाडीबीटी पोर्टलवर संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे व निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांना लघु संदेशाद्वारे त्यांची माहिती देण्यात येणार आहे. पूर्वसंमती मिळाल्यानंतर नोंदणीकृत कंपनीचे अधिकृत वितरकांकडून संच खरेदी करता येईल. संच बसविल्यानंतर कृषि पर्यवेक्षकामार्फत मोका तपासणी होऊन शेतकरी यांचे बँक खात्यावर अनुदान वर्ग होणार आहे.
अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी व सामान्य सेवा केंद्रावर संपर्क साधावा असे आवाहन नाशिक विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक श्री.सुभाष काटकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

संविधान दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन


जळगाव, दिनांक 26 ( जिमाका ) : 26 नोव्हेंबर हा दिवस देशभरात 'संविधान दिन' म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संसदेत राज्यघटनेला मान्यता देण्यात आली होती. संविधान दिवसानिमित्त शासकिय कार्यलयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात येते. संविधान दिनानिमित्त जळगाव जिल्हा माहिती कार्यालयात देखील भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी सर्व कर्मचाऱ्यांकडून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करुन घेतले. याप्रसंगी श्री.प्रमोद भंगाळे, श्री.चेतन आहिरे. श्री.पंकज ठाकुर, उषा लोखंडे , श्री. भुषण सोनवणे, श्री.भुषण पाठक, वैशाली पाटील उपस्थित होते.

0 0 0 0 0 0 0

जळगाव जिल्ह्यात आजपासून २१ व्या पशुगणनेला प्रारंभ; पाळीव प्राणी, कुक्कुटपालन, भटक्या प्राण्यांची होणार गणना


▪️ आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत मोबाईल ॲपच्या माध्यमातून होणार पशुगणना
जळगाव, दिनांक 25 ( जिमाका ) : आजपासून जळगाव जिल्ह्यातील पंचवार्षिक पशुगणनेच्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. २८ फेब्रवारी पर्यंत ही मोहीम चालणार आहे. तीन हजार कुटुंबामागे एका प्रगणकाची नियुक्ती केली आहे. पशुगणनेमुळे पशुसंवर्धन विभागाला योजनांची अंमलबजावणी करणे, निधीची उपलब्धता करणे सोयीचे ठरणार आहे. जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांच्या हस्ते या पशुगणनेच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली.
पशुसंवर्धन विभागाकडुन दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते. जनगणनेच्या धर्तीवरच हो मोहीम राबवली जाते. मागील पशुगणना २०१९ मध्ये झाली होती. त्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाकडून तयारी करण्यात आली आहे. पशुगणनेसाठी प्रगणकांची नेमणुक केली आहे. त्यांचे प्रशिक्षण पुर्ण झाले आहे.
पाच वर्षापुर्वी पशुगणनेने वेळी प्रगणकांना टॅब दिले होते. त्यावर माहिती भरुन घेतली होती आता प्रगणकांना स्वतःचे मोबाईल वापरावे लागणार आहेत. केंद्रीय पशुसंवर्धन विभागाच्या सॉफ़्टवेअरवर पशुधनाची माहिती भरावी लागणार आहे. प्रगणकांना मानधन आणि मोबाईल वापराचा वेगळा मोबदला देण्यात येणार आहे.
पशुधन पर्यवेक्षक पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांची या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. या मेहीमेत गायवर्ग, म्हैसवर्ग, शेळी-मेंढी, अश्व, वराह यांची गणना केली जाणार आहे. पशुगणनेमुळे जनावरांची नेमकी संख्या स्पष्ट होते. त्यानुसार शासनाकडून धोरण,योजना आखल्या जातात. निधीची उपलब्धता केली जाते. शिवाय पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात किती पशुधन आहे. त्यानुसार लसीकरणासाठी औषधाचा पुरवठा केला जातो. त्यामुळे आपल्याकडील जनावरांची खरी माहिती पशुपालकांनी द्यावी असे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री रणधीर सोमवंशी,जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन डॉ प्रदीप झोड, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ वाहेद तडवी यांनी केले.

0 0 0 0 0 0 0

प्रत्येक मताचे मूल्य जाणणारी यंत्रणा, रात्रीचा दिवस करते तेव्हा....!!


जळगाव, दिनांक 25 ( जिमाका ) : राज्यात नुकतीच विधानसभा निवडणुक पार पडली. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया पुर्ण झाली. निवडणुक काळात अनेक शासकिय कर्मचारी हे दिवस रात्र, वेळेची पर्वा न करता मतदान प्रक्रिया सुरळित पार पाडावी याकरिता कार्यरत होते. मतमोजणीच्या एक दिवसाआधी 22 नोव्हेंबरच्या रात्री 10 वाजता, जळगाव जिल्हा पोस्टल मतपत्रिका केंद्राला भंडारा जिल्ह्यातून 127-इगतपुरी विधानसभा मतदारसंघासाठीची पोस्टल मतपत्रिका प्राप्त झाली. 127-इगतपुरी विधानसभा मतदारसंघासाठीची पोस्टल मतपत्रिका जळगावमधील 12-भुसावळ विधानसभा मतदारसंघातील मतपत्रिकांमध्ये चुकून आढळून आली होती.

याप्रसंगी मतमोजणीसाठी ही मतपत्रिका इगतपुरी मतदारसंघात असणे आवश्यक होते. यावर तोडगा काढण्यासाठी नाशिकमधील 127- इगतपुरी मतदारसंघातील मतमोजणी केंद्रावर मतपत्रिका पोहोचवण्याचे काम जिल्ह्याच्या पोस्टल बॅलेट अधिकाऱ्यांपैकी एक असलेल्या जयश्री माळी यांना देण्यात आले. जयश्री माळी यांना राज्याच्या प्रोटोकॉल विभागाकडून एक इनोव्हा क्रिस्टा वाहन, एक पोलीस रक्षक आणि रात्रभर 250 किमी प्रवासासाठी एक सरकारी ड्रायव्हर प्रदान करण्यात आला होता.
जयश्री माळी आणि त्यांच्या सोबतच्या सहकारी यांनी रात्रभर प्रवास करत सकाळी ८ वाजेपूर्वी मतपत्रिका नाशिकच्या मतमोजणी केंद्रावर पोहोचल्या आणि तेथील नियुक्त अधिकाऱ्याकडे सुपूर्द केल्या. या संपूर्ण ऑपरेशनचे नियंत्रण जिल्हा नियोजन व देखरेख युनिटचे श्री मिलिंद बुवा, पोलीस हवालदार श्री सौरभ कोलते, भुसावळ विधानसभा मतदार संघाचे पोस्टल बॅलेट इंचार्ज श्री अमित दुसाने, पोलीस चालक श्री. विजय चौधरी यांनी केले. निवडणूक यंत्रणेला निवडणुकीत युद्ध गतीने काम करावे लागते ही बाब मात्र या घटनेतुन पुन्हा अधोरेखीत झाली. जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व टीमचे कौतुक केले.

0 0 0 0 0