चाळीसगांव दि.27 : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 52 वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम दिनांक 01 मे 2012 रेाजी पोलीस कवायत मैदान, चाळीसगांव येथे सकाळी ठिक 08:00 वाजता होणार आहे. तसेच संचलन व समारंभ होणार आहे. या कार्यक्रमास स्वातंत्र्य सैनिक, राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी तसेच शहरातील नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तहसिलदार शशिकांत हदगल यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment