जळगाव जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू ;
काटेकोरपणे पालन करण्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे आवाहन
जळगाव, दिनांक 18 मार्च ( वृत्तसेवा
जिमाका ) :
भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी दिनांक 16 मार्च, 2024 रोजी
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची घोषणा केलेली असून या तारखेपासून सदर
निवडणूकीची आचार संहिता संपूर्ण जळगाव जिल्हयात सुरु झालेली आहे. त्यामुळे या
आदर्श आचार संहितेचे काटेकोर पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा
निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
दि महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट-1995 व
भारत निवडणूक आयोग, दिल्ली यांनी वेळोवेळी निर्गमीत केलेले आदेश व निर्देश यानुसार
विना परवाना खाजगी अथवा सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स लावणे, घोषणा लिहिणे,
निवडणूक चिन्ह लिहिणे, कापडी फलक लावणे, झेंडे लावणे व इतर कारणाने सदर मालमत्ता
विद्रुपित करणेवर बंदी घातलेली आहे.
No comments:
Post a Comment