Friday, 4 December 2015

खरीप-टंचाई 2014 च्या अनुदानापासून वंचीत पात्र लाभार्थ्यांनी संबंधित गाव तलाठयाशी संपर्क साधावा : तहसिलदार बाबासाहेब गाढवे

खरीप-टंचाई 2014 च्या अनुदानापासून वंचीत पात्र लाभार्थ्यांनी
संबंधित गाव तलाठयाशी संपर्क साधावा
                                                                        : तहसिलदार बाबासाहेब गाढवे

              चाळीसगांव, दिनांक 04 :-  विविधी आपत्तीकरीता शासनामार्फत वितरीत करण्यात आलेल्या अनुदानातुन खरीप-टंचाई 2014 च्या अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांना अनुदान वितरीत करण्याचे कामकाज अंतीम टप्प्यात असून या अनुदानासाठी पात्र असलेले लाभार्थी आपले खाते क्रमांक दुरुस्ती वा अन्य कारणांमुळे अनुदान लाभापासून वंचित आहेत त्यांनी आपल्या अचुक खाते क्रमांक व बँकेच्या पासबुकासह दिनांक 15 डिसेंबर, 2015 पावेतो आपल्या गाव तलाठयाशी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.
मा. विभागीय आयुक्त नाशिक यांचेकडील दिनांक 23 नोव्हेंबर, 2015 रोजीच्या पत्रानुसार विविध आपत्तींकरीता शासनाने वितरीत केलेल्या निधीपैकी वाटपा अभावी बँकेत पडून असलेल्या शिल्लक रकमा शासन खाती चलनाद्वारे भरणा करणेबाबत सुचित करण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने तहसिलदार चाळीसगाव यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 02 डिसेंबर, 2015 रोजी जिल्हा बँकेच्या 21 शाखांचे विभागीय अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत खरीप अनुदान 2014 करीता बाधित शेतक-यांना अनुदान वाटप करणेकामी चर्चा झाली. त्यात ज्या लाभार्थ्यांचे चुकीचे खाते क्रमांक, गावात बदल, नावात बदल , मयत , इत्यादी अनेक कारणांमुळे अनुदान लाभार्थ्यांच्या खातेवर वर्ग न होता बँकेत पडून आहे. अशा सर्व लाभार्थ्यांची गावनिहाय यादी बँकेतील नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात येणार आहे. तदनंतर सर्व लाभार्थी यांच्या वर्षेनिहाय , गावनिहाय व शाखानिहाय यादया बँकेमार्फत तहसिल कार्यालयात पाठविण्यात येणार असून सदरच्या यादयातील लाभार्थी यांचे खाते क्रमांक व नावातील किरकोळ दुरूस्त्या करून अनुदान लाभार्थी यांचे खातेवर वर्ग करण्यात येणार असल्याने जे शेतकरी लाभार्थी खाते क्रमांक दूरूस्ती वा अन्य कारणांमुळे अनुदान लाभापासून वंचित आहेत त्यांनी त्यांचे खाते क्रमांक आपले बँकेच्या पासबुकासह दिनांक 15 डिसेंबर, 2015 पावेतो तहसिल कार्यालय, चाळीसगांव अथवा गावचे संबंधित तलाठी यांचेकडे सादर करावेत. तदनंतर उर्वरीत रक्कम शासनाकडे समर्पित करण्यात येणार असल्यामुळे यानंतर अनुदान न मिळालेबाबत कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही असे आवाहन तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी केले आहे.

* * * * * * * *

No comments:

Post a Comment