अपुर्ण
घरकुले डिसेंबर अखेर पुर्ण करा : प्रकल्प संचालक विक्रांत बागडे
चाळीसगांव, दिनांक 23 :- इंदीरा आवास योजनेतंर्गत सन 2010-11 ते सन
2015-16 पर्यंतची अपुर्ण घरकुले डिसेंबर-2016 पर्यंत पुर्ण न केल्यास
संबंधितांकडून घरकुलांचे अनुदान वसुल करण्याबाबतची कारवाई करण्याच्या सुचना जिल्हा
ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विक्रांत बागडे यांनी दिल्या.
शहरातील सिंधी हॉल येथे नियोजीत आढावा बैठकीत ते बोलत होते
यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी पुरवठा व स्वच्छता) राजन पाटील, गट विकास
अधिकारी अनिल राणे, सहाय्यक गट विकास अधिकारी बी.एस.बागुल, नरेगाचे गटविकास
अधिकारी जि.प.जळगांव श्री.चित्ते, वैद्यकीय अधिकारी डॉ.लांडे, विस्तार अधिकारी
के.एन.माळी, उप अभियंता श्री.बाफणा, पंचायत समिती अंतर्गत असलेले सर्व विभाग
प्रमुखांसह सर्व ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आढावा बैठकीत सन 2010-11 ते 2015-16 पर्यंतच्या अपुर्ण
घरकुलांचा वैयक्तीक ग्रामपंचायत निहाय आढावा घेण्यात आला. आढावा बैठकीत प्रकल्प
संचालक श्री.बागडे यांनी पंचायत समितीच्या
कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत तालुक्यातील अपुर्ण घरकुलांबाबत तात्काळ पाठपुरावा
करुन संबंधितांना नोटीसा बजावण्याचे आदेशही त्यांनी या आढावा बैठकीत दिले.
या बैठकीत उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी पुरवठा व
स्वच्छता) राजन पाटील यांनी स्वच्छ भारत अभियानातंर्गत वैयक्तीक शौचालयाच्या
कामकाजाबाबत आढावा घेतला असता मार्च 2017 पर्यंत कृती आराखड्यात समाविष्ट 36 गावे
ओडीएफ (उघड्यावर शौचविधीपासून मुक्त) करण्याबाबतच्या सुचना उपस्थित सर्व
ग्रामसेवकांना दिल्या. तसेच स्वच्छ भारत अभियानातंर्गत कृती आराखड्यात समाविष्ठ
ग्रामपंचायतींव्यतीरीक्त इतर ग्रामपंचायतींनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण
रोजगार हमी योजनेतंर्गत शौचालयाची कामे पुर्ण करण्याचे आवाहन केले.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment