जळगांव, दि. 4 :- जळगांव
जिल्हयातील चाळीसगांव तालुक्यातील क्षेत्र गौताळा औट्रमघाट अभयारण्य अंतर्गत येते.
सदर अभयारण्याचा पुढील 10 वर्षासाठीचा व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे काम या
विभागातर्फे चालु आहे. सदर आराखडयामध्ये अभयारण्यातील वन्यप्राणी / पक्षी यांचे
संरक्षण / संवर्धनाचे दृष्टीने विविध उपाययोजनांचा अंतर्भाव असणार आहे.
तरी या कामाकरीता जिल्हयातील सेवाभावी
संस्था (N G O) निसर्गप्रेमी / वन्यप्राणी
प्रेमी/ पक्षी मित्र / सर्पमित्र / तसेच इतर माहितगार यांचेकडून अभयारण्यासाठी
भविष्यात करावयाच्या कामाबाबत काही सूचना / सल्ला प्राप्त करावयाचे आहेत, ज्यांना
सुचना / सल्ला देणे आहे, त्यांनी या विभागाकडे लवकरात लवकर त्यांच्या सुचना /
सल्ला या विभागाकडे पाठवाव्यात त्यांना विचारात घेवून व्यवस्थापन आराखडा तयार
करण्यास मदत होईल असे उपवनसंरक्षक औरंगाबाद यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment